झाड प्राजक्ताचे !
मनाची अजून एक मोठी खोड म्हणजे स्वतःच स्वतःशी खेळत बसायचं. हे खेळ अगदी लपाछापी सारख्या सामान्य खेळापासून प्रेमाच्या किचकट क्लिष्ट खेळांसारखे असू शकतात. प्रत्येक खेळाचे पडघम एकेका पटलावर आपला रंग सोडून जातो. त्यात अगदी प्रत्येक डावात किती भिडू चकले, कुणावर राज्य आले कुणी रडीचा डाव खेळला आणि माघार घेतली या सगळ्यांचं वर्णन असतं. मनाला शांत बसवत नाही ! पटलांवर ओढलेल्या रेषांवर चालता चालता रंगत जाणारा त्याचा अजून एक खेळ म्हणजे आठवणींच्या वर्तमानाशी जोड्या लावत बसणे. या खेळात त्याला कधी काय आठवेल याचा नेम नाही. माझ्या शहरातल्या घरात अशीच एकदा एक जोडी जुळवताना आमच्या वाड्याची आठवण आली. त्याच्या अंगणात एक प्राजक्ताचं झाड होतं ...
मनाची अजून एक मोठी खोड म्हणजे स्वतःच स्वतःशी खेळत बसायचं. हे खेळ अगदी लपाछापी सारख्या सामान्य खेळापासून प्रेमाच्या किचकट क्लिष्ट खेळांसारखे असू शकतात. प्रत्येक खेळाचे पडघम एकेका पटलावर आपला रंग सोडून जातो. त्यात अगदी प्रत्येक डावात किती भिडू चकले, कुणावर राज्य आले कुणी रडीचा डाव खेळला आणि माघार घेतली या सगळ्यांचं वर्णन असतं. मनाला शांत बसवत नाही ! पटलांवर ओढलेल्या रेषांवर चालता चालता रंगत जाणारा त्याचा अजून एक खेळ म्हणजे आठवणींच्या वर्तमानाशी जोड्या लावत बसणे. या खेळात त्याला कधी काय आठवेल याचा नेम नाही. माझ्या शहरातल्या घरात अशीच एकदा एक जोडी जुळवताना आमच्या वाड्याची आठवण आली. त्याच्या अंगणात एक प्राजक्ताचं झाड होतं ...
अंगणात आजीने माझ्या
लावले होते झाड प्राजक्ताचे
वृंदावन होते एक ,चौकात रंगवलेले
राधा कृष्णाला ,त्यावर गोंदवलेले
खुंटीवर असायची ,काळी छत्री बाबांची
आणि खोलीत पोथी माझ्या आजोबांची
रेंगाळलेले जीव ,काही पायरीवरती
वाळणाची आरास ,अशी कौलांवरती
आंब्याचा मोहोर ,सुकला ना कधी
कोकीळ दारचा ,मुकला ना कधी
गायी जायच्या ,पैलावर एकट्या
दिवस रात्रींचे ,सत्र तसे लीलया
रात्री चालती ,गोष्टी सुःख दुखांच्या
हलकेच येई ,चादरी चांदण्याच्या
रोज पडतसे ,प्राजक्ताचा सडा
स्वप्नातला गाव ,स्वप्नातला वाडा
सकाळी स्वप्न विरघळावे जसे
चक्र काळाचे फिरले जोराने तसे
आता उरले दगडांचे ढीग काही
कुंपण काटेरी बाभळाचे
अन जुनाट सुरकुतलेले
अंगणातले झाड प्राजक्ताचे !
लावले होते झाड प्राजक्ताचे
वृंदावन होते एक ,चौकात रंगवलेले
राधा कृष्णाला ,त्यावर गोंदवलेले
खुंटीवर असायची ,काळी छत्री बाबांची
आणि खोलीत पोथी माझ्या आजोबांची
रेंगाळलेले जीव ,काही पायरीवरती
वाळणाची आरास ,अशी कौलांवरती
आंब्याचा मोहोर ,सुकला ना कधी
कोकीळ दारचा ,मुकला ना कधी
गायी जायच्या ,पैलावर एकट्या
दिवस रात्रींचे ,सत्र तसे लीलया
रात्री चालती ,गोष्टी सुःख दुखांच्या
हलकेच येई ,चादरी चांदण्याच्या
रोज पडतसे ,प्राजक्ताचा सडा
स्वप्नातला गाव ,स्वप्नातला वाडा
सकाळी स्वप्न विरघळावे जसे
चक्र काळाचे फिरले जोराने तसे
आता उरले दगडांचे ढीग काही
कुंपण काटेरी बाभळाचे
अन जुनाट सुरकुतलेले
अंगणातले झाड प्राजक्ताचे !
' तिचा ' गुण
मन मनमानी करतं खरं , पण दर वेळेला त्याचे लाड पुरवले जातीलच याची हमी देता येत नाही. लाडीगोडी करण्यात तर मनाचा हात कोणी धरूच शकत नाही. लाडीगोडी करणाऱ्या प्रेयसीच्या मागण्या जशा थोड्या अल्लड थोड्या पोरकट आणि तितक्याच नाजूक असतात तशाच काहीशा मागण्या तरंगासारख्या उठणाऱ्या कवितेच्याही असतात. पण त्या कितीही बाळबोध वाटल्या तरी अगदी हव्या हव्याशा वाटतात. एकदा प्रेम म्हटलं की मनाचं रुसणं फुगण हसणं रागावणं आणि हळूच लाजणं हे ओघाने आलंच ! हळू हळू माझी कविता माझ्या मनाला प्रेमाच्या हक्क आणि हट्ट या दोन बाजूंनी जवळ घेतं. तेव्हा मनाला कविता आणि ' ती ' च्यात साम्य वाटू लागतं !
मन मनमानी करतं खरं , पण दर वेळेला त्याचे लाड पुरवले जातीलच याची हमी देता येत नाही. लाडीगोडी करण्यात तर मनाचा हात कोणी धरूच शकत नाही. लाडीगोडी करणाऱ्या प्रेयसीच्या मागण्या जशा थोड्या अल्लड थोड्या पोरकट आणि तितक्याच नाजूक असतात तशाच काहीशा मागण्या तरंगासारख्या उठणाऱ्या कवितेच्याही असतात. पण त्या कितीही बाळबोध वाटल्या तरी अगदी हव्या हव्याशा वाटतात. एकदा प्रेम म्हटलं की मनाचं रुसणं फुगण हसणं रागावणं आणि हळूच लाजणं हे ओघाने आलंच ! हळू हळू माझी कविता माझ्या मनाला प्रेमाच्या हक्क आणि हट्ट या दोन बाजूंनी जवळ घेतं. तेव्हा मनाला कविता आणि ' ती ' च्यात साम्य वाटू लागतं !
कधी सुंदर मोहक रसरसलेली
कधी चिडकी हट्टी आणि रुसलेली
क्षणात अशी क्षणात तशी
तू सांग मला तू आहेस कशी
नभांगणातून अवतरणारी
वीज धरणीला मिळे जशी
रानफुलाचे सुगंध तुझे
मनामानाचे बंध तुझे
हसणे तुझे रडणे तुझे कधी कठोर अबोले तुझे
दवबीन्दूंत नाहलेले उजळ रूप कोवळे तुझे
पैल तू पैलतीर तू
सांजवेळी गाऊन केव्हा
मला फसवण्या माहीर तू
नटणे तुझे मुरडणे तुझे
नवीन नूतन नखरे तुझे
फुलानाही लाज वाटावे
असे ग ओठ हसरे तुझे
कधी होतेस हास्यवेल
कधी होतेस गर्द कहाणी
एकटीच तेवणारी समई
कधी सुरांची होतेस राणी
हे आपले अबोल नाते
स्वर्गात घडवले आहे
म्हणूनच प्रेमाचे सारे अर्थ
विरहात दडवले आहे
आता ना एकटा मी
ना एकटी राहशील तू
शब्दात तुझ्या अडकलेल्या
मलाच पाहशील तू
या ' गूढ ' वागण्याचा ' अर्थ ' मला कधीचा कळून बसलाय
माझ्या कवितेलाही बहुदा ' तिचा ' गुण लागलाय !
कधी चिडकी हट्टी आणि रुसलेली
क्षणात अशी क्षणात तशी
तू सांग मला तू आहेस कशी
नभांगणातून अवतरणारी
वीज धरणीला मिळे जशी
रानफुलाचे सुगंध तुझे
मनामानाचे बंध तुझे
हसणे तुझे रडणे तुझे कधी कठोर अबोले तुझे
दवबीन्दूंत नाहलेले उजळ रूप कोवळे तुझे
पैल तू पैलतीर तू
सांजवेळी गाऊन केव्हा
मला फसवण्या माहीर तू
नटणे तुझे मुरडणे तुझे
नवीन नूतन नखरे तुझे
फुलानाही लाज वाटावे
असे ग ओठ हसरे तुझे
कधी होतेस हास्यवेल
कधी होतेस गर्द कहाणी
एकटीच तेवणारी समई
कधी सुरांची होतेस राणी
हे आपले अबोल नाते
स्वर्गात घडवले आहे
म्हणूनच प्रेमाचे सारे अर्थ
विरहात दडवले आहे
आता ना एकटा मी
ना एकटी राहशील तू
शब्दात तुझ्या अडकलेल्या
मलाच पाहशील तू
या ' गूढ ' वागण्याचा ' अर्थ ' मला कधीचा कळून बसलाय
माझ्या कवितेलाही बहुदा ' तिचा ' गुण लागलाय !
कसं ?
आयुष्याची वाट ही नागमोडी नसली तरच विशेष .. पण मनाच्या पटलांवर ज्याने या रेषा ओढलेल्या आहेत त्या मात्र या वाटांहून अधिक नागमोडी आणि विस्मयकारी ! आयुष्य प्रश्न विचारतं , कधी कधी त्यांची उत्तरं ही सापडतात. मनाला पडणारे प्रश्न म्हणजे या रेषांच्या कडेने ओघाने वाढलेले वृक्षच ... त्यांच्या अस्तित्वाबद्दल विचार करण्यापेक्षा त्यांच्या सावलीत बसणं हेच योग्य. काही प्रश्न तर असे की त्या प्रश्नातच उत्तर दडलेलं असतं .. किंवा कदाचित नसतंही. तेव्हा मी या प्रश्नोत्तरात अडकण्यापेक्षा एका प्रवाशासारखा थोडा वेळ सावलीत विसावा घेतो पुन्हा या रेषांवर चालण्यासाठी
कसे जन्मते, फुल ते
गर्भात या कळीच्या ?
कसा भ्रमर तो, झोपतो
ओच्यात पाकळीच्या ?
कसे बोलते, बाळ ते
बोबडे बालगीत ?
कसे नांदते, मुग्ध ते
संगीत बासरीत ?
कसा चंद्र तो, बांधतो
बंध तारांगणाशी ?
कसे सापडे, ते सडे
जाईचे अंगणाशी ?
कसे शोधतो, पक्षी तो
ते घरटे सांजवेळी ?
कसा सांडतो, जलधर तो
पाउस कोण्या अवेळी ?
कसा सांगतो, मोर तो
नाते मल्हाराशी ?
कसे वाहतो, सूर्य तो
किरणांच्या अमृतराशी?
कसे विहरते, मन ते
कल्पनांच्या दूर गावी ?
कशी रात्रही, आजही
स्वप्नांनी चिंब व्हावी ?
आयुष्याची वाट ही नागमोडी नसली तरच विशेष .. पण मनाच्या पटलांवर ज्याने या रेषा ओढलेल्या आहेत त्या मात्र या वाटांहून अधिक नागमोडी आणि विस्मयकारी ! आयुष्य प्रश्न विचारतं , कधी कधी त्यांची उत्तरं ही सापडतात. मनाला पडणारे प्रश्न म्हणजे या रेषांच्या कडेने ओघाने वाढलेले वृक्षच ... त्यांच्या अस्तित्वाबद्दल विचार करण्यापेक्षा त्यांच्या सावलीत बसणं हेच योग्य. काही प्रश्न तर असे की त्या प्रश्नातच उत्तर दडलेलं असतं .. किंवा कदाचित नसतंही. तेव्हा मी या प्रश्नोत्तरात अडकण्यापेक्षा एका प्रवाशासारखा थोडा वेळ सावलीत विसावा घेतो पुन्हा या रेषांवर चालण्यासाठी
कसे जन्मते, फुल ते
गर्भात या कळीच्या ?
कसा भ्रमर तो, झोपतो
ओच्यात पाकळीच्या ?
कसे बोलते, बाळ ते
बोबडे बालगीत ?
कसे नांदते, मुग्ध ते
संगीत बासरीत ?
कसा चंद्र तो, बांधतो
बंध तारांगणाशी ?
कसे सापडे, ते सडे
जाईचे अंगणाशी ?
कसे शोधतो, पक्षी तो
ते घरटे सांजवेळी ?
कसा सांडतो, जलधर तो
पाउस कोण्या अवेळी ?
कसा सांगतो, मोर तो
नाते मल्हाराशी ?
कसे वाहतो, सूर्य तो
किरणांच्या अमृतराशी?
कसे विहरते, मन ते
कल्पनांच्या दूर गावी ?
कशी रात्रही, आजही
स्वप्नांनी चिंब व्हावी ?
श्रावणवेडी
या माझ्या छोट्याशा भावविश्वात माझ्या मनाने एक आपलंच निराळं विश्व उभं केलंय. त्याच्या स्मृती पटलांमध्ये त्याने स्वतःच निर्माण केलेली काही पात्र आहेत , काही सावल्या आहेत. त्यांचं बाहेरच्या जगातल्या अस्तित्वाशी संबंध असेलच असं काही सांगता येत नाही. खरं तर प्रत्येक मनात एक छोटीशी परी लपलेली असते. तिचं बाहेरच्या जगात अस्तित्व असो वा नसो मन तिच्यावर प्रेम करत असतं. तिची नानाविध रूपं मनाला मोहून टाकत असतात. तेव्हा ताठ मानेने मन सांगतं "होय माझीही एक प्रेयसी आहे ". सगळ्यांच्या मनातल्या प्रेयसीप्रमाणे माझीही प्रेयसी मनाच्या अनेक पटलांची ओढणी पांघरून आहे. तिचे येणे म्हणजेच वसंत होवून जातो आणि कधी तर चक्क सकाळी सकाळी ती एक श्रावणवेडी बनून येते ..
या माझ्या छोट्याशा भावविश्वात माझ्या मनाने एक आपलंच निराळं विश्व उभं केलंय. त्याच्या स्मृती पटलांमध्ये त्याने स्वतःच निर्माण केलेली काही पात्र आहेत , काही सावल्या आहेत. त्यांचं बाहेरच्या जगातल्या अस्तित्वाशी संबंध असेलच असं काही सांगता येत नाही. खरं तर प्रत्येक मनात एक छोटीशी परी लपलेली असते. तिचं बाहेरच्या जगात अस्तित्व असो वा नसो मन तिच्यावर प्रेम करत असतं. तिची नानाविध रूपं मनाला मोहून टाकत असतात. तेव्हा ताठ मानेने मन सांगतं "होय माझीही एक प्रेयसी आहे ". सगळ्यांच्या मनातल्या प्रेयसीप्रमाणे माझीही प्रेयसी मनाच्या अनेक पटलांची ओढणी पांघरून आहे. तिचे येणे म्हणजेच वसंत होवून जातो आणि कधी तर चक्क सकाळी सकाळी ती एक श्रावणवेडी बनून येते ..
जाग आली पंखांना अन
जागा झाला दिनकरही
फुंकर घाली वाराही अन
जागा झाला जलधरही
कोवळ्या चोचींचे कोवळे
पहिले किलबिल गाणे
अंगणात परसात
फुलपाखराचे येणे जाणे
पातींच्या ओंजळीतला
पाउस अजून कालचा
त्यात खेळ अवतरे
बिलंदर इंद्रधनुचा
वेलीच्या कुंद तनुवर
शृंगार कळ्यांचे आगळे
बिलगलेले फांदीवरती
अल्लड पारवे जांभळे
गुलाबी आसमंत थोडा
किरणांची मौज थोडी
गालात लाजून आली
ती अवखळ श्रावणवेडी..
मनात बहरून आली
ती अवखळ श्रावणवेडी..
जागा झाला दिनकरही
फुंकर घाली वाराही अन
जागा झाला जलधरही
कोवळ्या चोचींचे कोवळे
पहिले किलबिल गाणे
अंगणात परसात
फुलपाखराचे येणे जाणे
पातींच्या ओंजळीतला
पाउस अजून कालचा
त्यात खेळ अवतरे
बिलंदर इंद्रधनुचा
वेलीच्या कुंद तनुवर
शृंगार कळ्यांचे आगळे
बिलगलेले फांदीवरती
अल्लड पारवे जांभळे
गुलाबी आसमंत थोडा
किरणांची मौज थोडी
गालात लाजून आली
ती अवखळ श्रावणवेडी..
मनात बहरून आली
ती अवखळ श्रावणवेडी..
"यशोदा"
मनाला देवपण नको असतं. मनाला माणसं हवी असतात. मनाला त्याची हक्काची माणसं हवी असतात, त्याची वाट बघणारी, थोडी भांडणारी, रागावणारी, लाड करणारी.
आपलं आयुष्य कसं असावं ? हा प्रश्न जर कुणी मनाला विचारला तर मन काय उत्तरं देतं सांगू ? कृष्णासारख ! देवपण मिळो न मिळो प्रत्येकाला आपलं लहानपण कृष्णासारख असावं असंच वाटतं. कुणाला तरी आपल्या बाल लीलांनी फसवून त्याची गम्मत बघायला मिळायला हवी होती असं वाटतं. कृष्णाचं आयुष्य खरं तर एका अवताराच आयुष्य आहे. पण मला आवडतं ते त्याचं लहानपण.. त्याच्या त्या लीला, त्याचे खेळ, सवंगडी, बासरी आणि त्याच्यावर सगळी पृथ्वी ओवाळून टाकणारी 'यशोदा'
मनाला देवपण नको असतं. मनाला माणसं हवी असतात. मनाला त्याची हक्काची माणसं हवी असतात, त्याची वाट बघणारी, थोडी भांडणारी, रागावणारी, लाड करणारी.
आपलं आयुष्य कसं असावं ? हा प्रश्न जर कुणी मनाला विचारला तर मन काय उत्तरं देतं सांगू ? कृष्णासारख ! देवपण मिळो न मिळो प्रत्येकाला आपलं लहानपण कृष्णासारख असावं असंच वाटतं. कुणाला तरी आपल्या बाल लीलांनी फसवून त्याची गम्मत बघायला मिळायला हवी होती असं वाटतं. कृष्णाचं आयुष्य खरं तर एका अवताराच आयुष्य आहे. पण मला आवडतं ते त्याचं लहानपण.. त्याच्या त्या लीला, त्याचे खेळ, सवंगडी, बासरी आणि त्याच्यावर सगळी पृथ्वी ओवाळून टाकणारी 'यशोदा'
आज पुन्हा पैलतीरी
ती होती हिरमुसलेली ,
कान्हा दिसेना तिजला
की नकळत सांज झाली
मन होते आसुसलेले
फुटला न आज पान्हा
उदास वासरासाठी
ही गाय गोठ्यामधली
कान्हा दिसेना ...
हात तिचा आज रिता
दहीभात सांडलेला
पिलू नाही घरट्यामध्ये
पक्षिणी घास घेऊन आली
कान्हा दिसेना ...
रक्ताची नाती खोटी सारी
मन तिचे सांगते आता
जन्म दिला नसेल जरी
पण आई जन्मास आली
कान्हा दिसेना ...
व्याकूळ झाली आज
की भगवंत दूर जावा
अन उष्ण झालेली पृथ्वी
डोळ्यात तिच्या उमटली
कान्हा दिसेना ...
ती होती हिरमुसलेली ,
कान्हा दिसेना तिजला
की नकळत सांज झाली
मन होते आसुसलेले
फुटला न आज पान्हा
उदास वासरासाठी
ही गाय गोठ्यामधली
कान्हा दिसेना ...
हात तिचा आज रिता
दहीभात सांडलेला
पिलू नाही घरट्यामध्ये
पक्षिणी घास घेऊन आली
कान्हा दिसेना ...
रक्ताची नाती खोटी सारी
मन तिचे सांगते आता
जन्म दिला नसेल जरी
पण आई जन्मास आली
कान्हा दिसेना ...
व्याकूळ झाली आज
की भगवंत दूर जावा
अन उष्ण झालेली पृथ्वी
डोळ्यात तिच्या उमटली
कान्हा दिसेना ...
माझा दीपस्तंभ !
पण .. हे सगळं स्वप्नातलं चांदण झालं की असं असतं तर काय आणि तसं असतं तर काय ?! एकदा डोळे उघडलेकी पुन्हा स्वप्नाहुन निराळं जग वास्तव बनून आ वासून उभं असतं. कधी आवडीने कधी निरुपायाने आयुष्याच्या रहाटगाड्यात स्वतःला झोकून द्यावं लागतं. जीवनाचे, समाजाचे नियम आणि अटी आपल्याला कळतात, या चौकटीची आपल्याला जाणीव असते. पण या मनाला कोण समजावणार. अशा वेळी मन अगदी लहान मुलासारखं होऊन जातं. हट्ट धरून बसतं. तेव्हा मात्र मी कासाविस होऊन जातो .. स्वतःपासून दूर पळून जायचा प्रयत्न करतो.. पण मन नसलं की सारं जग भयान वाटू लागतं. मग मी पुन्हा मनाच्या ओढीने मागे फिरतो अगदी खूप प्रयत्न करतो. मला वाटतं की मन अजूनही रागावलेलच असेल ... पण ते मात्र एका दीपस्तम्भासारखं किनारी उभं असतं .. मला दिशा दाखवत .. माझी वाट बघत !
पण .. हे सगळं स्वप्नातलं चांदण झालं की असं असतं तर काय आणि तसं असतं तर काय ?! एकदा डोळे उघडलेकी पुन्हा स्वप्नाहुन निराळं जग वास्तव बनून आ वासून उभं असतं. कधी आवडीने कधी निरुपायाने आयुष्याच्या रहाटगाड्यात स्वतःला झोकून द्यावं लागतं. जीवनाचे, समाजाचे नियम आणि अटी आपल्याला कळतात, या चौकटीची आपल्याला जाणीव असते. पण या मनाला कोण समजावणार. अशा वेळी मन अगदी लहान मुलासारखं होऊन जातं. हट्ट धरून बसतं. तेव्हा मात्र मी कासाविस होऊन जातो .. स्वतःपासून दूर पळून जायचा प्रयत्न करतो.. पण मन नसलं की सारं जग भयान वाटू लागतं. मग मी पुन्हा मनाच्या ओढीने मागे फिरतो अगदी खूप प्रयत्न करतो. मला वाटतं की मन अजूनही रागावलेलच असेल ... पण ते मात्र एका दीपस्तम्भासारखं किनारी उभं असतं .. मला दिशा दाखवत .. माझी वाट बघत !
कोण्या गर्द वेळी नाव माझी
घेऊन मी समुद्रात रे शिरलो
उघडून शिडाचे पंख उर्मीने
चौफेर दिशांना मी रे फिरलो
आज वादळाची होती चाहूल
विचारांचा आज कल्लोळ होता
भीतीच्या तरंगावर मातला
फसव्या धुळीचा लोळ होता
अथांग चंचल गहिरे पाणी
चंद्र मनाचा उमटला त्यात
रक्त पिपासू एक दैत्य मग
प्रतिबिंबात प्रकटला त्यात
निघालो होतो असा मात्र मी
माझ्याहून दूर देश जाया
आता शोधत होतो स्वतः ला
सावलीत मनाच्या निजाया
आता माझ्याचसाठी मनाची
पुसटशी किनार उरली
मन होता उभं दीपस्तंभापरी
मी किरणांनी ओंजळ भरली !
घेऊन मी समुद्रात रे शिरलो
उघडून शिडाचे पंख उर्मीने
चौफेर दिशांना मी रे फिरलो
आज वादळाची होती चाहूल
विचारांचा आज कल्लोळ होता
भीतीच्या तरंगावर मातला
फसव्या धुळीचा लोळ होता
अथांग चंचल गहिरे पाणी
चंद्र मनाचा उमटला त्यात
रक्त पिपासू एक दैत्य मग
प्रतिबिंबात प्रकटला त्यात
निघालो होतो असा मात्र मी
माझ्याहून दूर देश जाया
आता शोधत होतो स्वतः ला
सावलीत मनाच्या निजाया
आता माझ्याचसाठी मनाची
पुसटशी किनार उरली
मन होता उभं दीपस्तंभापरी
मी किरणांनी ओंजळ भरली !
चिकटपट्ट्या !
मनाची काही पटलं जरा दूर केली की समोर येतं मनाची स्वतःवरच प्रेम करण्याची प्रवृत्ती. स्वाभिमान तसा जड शब्द असला तरी तो प्रत्येक मनात असतो. मला बरेचदा प्रश्न पडतो की या प्रेमाखातर या स्वाभिमानाखातर कोणी कोणाची मदतच नाकारत असेल तर ? तेव्हा मन तडजोड करायला लागतं, शिकतं. तेव्हा ते मन सगळे तुकडे जोडायचा प्रयत्न करतं. मनाला याचंच समाधान मिळत रहात की ते स्वतंत्र आहे , त्याला कोणाचं मिंध नाही. या सगळ्याची परिसीमा म्हणजे त्याला याचा अंदाजच रहात नाही आणि एकदा कधीतरी जेव्हा तो स्वतःकडे मागे वळून बघतो तेव्हा फक्त जोडून जोडून केलेला संसार दिसतो ... तुकडे तुकडे जोडलेलं स्वतःचच मन दिसायला लागतं.
मनाची काही पटलं जरा दूर केली की समोर येतं मनाची स्वतःवरच प्रेम करण्याची प्रवृत्ती. स्वाभिमान तसा जड शब्द असला तरी तो प्रत्येक मनात असतो. मला बरेचदा प्रश्न पडतो की या प्रेमाखातर या स्वाभिमानाखातर कोणी कोणाची मदतच नाकारत असेल तर ? तेव्हा मन तडजोड करायला लागतं, शिकतं. तेव्हा ते मन सगळे तुकडे जोडायचा प्रयत्न करतं. मनाला याचंच समाधान मिळत रहात की ते स्वतंत्र आहे , त्याला कोणाचं मिंध नाही. या सगळ्याची परिसीमा म्हणजे त्याला याचा अंदाजच रहात नाही आणि एकदा कधीतरी जेव्हा तो स्वतःकडे मागे वळून बघतो तेव्हा फक्त जोडून जोडून केलेला संसार दिसतो ... तुकडे तुकडे जोडलेलं स्वतःचच मन दिसायला लागतं.
आधी त्याने चिकटपट्टीने
खिडकीच्या तुटलेल्या काचा जोडल्या
नंतर खिडकी शेजारच्या
खुर्चीचे पाय चिकटपट्टीने जोडले
फाटके वेळापत्रक त्याने
भिंतीवर चिकटपट्टीने चिकटवले
जुन्या घड्याळाचे काटे
मुश्किलीने चिकटपट्टीने अडकवले
लाकडी हत्तीची तुटलेली सोंड
चिकटपट्टीने योग्य जागी बसवली
दुभंगलेल्या पेनाचे तुकडे
चिकटपट्टीने पुन्हा एकत्र केले
आजूबाजूच्या लोकांची तोंडे
चिकटपट्टीने बंद करावीशीही त्याला वाटलं
जे जे काही तुटले फुटले होते
सगळं चिकटपट्टीने जोडून टाकलं
त्याला प्रश्न पडला तुकडे तुकडे
झालेलं आभाळ चिकटपट्टीने जोडता आले तर ?..
याच विचारात तो बाहेर आला
अचानक घराकडे वळून पाहिलं तर
घराला फक्त चिकटपट्ट्या .. चिकटपट्ट्या .. आणि चिकटपट्ट्या !
खिडकीच्या तुटलेल्या काचा जोडल्या
नंतर खिडकी शेजारच्या
खुर्चीचे पाय चिकटपट्टीने जोडले
फाटके वेळापत्रक त्याने
भिंतीवर चिकटपट्टीने चिकटवले
जुन्या घड्याळाचे काटे
मुश्किलीने चिकटपट्टीने अडकवले
लाकडी हत्तीची तुटलेली सोंड
चिकटपट्टीने योग्य जागी बसवली
दुभंगलेल्या पेनाचे तुकडे
चिकटपट्टीने पुन्हा एकत्र केले
आजूबाजूच्या लोकांची तोंडे
चिकटपट्टीने बंद करावीशीही त्याला वाटलं
जे जे काही तुटले फुटले होते
सगळं चिकटपट्टीने जोडून टाकलं
त्याला प्रश्न पडला तुकडे तुकडे
झालेलं आभाळ चिकटपट्टीने जोडता आले तर ?..
याच विचारात तो बाहेर आला
अचानक घराकडे वळून पाहिलं तर
घराला फक्त चिकटपट्ट्या .. चिकटपट्ट्या .. आणि चिकटपट्ट्या !
दोष
काही घटना अशा असतात की तेव्हा मन स्वतःलाच सहानुभूती देतं की तुटक फुटक का होईना पण देवाने आपल्या पदरात आयुष्य दिलेलं आहे. या आयुष्यात जोडून जोडून केलेलं का होईना एक संसार असतो, एक कुटुंब असतं. मुठीत मावेल एवढ एक घर असतं. घरात ठिगळ लावलेली का असेना पण मायेची एक चादर असते, दहा ठिकाणी गाठी मारून मारून लांब केलेला एक प्रेमाचा धागा असतो. काहींना थोडं कमी मिळतं काहींना थोडं जास्त ... ज्यांना यातलं काहीच मिळत नाही त्यांच काय ? काही जीवांना जन्मच लाभात नाही त्यांच काय? त्यांच्या इवल्याशा मनाने रंगवलेल्या इवल्याशा विश्वाच काय ? त्यांच्या स्वप्नांच काय ? अशा वेळी कोणाला दोष देणार देवाला ? नशीबाला ? गतजन्मीच्या पापांना ? की साक्षात जन्मदात्या आईला ? अशाच एका फुलाबद्दल मनाच्या एका पटलावर प्रश्नांचे डाग पडलेत ज्याला गर्भात असतानाच देवाने परत बोलावून घेतलं...
काही घटना अशा असतात की तेव्हा मन स्वतःलाच सहानुभूती देतं की तुटक फुटक का होईना पण देवाने आपल्या पदरात आयुष्य दिलेलं आहे. या आयुष्यात जोडून जोडून केलेलं का होईना एक संसार असतो, एक कुटुंब असतं. मुठीत मावेल एवढ एक घर असतं. घरात ठिगळ लावलेली का असेना पण मायेची एक चादर असते, दहा ठिकाणी गाठी मारून मारून लांब केलेला एक प्रेमाचा धागा असतो. काहींना थोडं कमी मिळतं काहींना थोडं जास्त ... ज्यांना यातलं काहीच मिळत नाही त्यांच काय ? काही जीवांना जन्मच लाभात नाही त्यांच काय? त्यांच्या इवल्याशा मनाने रंगवलेल्या इवल्याशा विश्वाच काय ? त्यांच्या स्वप्नांच काय ? अशा वेळी कोणाला दोष देणार देवाला ? नशीबाला ? गतजन्मीच्या पापांना ? की साक्षात जन्मदात्या आईला ? अशाच एका फुलाबद्दल मनाच्या एका पटलावर प्रश्नांचे डाग पडलेत ज्याला गर्भात असतानाच देवाने परत बोलावून घेतलं...
उमलत्या फुलांना खुडतात कोणी
पाकळ्यांना त्या तोडतात कोणी ,
वाहून नेले वादळाने कळीला
त्याला दोष कोण द्यावा ?
देवाचे वागणे अन्यायीच असते
एखादीच घागर भरलेली असते ,
पुरात वाहून जातात काही
त्याला दोष कोण द्यावा ?
जगतात पांगळे इथे जीव थोडे
प्रारब्धात बुडतात सगळे थोडे ,
दिसलाच नाही सूर्य काहींना
त्याला दोष कोण द्यावा ?
दिवसाची करून रात्र तिने
ज्योत आणली तुझ्या घरची ,
ती गर्भात मालवून जावी
त्याला दोष कोण द्यावा?
पाकळ्यांना त्या तोडतात कोणी ,
वाहून नेले वादळाने कळीला
त्याला दोष कोण द्यावा ?
देवाचे वागणे अन्यायीच असते
एखादीच घागर भरलेली असते ,
पुरात वाहून जातात काही
त्याला दोष कोण द्यावा ?
जगतात पांगळे इथे जीव थोडे
प्रारब्धात बुडतात सगळे थोडे ,
दिसलाच नाही सूर्य काहींना
त्याला दोष कोण द्यावा ?
दिवसाची करून रात्र तिने
ज्योत आणली तुझ्या घरची ,
ती गर्भात मालवून जावी
त्याला दोष कोण द्यावा?
मला काय करायचंय ?
काही काही प्रश्नांना खरच माणसाकडे उत्तर नसतं. पण स्वतःवर अतोनात प्रेम करणारं मन देखील कधी कधी कुपमंडूक वृत्तीचं बनून जातं. अशा वेळी उत्तरं असून देखील ती सांगण्याची तयारी न दाखवणे किंवा उत्तरं शोधण्याचेही कष्ट न घेणे ही त्या मनाची आणि बहुतेक मने स्वतःवर खूप जास्त प्रेम करणारी असल्या कारणाने पर्यायाने समाजाची प्रवृत्ती बनून जाते. मी त्याला स्वार्थ म्हणत नाही कारण स्वार्थ ही पूर्ण जाणून बुजून अंगीकारण्याची वस्तू आहे, आजकालची 'मला काय करायचंय ?' विचारणारी मने हे कुपमंडूक वृत्तीचे बळी. दुसऱ्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवायची ताकद असूनही केवळ आजूबाजूला डोळे उघडून न बघणारे कधी कधी स्वतःच अशा प्रश्नात अडकतात तेव्हा त्यांनाही हेच उत्तर मिळतं ... 'मला काय करायचंय ?'
काही काही प्रश्नांना खरच माणसाकडे उत्तर नसतं. पण स्वतःवर अतोनात प्रेम करणारं मन देखील कधी कधी कुपमंडूक वृत्तीचं बनून जातं. अशा वेळी उत्तरं असून देखील ती सांगण्याची तयारी न दाखवणे किंवा उत्तरं शोधण्याचेही कष्ट न घेणे ही त्या मनाची आणि बहुतेक मने स्वतःवर खूप जास्त प्रेम करणारी असल्या कारणाने पर्यायाने समाजाची प्रवृत्ती बनून जाते. मी त्याला स्वार्थ म्हणत नाही कारण स्वार्थ ही पूर्ण जाणून बुजून अंगीकारण्याची वस्तू आहे, आजकालची 'मला काय करायचंय ?' विचारणारी मने हे कुपमंडूक वृत्तीचे बळी. दुसऱ्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवायची ताकद असूनही केवळ आजूबाजूला डोळे उघडून न बघणारे कधी कधी स्वतःच अशा प्रश्नात अडकतात तेव्हा त्यांनाही हेच उत्तर मिळतं ... 'मला काय करायचंय ?'
तीच सकाळ , तोच रस्ता
कालच इथे एक मोर्चा झाला होता ,
यातच एका खड्यात पाय अडकून
एक माणूस पडला होता
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
तेच वर्तमानपत्र ,तीच
येऊन ठेपलेली आणीबाणी होती
थोडी महिलांची
थोडी वृद्धांची रडगाणी होती
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
पुन्हा कचेरीत जायचं होत
कामगारांचा संप झाला होता ,
मी परत घरी निघालो
माझा पगार तर झाला होता !
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
पुन्हा तीच चर्चा
खर कोण आणि कोण खोट ?
की त्या नेत्यांच आणि
संघटनांच साटलोट !
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
तीच वाटेतली झोपडपट्टी
मवाल्यांनी चौक भरला होता
तिथेच एका गाडी शेजारी
एका पोराने कटोरा धरला होता
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
दुर्लक्ष केल , खुश होतो , की
मी या सगळ्यातून सुटलो ,
आणि त्याच रस्त्यात
खड्यात पाय अडकून पडलो
मला आवाज आला , " मला काय करायचंय ?! "
कालच इथे एक मोर्चा झाला होता ,
यातच एका खड्यात पाय अडकून
एक माणूस पडला होता
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
तेच वर्तमानपत्र ,तीच
येऊन ठेपलेली आणीबाणी होती
थोडी महिलांची
थोडी वृद्धांची रडगाणी होती
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
पुन्हा कचेरीत जायचं होत
कामगारांचा संप झाला होता ,
मी परत घरी निघालो
माझा पगार तर झाला होता !
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
पुन्हा तीच चर्चा
खर कोण आणि कोण खोट ?
की त्या नेत्यांच आणि
संघटनांच साटलोट !
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
तीच वाटेतली झोपडपट्टी
मवाल्यांनी चौक भरला होता
तिथेच एका गाडी शेजारी
एका पोराने कटोरा धरला होता
मी म्हणालो , मला काय करायचंय ?!
दुर्लक्ष केल , खुश होतो , की
मी या सगळ्यातून सुटलो ,
आणि त्याच रस्त्यात
खड्यात पाय अडकून पडलो
मला आवाज आला , " मला काय करायचंय ?! "
एका अश्वाचे मनोगत !
नाईलाज .. मनाची अनेक पटले या नाईलाजामुळे दबलेली असतात, हिरमुसलेली असतात. ही पटले म्हणजे दगडासारखी कठोर, काट्यासारखी बोचरी आणि उदासीनतेच्या विषाने थबथबलेली असतात. आजूबाजूच्या घटनांना काही इलाज नसेल तेव्हा खोल खोल ठेवलेली ही पटले कोणीतरी उकलून काढतंय असं वाटतं. परिस्थितीला उत्तरं नसेल तर एक वेळ नाइलाजाचा अर्थ समजतो पण जर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना उत्तरं असतील किंवा घडून गेलेल्या घटनांना कोणी जबाबदार असेल तर, नाईलाजानेच त्या गोष्टी कराव्या लागल्या असतील तर मन अगदी विषण्ण होऊन जाते. मी कधी कधी कल्पना करतो की महाभारत जेव्हा घडून गेलं असेल तेव्हा कुरुक्षेत्रावर बसून आणि आजूबाजूचा सर्वनाश बघून कृष्णाला काय वाटत असेल ? त्याला त्रयस्थपणे बघणाऱ्या त्याच्या रथाच्या अश्वाला काय वाटलं असेल ?
नाईलाज .. मनाची अनेक पटले या नाईलाजामुळे दबलेली असतात, हिरमुसलेली असतात. ही पटले म्हणजे दगडासारखी कठोर, काट्यासारखी बोचरी आणि उदासीनतेच्या विषाने थबथबलेली असतात. आजूबाजूच्या घटनांना काही इलाज नसेल तेव्हा खोल खोल ठेवलेली ही पटले कोणीतरी उकलून काढतंय असं वाटतं. परिस्थितीला उत्तरं नसेल तर एक वेळ नाइलाजाचा अर्थ समजतो पण जर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना उत्तरं असतील किंवा घडून गेलेल्या घटनांना कोणी जबाबदार असेल तर, नाईलाजानेच त्या गोष्टी कराव्या लागल्या असतील तर मन अगदी विषण्ण होऊन जाते. मी कधी कधी कल्पना करतो की महाभारत जेव्हा घडून गेलं असेल तेव्हा कुरुक्षेत्रावर बसून आणि आजूबाजूचा सर्वनाश बघून कृष्णाला काय वाटत असेल ? त्याला त्रयस्थपणे बघणाऱ्या त्याच्या रथाच्या अश्वाला काय वाटलं असेल ?
जे चक्र भगवंताने आणिले मागे
कर्म धर्म माणसाचे जाहले जागे
धावलो पुढे मी उधळून चौफेर
कर्मयुगाचा एका कराया अखेर
रक्त पिण्या सज्ज झाले उर शरांचे
बघता बघता झाडले प्राण ते करांचे
उन्मळले धर्म वादळात ते वृक्ष
काळसर्पाने केले माणसांना भक्ष
मी धावलो भयाने आसुडतालावरी
हाकतो आवेशे तो सारथी चक्रधारी
कैक दिवसांचे गळाले अणू रेणू
चित्कारले त्वेषाने शन्खातले वेणू
घायाळ पृथ्वीचे रक्त तुडवीत होतो
भंगलेले अंग प्राणांचे उडवीत होतो
लागला बाण मलाही, झाला घाव एक
अमृत झरे जखमांतून हीच त्याची मेख
कोण्या सांजवेळी थांबला बेभान वारा
समोर अभंग अंत , जीवनाचा पसारा
धर्माच्या रक्षणाला मृत्यूचे मांडले तांडव
द्रौपदीच्या चिंधीसाठी विजयी झाले पांडव
पृथ्वीच्या कोपऱ्यात झेंडा फडकत होता
एकटा भगवंत तो गंगाजल पाजत होता
आहे नशीबवंत की सत्याचा वाहक
धर्म तरो कर्म तरो
तरो कुणाच्या प्रतिज्ञा
सत्यसूर्याचे आशीर्वाद मात्र दाहक !
कर्म धर्म माणसाचे जाहले जागे
धावलो पुढे मी उधळून चौफेर
कर्मयुगाचा एका कराया अखेर
रक्त पिण्या सज्ज झाले उर शरांचे
बघता बघता झाडले प्राण ते करांचे
उन्मळले धर्म वादळात ते वृक्ष
काळसर्पाने केले माणसांना भक्ष
मी धावलो भयाने आसुडतालावरी
हाकतो आवेशे तो सारथी चक्रधारी
कैक दिवसांचे गळाले अणू रेणू
चित्कारले त्वेषाने शन्खातले वेणू
घायाळ पृथ्वीचे रक्त तुडवीत होतो
भंगलेले अंग प्राणांचे उडवीत होतो
लागला बाण मलाही, झाला घाव एक
अमृत झरे जखमांतून हीच त्याची मेख
कोण्या सांजवेळी थांबला बेभान वारा
समोर अभंग अंत , जीवनाचा पसारा
धर्माच्या रक्षणाला मृत्यूचे मांडले तांडव
द्रौपदीच्या चिंधीसाठी विजयी झाले पांडव
पृथ्वीच्या कोपऱ्यात झेंडा फडकत होता
एकटा भगवंत तो गंगाजल पाजत होता
आहे नशीबवंत की सत्याचा वाहक
धर्म तरो कर्म तरो
तरो कुणाच्या प्रतिज्ञा
सत्यसूर्याचे आशीर्वाद मात्र दाहक !