माधवी..
स्त्री आणि पुरुष यांच्या मधला खरं सांगायचं तर मोठा फरक म्हणजे सहनशक्ती. सहन करणारी स्त्री आदर्श स्त्री तर सहन न करणारा पुरुष हा आदर्श पुरुष !.. असं म्हणणाऱ्या लोकांचं मला वाईट वाटतं. कारण सहन करणाऱ्याला नेहमीच जास्त भोगावं लागतं .. नव्हे समाज अशांनाच छळण्यामध्ये मोठा पुरुषार्थ समजतो हेही एक सत्य आहे. स्त्री - पुरुषाच्या प्रदीर्घ वाटांवर या पुरुषार्थाचे विद्रूप दर्शन मिळते ते "माधवी" च्या आयुष्यात. ययाती सारखा पिता लाभूनही .. चिरतारुण्याच वरदान मिळूनही केवळ धर्मामुळे जिच्यासाठी हे वरदान स्त्रीत्वाचे महत्पाप झाले ती ही माधवी. कोणी एका योग्याने तिला दक्षिणा म्हणून नेले आणि स्वतःच्या गुरुदक्षिणेसाठी तिच्या सौंदर्याचा व्यापार केला. शेवटी ती सतीही झाली नाही .. आईही बनून राहिली नाही. हेही कमी होते की काय म्हणून तिचा स्वयंवर रचला गेला. तेव्हा मात्र ती सगळं काही टाकून सन्यस्त झाली. जेव्हा कधी मला पुरुष असण्याचा अहंकार होतो तेव्हा दूर वर एक सन्यासी स्त्री दिसते .. माधवी !
स्त्री आणि पुरुष यांच्या मधला खरं सांगायचं तर मोठा फरक म्हणजे सहनशक्ती. सहन करणारी स्त्री आदर्श स्त्री तर सहन न करणारा पुरुष हा आदर्श पुरुष !.. असं म्हणणाऱ्या लोकांचं मला वाईट वाटतं. कारण सहन करणाऱ्याला नेहमीच जास्त भोगावं लागतं .. नव्हे समाज अशांनाच छळण्यामध्ये मोठा पुरुषार्थ समजतो हेही एक सत्य आहे. स्त्री - पुरुषाच्या प्रदीर्घ वाटांवर या पुरुषार्थाचे विद्रूप दर्शन मिळते ते "माधवी" च्या आयुष्यात. ययाती सारखा पिता लाभूनही .. चिरतारुण्याच वरदान मिळूनही केवळ धर्मामुळे जिच्यासाठी हे वरदान स्त्रीत्वाचे महत्पाप झाले ती ही माधवी. कोणी एका योग्याने तिला दक्षिणा म्हणून नेले आणि स्वतःच्या गुरुदक्षिणेसाठी तिच्या सौंदर्याचा व्यापार केला. शेवटी ती सतीही झाली नाही .. आईही बनून राहिली नाही. हेही कमी होते की काय म्हणून तिचा स्वयंवर रचला गेला. तेव्हा मात्र ती सगळं काही टाकून सन्यस्त झाली. जेव्हा कधी मला पुरुष असण्याचा अहंकार होतो तेव्हा दूर वर एक सन्यासी स्त्री दिसते .. माधवी !
पुन्हा पाहूदे मजला, माझेच शुभ्र प्रतिबिंब
चांदणी झोपाळा इवला ,झोपेला उद्याचे भय
धर्माला अनाहत असते, प्राक्तनाचे क्रूर वलय
माझ्या कुळाचा वृक्ष महान,आणि सावली थोर
सावलीत अचानक आला,माझ्या देहाचा चोर
आंधळी तहान त्यावर, मेघांनी स्वैर पसरावे
बाहुलीच्या पदरावरती, सोन्याचे डंख उमटावे
जन्माच्या समईवर माझे, अश्रुंचे वाहिले तेल
गर्भाचे प्रत्येकाने, का कसे ठरवले मोल
तरीही चुडा सजवला, हसतीलही आता सगळे
माधवीच्या इंधनात, धर्माचा चंद्रही उजळे
मखमल इथली टोचे, सोन्याची नकोही दर्पणे
तुम्ही दाखवा सयांनो, मजला पश्चिमवळणे
हातावर बसली आता, स्त्रीत्वाची गर्द लकेर
गोकुळात होवू दे आता, मम दयाघना अखेर
तुझ्या ओंजळीचे गंगे, उमटले डोळ्यात थेंब
शिळा ..
माझ्या आजूबाजूला दिसणारी अजून एक विद्रूप गोष्ट म्हणजे .. माणसाचे धासळलेले नीती अनीतीचे स्तर. पाप करणे ही एक गोष्ट आहे आणि त्याचा पश्चात्ताप होणे ही एक विलग गोष्ट आहे. किंबहुना काहींना वेळीच पाप केल्याची जाणीव होत नाही. स्त्रीचे चारित्र्य एक काचेचे भांडे आहे .. हे खरच आहे. पण आधुनिक म्हणणाऱ्या जगात हल्ली कधीकधी भोगाच्या मोहाला स्त्री स्वातंत्र्याची झालर चढवली जाते. पाप-पुण्य नीती-अनीती या पुरेपूर व्यक्तीनिष्ठ आणि वैयक्तिक गोष्टी आहेत हे मी जाणतो. तरीही आजही जेव्हा वाट भरकटलेली एखादी स्त्री जेव्हा पुन्हा समाजात येऊ पहाते तेव्हा तिला डावलण्यात येतं आणि तेव्हा जर तिने कुणाला आपण अहिल्या असण्याची लाच दिली तर तर मात्र माझे मदत करणाऱ्या हातांना काजळी लागलीये की काय असं वाटू लागतं. कारण अहिल्येला मोह नव्हता, ती सती होती आणि तरीही तिला शाप मिळाला .. कदाचित म्हणूनच ती शिळा बनून श्रीरामाच्या वाटेत आली !
माझ्या आजूबाजूला दिसणारी अजून एक विद्रूप गोष्ट म्हणजे .. माणसाचे धासळलेले नीती अनीतीचे स्तर. पाप करणे ही एक गोष्ट आहे आणि त्याचा पश्चात्ताप होणे ही एक विलग गोष्ट आहे. किंबहुना काहींना वेळीच पाप केल्याची जाणीव होत नाही. स्त्रीचे चारित्र्य एक काचेचे भांडे आहे .. हे खरच आहे. पण आधुनिक म्हणणाऱ्या जगात हल्ली कधीकधी भोगाच्या मोहाला स्त्री स्वातंत्र्याची झालर चढवली जाते. पाप-पुण्य नीती-अनीती या पुरेपूर व्यक्तीनिष्ठ आणि वैयक्तिक गोष्टी आहेत हे मी जाणतो. तरीही आजही जेव्हा वाट भरकटलेली एखादी स्त्री जेव्हा पुन्हा समाजात येऊ पहाते तेव्हा तिला डावलण्यात येतं आणि तेव्हा जर तिने कुणाला आपण अहिल्या असण्याची लाच दिली तर तर मात्र माझे मदत करणाऱ्या हातांना काजळी लागलीये की काय असं वाटू लागतं. कारण अहिल्येला मोह नव्हता, ती सती होती आणि तरीही तिला शाप मिळाला .. कदाचित म्हणूनच ती शिळा बनून श्रीरामाच्या वाटेत आली !
मेघांची ओंगळवाणी
किती जणांनी प्यावे
एका ओंजळीत पाणी
पारध्याच्या हाती डाव
त्याच्याच हाती फासा
रंगात तुझ्या पदराच्या
आक्रंदला उसासा
शोधला मग ज्याने त्याने
आसरा सावलीखाली
शापाची करडी घार
शिलेवर घिरट्या घाली
ठेवू तुला कुठे मी
काजळी माझेही हात
की राघवाच्या वाटे
मलीन त्या पायात
कोणे काळी येथे
ती नशिबवंत एक होती
बाकीच्या शिळांची मात्र
उरली फक्त माती !
सांजओझ्याची कसरत
माझ्यापुरता ..
बरेचदा असं होतं की नशीब आणि नियती आपापलं एक वेगळंच सत्र सुरु करतात. आणि प्रश्नांना एकदा सुरुवात झाली की पावसाळ्यात कधी नव्हे तो आटलेला धबधबा ओसंडून वाहावा तसे प्रश्न येऊन कोसळू लागतात. त्यांना फक्त कोसळणं माहित असतं. आणि मनाची अवस्था त्या मध्ये गर्ते खाणाऱ्यासारखी होऊन जाते. अशा वेळी त्याला फक्त यातून बाहेर पडायचं असतं बाकी काहीही विचार करणं परवडणारं नसतं. बराच वेल अनिश्चिततेमध्ये गटांगळ्या खाल्ल्यावर थोडा विसावा मन शोधू लागतं. पण तेव्हाही नियती त्याला स्वस्थ बसू देत नाही .. मग मात्र राग येतो आणि मनाला वाटू लागतं ही धडपड कोणासाठी ? कशासाठी ? थोडी स्वतःसाठीही हक्काची झोप मिळावी ..!
बरेचदा असं होतं की नशीब आणि नियती आपापलं एक वेगळंच सत्र सुरु करतात. आणि प्रश्नांना एकदा सुरुवात झाली की पावसाळ्यात कधी नव्हे तो आटलेला धबधबा ओसंडून वाहावा तसे प्रश्न येऊन कोसळू लागतात. त्यांना फक्त कोसळणं माहित असतं. आणि मनाची अवस्था त्या मध्ये गर्ते खाणाऱ्यासारखी होऊन जाते. अशा वेळी त्याला फक्त यातून बाहेर पडायचं असतं बाकी काहीही विचार करणं परवडणारं नसतं. बराच वेल अनिश्चिततेमध्ये गटांगळ्या खाल्ल्यावर थोडा विसावा मन शोधू लागतं. पण तेव्हाही नियती त्याला स्वस्थ बसू देत नाही .. मग मात्र राग येतो आणि मनाला वाटू लागतं ही धडपड कोणासाठी ? कशासाठी ? थोडी स्वतःसाठीही हक्काची झोप मिळावी ..!
काळ्या कुट्ट मेघांनो ..
माझ्याच घरापाशी का असा थैमान
अघटीताचे फर्मान,
तो ही भल्या सकाळी ..
मी ही झालो असतो वारा
आणि विखुरलं असतं तुमचा अस्तित्व ,
तर मिळाले असते का
पृथ्वीचे आंदण
विजांचे लखलखणारे गोंदण ..
म्हणून म्हणतो
आत्ता नको हा धिंगाणा
आणि नको संदिग्धता ,
झोपू दे मला जरासा
फक्त माझ्यापुरता .. !
माझ्याच घरापाशी का असा थैमान
अघटीताचे फर्मान,
तो ही भल्या सकाळी ..
मी ही झालो असतो वारा
आणि विखुरलं असतं तुमचा अस्तित्व ,
तर मिळाले असते का
पृथ्वीचे आंदण
विजांचे लखलखणारे गोंदण ..
म्हणून म्हणतो
आत्ता नको हा धिंगाणा
आणि नको संदिग्धता ,
झोपू दे मला जरासा
फक्त माझ्यापुरता .. !
नदीचे अंतर..
माणसाचं मन बाकी कशालाही घाबरलं नाही तरी एका गोष्टीला निश्चित घाबरतं ... जेव्हा आयुष्याच्या एका वळणावर त्याच्या सत्वाची परीक्षा होते, जेव्हा त्याला निर्णय घायचा असतो. जगाने मोकळ्या केलेल्या अनंत वाटा आणि त्याची वाट यांमध्ये निश्चित मार्ग पकडायचा असतो. जेव्हा खरं काय आणि खोटं काय हा मुलभूत प्रश्न आ वासून उभा असतो आणि सात्यासत्याची सीमारेषा अदृश्य झालेली असते तेव्हा मन घाबरतं. अशा वेळी एकमेव मार्ग म्हणजे देवाला शरण जाणे. मनाला त्याचं मार्गदर्शन हवं असतं आणि त्यावर तो सारं काही सोपवून पुढे चालणार असतो.. अर्जुनाने जे काही केलं ती शरणागती नव्हे ... तो पुरुषार्थ होता ..
माणसाचं मन बाकी कशालाही घाबरलं नाही तरी एका गोष्टीला निश्चित घाबरतं ... जेव्हा आयुष्याच्या एका वळणावर त्याच्या सत्वाची परीक्षा होते, जेव्हा त्याला निर्णय घायचा असतो. जगाने मोकळ्या केलेल्या अनंत वाटा आणि त्याची वाट यांमध्ये निश्चित मार्ग पकडायचा असतो. जेव्हा खरं काय आणि खोटं काय हा मुलभूत प्रश्न आ वासून उभा असतो आणि सात्यासत्याची सीमारेषा अदृश्य झालेली असते तेव्हा मन घाबरतं. अशा वेळी एकमेव मार्ग म्हणजे देवाला शरण जाणे. मनाला त्याचं मार्गदर्शन हवं असतं आणि त्यावर तो सारं काही सोपवून पुढे चालणार असतो.. अर्जुनाने जे काही केलं ती शरणागती नव्हे ... तो पुरुषार्थ होता ..
इथे संपल्या वेशी
इथे संपल्या वाटा
डोहाच्या चेहऱ्यावरती
काळाच्या अलगद लाटा
ओढू कशा कुठे मी
स्वप्नांच्या धुरकट रेषा ?
मुकलेल्या ओठांवरती
आली प्रार्थनेची भाषा !
उद्विग्न नदीचे अंतर
पलीकडे जायची हाव
अर्घ्याचे मोल तू राख
ते माझे नवीन गाव
सांडलेला प्रपंच माझा
देहावर मोह तवंग
क्षितिजाच्या पाठीवरती
कृष्णाचा श्यामल रंग
आता नको किनारा
मी सारे टाकले मागे
विठूरायाचरणी स्वर्ग
नको रोखूस चंद्रभागे
इथे संपल्या वाटा
डोहाच्या चेहऱ्यावरती
काळाच्या अलगद लाटा
ओढू कशा कुठे मी
स्वप्नांच्या धुरकट रेषा ?
मुकलेल्या ओठांवरती
आली प्रार्थनेची भाषा !
उद्विग्न नदीचे अंतर
पलीकडे जायची हाव
अर्घ्याचे मोल तू राख
ते माझे नवीन गाव
सांडलेला प्रपंच माझा
देहावर मोह तवंग
क्षितिजाच्या पाठीवरती
कृष्णाचा श्यामल रंग
आता नको किनारा
मी सारे टाकले मागे
विठूरायाचरणी स्वर्ग
नको रोखूस चंद्रभागे
तसाही ..
एकदा देवाला शरण गेलं की माझ्या मनाची ताकद वाढते .. मन नव्या जोमाने काम करू लागतं कारण एक निश्चितता असते की तो आपल्या पाठीशी उभा आहे .. सर्व काही पहात आहे .. अशा वेळी मनात एक ज्योत मिणमिणते आणि त्याची किरणं पसरू लागतात !
एकदा देवाला शरण गेलं की माझ्या मनाची ताकद वाढते .. मन नव्या जोमाने काम करू लागतं कारण एक निश्चितता असते की तो आपल्या पाठीशी उभा आहे .. सर्व काही पहात आहे .. अशा वेळी मनात एक ज्योत मिणमिणते आणि त्याची किरणं पसरू लागतात !
अस्ताने दिले कशाला रात्रीस मोकळे अंगण ?
ओंजळीत लपवून आली प्रश्नांचे लोभस गोंदण
मजपाशी ना समिधा जळणाचे इतुके इंधन
माझ्याच प्रार्थनेला का दैवाचे फसवे बंधन ?
वाटांनी अंग झाकावे मेघांचे झडावे शील
तिच्या पाऊली धुळीला स्वप्नरंगांचे का मोल ?
मी थोडे वेचून घेतो स्वप्नांचे अमूर्त रंग
वाळवंटी रुजले बीज पाठीराखा असे श्रीरंग
अस्तासही चंद्रभागा की निर्मळ सुवर्णधारा
ते थोडे मला मिळावे श्वासासही थोडा वारा
पर्वताशी अस्त जरीही नकळत आला कसाही
सारून रात्रीसही थोडे उजळेन चंद्र मी तसाही...
स्पर्श ..
आजूबाजूच्या सगळ्या मतलबी आणि पैशामागे लाळघोटेपणा करणाऱ्या जगाकडे बघितलं की अनंत प्रश्न मनात आ-वासून उभे रहातात. अशा वेळी माणूस पळून जायचाही विचार करतो कधी कधी पळतोही ! पण ते पळणे त्याला एकाच ठिकाणी खिळवून ठेवते हे मात्र त्याला समजत नाही. या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी मनाकडे बरीच साधने असतात. त्यांना विरंगुळा असेही म्हणतात. पण माझी कविता हा नुसता विरंगुळा राहिलेला नसून तो माझाच एक अविभाज्य अंग होवून बसली आहे. तरीही ती वेगळी आहे, मनस्वी आहे आणि तिच्या या लिला बघत मन अगदी रमून जातं. आजवर झालेले बरेच घाव या कवितेच्या स्पर्शाने भरून निघतात .. अशी ही माझी कविता !
कविता ..
कविता म्हणजे एक कल्पना ..
जाणिवांना स्पर्शून जाणारी
भावनांच्या झुल्यावर स्वैर झुलणारी ..
संवेदना म्हणजे कवितेचा चेहरा
थकलेल्या मनाचा शब्दांचा आसरा ..
ती चालते
तशी तिच्या पायाखाली वाट उलगडत जाते ..
अक्षरांच्या चांदण्याखाली
ती जिवंत होते .. श्वास घेऊ लागते .. उमलत जाते
तिचा प्रवास असतो अगदी थोडासा ..
काही क्षणांचा ..
हा प्रवास संपला तरी ,
ते स्पर्श तसेच रहातात .. तिच्या पाउलखुणा जिवंत रहातात
तिने दिलेल्या जाणीवा बदलत नाहीत ..
बदलतात ते फक्त ऋतु..
कधी कधी संध्याकाळी
या पाउलखुणांना बधून येतो ..
मागे वळून बघतो ..
दूर .. गावाशेजारून नदी वहात असते
आणि मंदिरातला घंटारव दरवळत असतो ..
व्याख्या बदलल्या तरीही
तो स्पर्श अगदी तसाच असतो .. अगदी तसाच असतो !
कविता म्हणजे एक कल्पना ..
जाणिवांना स्पर्शून जाणारी
भावनांच्या झुल्यावर स्वैर झुलणारी ..
संवेदना म्हणजे कवितेचा चेहरा
थकलेल्या मनाचा शब्दांचा आसरा ..
ती चालते
तशी तिच्या पायाखाली वाट उलगडत जाते ..
अक्षरांच्या चांदण्याखाली
ती जिवंत होते .. श्वास घेऊ लागते .. उमलत जाते
तिचा प्रवास असतो अगदी थोडासा ..
काही क्षणांचा ..
हा प्रवास संपला तरी ,
ते स्पर्श तसेच रहातात .. तिच्या पाउलखुणा जिवंत रहातात
तिने दिलेल्या जाणीवा बदलत नाहीत ..
बदलतात ते फक्त ऋतु..
कधी कधी संध्याकाळी
या पाउलखुणांना बधून येतो ..
मागे वळून बघतो ..
दूर .. गावाशेजारून नदी वहात असते
आणि मंदिरातला घंटारव दरवळत असतो ..
व्याख्या बदलल्या तरीही
तो स्पर्श अगदी तसाच असतो .. अगदी तसाच असतो !
त्यांची गोष्ट ..
संस्कृती आणि नीतीमत्तेचे कितीही बाळकडू पाजले तरीही आजही जग म्हणजे नर आणि मादी यांच्यामधला एकमेकांवर कुघोडी करण्याचा खेळ. प्रत्येकाला आपापल्या देहस्वीपणाचा एक गर्व असतो. हे सांगायचा कारण म्हणजे माझ्यासारख्याच सगळ्यांनी या गोष्टी बघितल्या, ऐकल्या असतील. मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेम म्हणजे दोघांनी एकमेकांशी तुल्यबळ युद्धानंतर केलेली संधी आहे. अशी संधी जिथे होत नाही तिथे कायम युध्द सुरु रहाते. मूक युध्द ज्याच्या शेवटी फक्त एकटेपण असते. यात चूक कुणाची हा प्रश्नच चुकीचा आहे.. असे हे तिचे आणि त्याचे एकटेपण मी बघितले आहे ज्यांच्यात आता संधी होणे नाही पण आता युध्द करणे ही अंगावर येत आहे !
तिने उधळल्या कळ्यांना
त्याने हळुवार झेलले ओंजळी
ती विसरून गेली कधीची
मात्र त्याने सजविली वेगळी
तो मागत नव्हता काही
होते तिचेही मृगजळी बाहू
तो सांगे पुन्हा स्वतःला
वेड्या .. स्वप्न हे नको तू पाहू
तिला भासले चंचल तिही
धरणीही जपे फुलाला
हरवून स्वतःला तोही
रानवारा होवून बसला
अशी जगावेगळी होती
ही 'त्याची' अमूर्त प्रीत
जसे दर्यावरती बनते
राखेत नवेले बेट
.. किती दिवस झाले त्याला ..
पण कोणत्याही संध्याकाळी पहा
ती खिडकीतून बाहेर बघत असते
आणि तो नदीकाठी उभा असतो .. एकटाच ..
त्याने हळुवार झेलले ओंजळी
ती विसरून गेली कधीची
मात्र त्याने सजविली वेगळी
तो मागत नव्हता काही
होते तिचेही मृगजळी बाहू
तो सांगे पुन्हा स्वतःला
वेड्या .. स्वप्न हे नको तू पाहू
तिला भासले चंचल तिही
धरणीही जपे फुलाला
हरवून स्वतःला तोही
रानवारा होवून बसला
अशी जगावेगळी होती
ही 'त्याची' अमूर्त प्रीत
जसे दर्यावरती बनते
राखेत नवेले बेट
.. किती दिवस झाले त्याला ..
पण कोणत्याही संध्याकाळी पहा
ती खिडकीतून बाहेर बघत असते
आणि तो नदीकाठी उभा असतो .. एकटाच ..
मनाला एकटे वाटू लागले की एक नकळत सगळ्या व्याख्या रस्ते धूसर होवू लागतात. सारं काही अनिश्चित होवून जातं. एकट्या जीवाला कधीही जराही प्रकाश कमी झालेला आवडत नाही. अशा वेळी संधीप्रकाशावर चिडावं की रडावं हे त्याला काळात नाही सारं काही संदिग्ध होवून बसतं !
संदिग्ध
संदिग्ध
आभाळाचं तेज उतरू लागलं..
पाखरं परतू लागली ..
की कधी कधी 'ती' येते !
थोडी नदीकाठी रेंगाळते
थोडी पानांतून सळसळते
उंबऱ्याशी येऊन ठेचकाळते
खिडकीतून आत डोकावते ...
काय हवं असतं तिला ?
घराची चौकट ?!
देवघरातलं निरांजन ?!
झोपाळ्याशी खेळणारा वारा ?!
की ...
एकटेपण घालवण्यासाठी
एखादा अंधारा कोपरा !
ती आली की
घराच्या भिंती उचावू लागतात ..
काळोखू लागतात ,
आणि श्वासांचे स्तोत्र होवू लागतात
शब्द .. मोत्याच्या तुटलेल्या
माळेतून निसटू लागतात
सर्वत्र वीखरू लागतात !
तिच्या मनात नसेलही पाप
पण मी घाबरतो..
माझं पुण्य जपण्यासाठी
कारण ती येतेच
ती फक्त जाण्यासाठी
काही क्षणांच्या संदिग्धतेसाठी !
पाखरं परतू लागली ..
की कधी कधी 'ती' येते !
थोडी नदीकाठी रेंगाळते
थोडी पानांतून सळसळते
उंबऱ्याशी येऊन ठेचकाळते
खिडकीतून आत डोकावते ...
काय हवं असतं तिला ?
घराची चौकट ?!
देवघरातलं निरांजन ?!
झोपाळ्याशी खेळणारा वारा ?!
की ...
एकटेपण घालवण्यासाठी
एखादा अंधारा कोपरा !
ती आली की
घराच्या भिंती उचावू लागतात ..
काळोखू लागतात ,
आणि श्वासांचे स्तोत्र होवू लागतात
शब्द .. मोत्याच्या तुटलेल्या
माळेतून निसटू लागतात
सर्वत्र वीखरू लागतात !
तिच्या मनात नसेलही पाप
पण मी घाबरतो..
माझं पुण्य जपण्यासाठी
कारण ती येतेच
ती फक्त जाण्यासाठी
काही क्षणांच्या संदिग्धतेसाठी !
मेघांनो ..
या सगळ्या अनिश्चिततेचा अजून एक पैलू म्हणजे दाटून येणारे मेघ. हे मेघ बरसतही नाही आणि आकाश मोकळे ही करत नाहीत
या सगळ्या अनिश्चिततेचा अजून एक पैलू म्हणजे दाटून येणारे मेघ. हे मेघ बरसतही नाही आणि आकाश मोकळे ही करत नाहीत
मेघांनो .. आज पुन्हा आलात माझ्या दारी .. !
काय हवंय तुम्हाला ?
मनाजोगता आकार ?
अस्पष्ट क्षितिजाची किनार ?
की अनंताच्या प्रवासात ,
थोडा विसावा घेण्यासाठी आधार ?
तुमचे हे चालणे ..
कोणासाठी आहे ? कशासाठी आहे ?
आपलं सामर्थ्य आजमावण्यासाठी आहे !
की ,
नियतीने लादलेल्या कालचक्रासाठी आहे !
तुमचे धूसर बाहू ,
जेव्हा पृथ्वीला विळखा घालू लागतात ..
तेव्हा तिही थोडी गुदमरून जाते ,
वळणावळणांची माझी वाटही हरवून जाते ,
अस्तित्वाच्या पटलांना उकरून जाते..
माझ्या दारावर दाटून आलेले
मेघ आज मला घुसमटल्यासारखे वाटले !
कोणत्याही क्षणी त्यांना भरून येईल ...
आणि ते बरसू लागतील !
काय हवंय तुम्हाला ?
मनाजोगता आकार ?
अस्पष्ट क्षितिजाची किनार ?
की अनंताच्या प्रवासात ,
थोडा विसावा घेण्यासाठी आधार ?
तुमचे हे चालणे ..
कोणासाठी आहे ? कशासाठी आहे ?
आपलं सामर्थ्य आजमावण्यासाठी आहे !
की ,
नियतीने लादलेल्या कालचक्रासाठी आहे !
तुमचे धूसर बाहू ,
जेव्हा पृथ्वीला विळखा घालू लागतात ..
तेव्हा तिही थोडी गुदमरून जाते ,
वळणावळणांची माझी वाटही हरवून जाते ,
अस्तित्वाच्या पटलांना उकरून जाते..
माझ्या दारावर दाटून आलेले
मेघ आज मला घुसमटल्यासारखे वाटले !
कोणत्याही क्षणी त्यांना भरून येईल ...
आणि ते बरसू लागतील !