मला तसं अजून पुरेसं कळलेलं नाहीये की माझं चालण कुठे सुरु झालंय आणि ते कुठे थांबणार ! माझ्या दैनंदिन शिक्षणापलीकडे काही आहे जे ही मला अजून पुरेसं ज्ञात नाही. माझ्या सूक्ष्म मन पटलांवर कोणीतरी काही रेषा ओढलेल्या आहेत , त्यांना रस्ते मानून मी चालत आहे. या रेषांची वळणे स्तिमित करणारी आहेत आणि मला चालण्यावाचून गत्यंतर नाही. म्हणून क्षणा क्षणांना मी या वाटांवर माझ्या मनाचे अणू रेणू उधळत जातो. याच अणू रेणूंची एक ओंजळ मी भरून आणली आहे...