आई..
मला बरेचदा झोप न येण्याचा त्रास होतो ..आपल्या मनावर.. अगदी त्याच्या जन्मापासून एक अत्यंत तरल पण अविचल असं एक पटलं असतं ते म्हणजे आई. दुर्दैवाने ज्यांना आई नाही त्यांच्याही मनावर आईची एक निराळीच छबी असते. आईशी ताटातूट .. मग ती जागतिकीकरणाने असो नाहीतर दैवाने केलेली असो नेहमीच त्रासदायक असते. आई पासून दूर आलेल्या (अगर झालेल्या ! ) मुलाला झोप थोडी कमीच लागते. त्याला स्वप्नात त्याची आई ही फक्त त्याचीच आई न दिसता एक आदिमाया म्हणून दिसत असते.. तो तिच्याकडे जाऊ शकत नाही हे शल्य त्याला छळत असतं.. त्यामुळे त्याला सगळीकडे ती आई त्याला बोलावताना दिसते !
रोज सांजेचा स्वताला
खोलीत झाकून घेतो
अन आठवणींचा वारा
खिडकीत डोकवून जातो
तुझ्याच ज्योतीखाली
अंधार मला ग जपतो
रांगणारा बाळ तुझा
कोपऱ्यात गुडूप लपतो
दूर तुझे ग घरटे
सर्पासम लांब वाटा
श्वासात बालपणाचा
मज दंशतो ग काटा
विश्वाच्या बाजाराला
मी रोज मनाला विकतो
रक्तात गोठलेला
आक्रोश मात्र टिकतो
आसवांनी माझ्या जरी
ओंजळ भरली नाही
पण भिजली नाही अशी
पापणीही उरली नाही
आवेश पावसाचा
कौलांवर निनाद करतो
ओल्याशा भिंतीवरती
चेहरा एक उतरतो
रात्र उतरतानाही
होतात भिंतीही चिंब
चेहरा ओळखीचा
की माझेच ते प्रतिबिंब !
तो चेहरा मला विचारी
तू झोपत का रे नाही ?
रात्री स्वप्नात माझ्या
बोलावते मज आई ..
मला बरेचदा झोप न येण्याचा त्रास होतो ..आपल्या मनावर.. अगदी त्याच्या जन्मापासून एक अत्यंत तरल पण अविचल असं एक पटलं असतं ते म्हणजे आई. दुर्दैवाने ज्यांना आई नाही त्यांच्याही मनावर आईची एक निराळीच छबी असते. आईशी ताटातूट .. मग ती जागतिकीकरणाने असो नाहीतर दैवाने केलेली असो नेहमीच त्रासदायक असते. आई पासून दूर आलेल्या (अगर झालेल्या ! ) मुलाला झोप थोडी कमीच लागते. त्याला स्वप्नात त्याची आई ही फक्त त्याचीच आई न दिसता एक आदिमाया म्हणून दिसत असते.. तो तिच्याकडे जाऊ शकत नाही हे शल्य त्याला छळत असतं.. त्यामुळे त्याला सगळीकडे ती आई त्याला बोलावताना दिसते !
रोज सांजेचा स्वताला
खोलीत झाकून घेतो
अन आठवणींचा वारा
खिडकीत डोकवून जातो
तुझ्याच ज्योतीखाली
अंधार मला ग जपतो
रांगणारा बाळ तुझा
कोपऱ्यात गुडूप लपतो
दूर तुझे ग घरटे
सर्पासम लांब वाटा
श्वासात बालपणाचा
मज दंशतो ग काटा
विश्वाच्या बाजाराला
मी रोज मनाला विकतो
रक्तात गोठलेला
आक्रोश मात्र टिकतो
आसवांनी माझ्या जरी
ओंजळ भरली नाही
पण भिजली नाही अशी
पापणीही उरली नाही
आवेश पावसाचा
कौलांवर निनाद करतो
ओल्याशा भिंतीवरती
चेहरा एक उतरतो
रात्र उतरतानाही
होतात भिंतीही चिंब
चेहरा ओळखीचा
की माझेच ते प्रतिबिंब !
तो चेहरा मला विचारी
तू झोपत का रे नाही ?
रात्री स्वप्नात माझ्या
बोलावते मज आई ..
स्थितप्रज्ञ, कर्मयोगी आणि नियती !
माणूस म्हटला की भावना आल्याच, भावना आली की स्नेह आला, स्नेह आला की क्रोध आला, क्रोध आला की मत्सर आला, मत्सर आला की प्रतिशोध आला, प्रतिशोध आला की पश्चाताप आला, पश्चाताप आला की अपराध भाव आला ... हे सत्र सुरूच रहात ! आपान आतापर्यंत दोन जीवन मूल्यांना श्रेष्ठ मानत आलेलो आहोत ती म्हणजे स्थितप्रज्ञता आणि कर्मयोग. या दोघांमुळे आयुष्य सफल होतं वगैरे वगैरे ... पण या सगळ्या तात्विक घोताल्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातो ती म्हणजे नियती ! सुख आणि दुःख याना समान मानणारा स्थितप्रज्ञ आणि केवळ कर्म करण्यासाठी जन्माला आलेला कर्मयोगी म्हणजे "कृष्ण" .. कृष्ण तर भगवानाचा अवतार नव्हे साक्षात भगवानच ! पण तरीही नियती आहेच तरीही कृष्ण शापित झालाच !
खडकाच्या खोल कुशीत
रानफुलाने छोट्या
पसरून आपले बाहू
श्वासात गंध भरला
अभिमान होता फुलाला
पण हात जोडले होते
"अनंताचाच मी अंश"
नभाला थेट म्हणाला !
ऐकून फुलाचे उत्तर
क्रोध नभाला आला
जलस्तंभ दूत नभाचा
आवेशे धावुनी गेला
सहस्त्र वीजांनी तेव्हा
नियतीचे घेऊन विष
प्रतीशोधाग्नी चेतवून
सावज अलगद धरला
धरणी होती निश्चल
मायेत अडकली होती
मातीच्या अंगावरती
वज्राचा प्रहार झाला
जखमी झाली धरणी
बाळे तिची बुडाली
फुलही वाहून गेले ... अन
खडक एकटा उरला ..
स्थितप्रज्ञ कर्मयोगी
नियतीचे दोघे गुलाम
अवतार जन्मला तरीही
शापित कृष्ण झाला !
माणूस म्हटला की भावना आल्याच, भावना आली की स्नेह आला, स्नेह आला की क्रोध आला, क्रोध आला की मत्सर आला, मत्सर आला की प्रतिशोध आला, प्रतिशोध आला की पश्चाताप आला, पश्चाताप आला की अपराध भाव आला ... हे सत्र सुरूच रहात ! आपान आतापर्यंत दोन जीवन मूल्यांना श्रेष्ठ मानत आलेलो आहोत ती म्हणजे स्थितप्रज्ञता आणि कर्मयोग. या दोघांमुळे आयुष्य सफल होतं वगैरे वगैरे ... पण या सगळ्या तात्विक घोताल्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातो ती म्हणजे नियती ! सुख आणि दुःख याना समान मानणारा स्थितप्रज्ञ आणि केवळ कर्म करण्यासाठी जन्माला आलेला कर्मयोगी म्हणजे "कृष्ण" .. कृष्ण तर भगवानाचा अवतार नव्हे साक्षात भगवानच ! पण तरीही नियती आहेच तरीही कृष्ण शापित झालाच !
खडकाच्या खोल कुशीत
रानफुलाने छोट्या
पसरून आपले बाहू
श्वासात गंध भरला
अभिमान होता फुलाला
पण हात जोडले होते
"अनंताचाच मी अंश"
नभाला थेट म्हणाला !
ऐकून फुलाचे उत्तर
क्रोध नभाला आला
जलस्तंभ दूत नभाचा
आवेशे धावुनी गेला
सहस्त्र वीजांनी तेव्हा
नियतीचे घेऊन विष
प्रतीशोधाग्नी चेतवून
सावज अलगद धरला
धरणी होती निश्चल
मायेत अडकली होती
मातीच्या अंगावरती
वज्राचा प्रहार झाला
जखमी झाली धरणी
बाळे तिची बुडाली
फुलही वाहून गेले ... अन
खडक एकटा उरला ..
स्थितप्रज्ञ कर्मयोगी
नियतीचे दोघे गुलाम
अवतार जन्मला तरीही
शापित कृष्ण झाला !
ती होडी ..
नियतीवर कुणाचा अंकुश नसतो हे खरेच आहे. पण म्हणून नियतीने एखाद्या राक्षसासारखे आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत सुटावे असे नाही. नियतीने अंत केलेल्या अनेक जीवांना मी बघितले आहे. त्यांपैकी अनेक जीव हे महात्मे नसले तरीही वाईटही नव्हते. असा कुठल्या चांगल्या जीवाचा वा त्याच्या स्वप्नाचा अंत झालेला बघितलं की नियती अक्राळ विक्राळ हसताना मला दिसते. तेव्हा तिचा फार राग येतो. तेव्हा नियती रक्तपिपासू भयानक दैत्यासारखी दिसते. पण एखाद्या जीवाला साखळीने बांधून त्याची पोहोच जिथे संपते त्यापासून अगदी जवळ , जिथून तो जीव सहज पाहू शकतो अशा अंतरावर त्याचे स्वप्न ठेऊन गम्मत बघत बसणे हा नियतीचा खेळ त्या स्वप्नाच्या आणि जीवाच्या हत्येपेक्षाही क्रूर !
नियतीवर कुणाचा अंकुश नसतो हे खरेच आहे. पण म्हणून नियतीने एखाद्या राक्षसासारखे आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत सुटावे असे नाही. नियतीने अंत केलेल्या अनेक जीवांना मी बघितले आहे. त्यांपैकी अनेक जीव हे महात्मे नसले तरीही वाईटही नव्हते. असा कुठल्या चांगल्या जीवाचा वा त्याच्या स्वप्नाचा अंत झालेला बघितलं की नियती अक्राळ विक्राळ हसताना मला दिसते. तेव्हा तिचा फार राग येतो. तेव्हा नियती रक्तपिपासू भयानक दैत्यासारखी दिसते. पण एखाद्या जीवाला साखळीने बांधून त्याची पोहोच जिथे संपते त्यापासून अगदी जवळ , जिथून तो जीव सहज पाहू शकतो अशा अंतरावर त्याचे स्वप्न ठेऊन गम्मत बघत बसणे हा नियतीचा खेळ त्या स्वप्नाच्या आणि जीवाच्या हत्येपेक्षाही क्रूर !
हेलकावे खात होती
ती
किनारा पहात होती
तिचे पाय जखडले
साखळ्यांनी तळाशी
विरहाची गाठ बसली
तिच्या मुक्त मनाशी
पुढे येत नव्हती
ना मागे जात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती
लाटा धडकल्या तिला
शरीराचे तुकडे उडले
अश्रुंचे थेंब तिचे
खाऱ्या पाण्यात पडले
त्याची एक लकेर
दूरवर वहात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती
तिच्या शिडाच्या पदरी
ठीगळांचे जाळे होते
बाहुंच्या वल्हवांचे
तळवेही काळे होते
आठवण म्हणून उरली
वाळू उरात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती
तुटल्या फुटल्यांनाही
सापडले थेट किनारे
अजाण भरकटल्यांना
साथीला होते वारे
तिची एकटी हाक
कानावर येत होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती
किनारा होता निश्चल ती पसरून हात होती
ती ... हेलकावे खात होती !
ती
किनारा पहात होती
तिचे पाय जखडले
साखळ्यांनी तळाशी
विरहाची गाठ बसली
तिच्या मुक्त मनाशी
पुढे येत नव्हती
ना मागे जात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती
लाटा धडकल्या तिला
शरीराचे तुकडे उडले
अश्रुंचे थेंब तिचे
खाऱ्या पाण्यात पडले
त्याची एक लकेर
दूरवर वहात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती
तिच्या शिडाच्या पदरी
ठीगळांचे जाळे होते
बाहुंच्या वल्हवांचे
तळवेही काळे होते
आठवण म्हणून उरली
वाळू उरात होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती
तुटल्या फुटल्यांनाही
सापडले थेट किनारे
अजाण भरकटल्यांना
साथीला होते वारे
तिची एकटी हाक
कानावर येत होती
हेलकावे खात होती .. ती .. हेलकावे खात होती
किनारा होता निश्चल ती पसरून हात होती
ती ... हेलकावे खात होती !
"अश्वत्थामा"
'जैसी करनी वैसी भरनी' हे खरच आहे. पण माणसाला कधी कधी अशा शाप मिळतो की लोकं त्यासाठी सगळा आटापिटा करत असतात. त्या गोष्टीला शाप बनवते माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती. ज्या अमरात्वासाठी अनंत देव दानव माणसं यांनी आयुष्य घालवलं तेच अमरत्व अश्वत्थामाला शाप म्हणून मिळालं ! अश्वत्थामा आता कदाचित त्याच्या या आयुष्याला कंटाळला असेल... या शापातून मुक्त होणं म्हणजे मरण मागणे ! जर मरण हीच त्याच्या जगण्याची आशा झाली असेल तर ?!
दाही दिशांचा निर्वंश
गळ्याला फास आता
मागून घेतो भुकेल्या
घारींचे भास आता
वितळू दे प्रतिमा आता
तोडून टाका दर्पणे
अस्वस्थ मजला भासे
मलाच माझे हसणे
उघडून टाका खिडक्या
अंधार दाटला आहे
भिंतीवर सावल्यांचा
श्वास कोंडला आहे
संध्येच्या पैलतीराला
रात्रीची गर्द किनार
मी होतो चकोर, गगनी
मेघांची क्रूर मिनार
रक्ताच्या थेंबात माझ्या
अंश येतो मत्सरी
सर्वनाश दिसता कसा तू
हातात घेतो बासरी
ती फुंकर मला तू दे रे
हुंकार मिळू दे त्याचा
ज्योत उरली एक
तू प्राण राख समईचा
अमरत्व नको मज आता
नको दिव्य तो मणीही
युद्धात "अश्वत्थामा"
आता न हो कुणीही
'जैसी करनी वैसी भरनी' हे खरच आहे. पण माणसाला कधी कधी अशा शाप मिळतो की लोकं त्यासाठी सगळा आटापिटा करत असतात. त्या गोष्टीला शाप बनवते माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती. ज्या अमरात्वासाठी अनंत देव दानव माणसं यांनी आयुष्य घालवलं तेच अमरत्व अश्वत्थामाला शाप म्हणून मिळालं ! अश्वत्थामा आता कदाचित त्याच्या या आयुष्याला कंटाळला असेल... या शापातून मुक्त होणं म्हणजे मरण मागणे ! जर मरण हीच त्याच्या जगण्याची आशा झाली असेल तर ?!
दाही दिशांचा निर्वंश
गळ्याला फास आता
मागून घेतो भुकेल्या
घारींचे भास आता
वितळू दे प्रतिमा आता
तोडून टाका दर्पणे
अस्वस्थ मजला भासे
मलाच माझे हसणे
उघडून टाका खिडक्या
अंधार दाटला आहे
भिंतीवर सावल्यांचा
श्वास कोंडला आहे
संध्येच्या पैलतीराला
रात्रीची गर्द किनार
मी होतो चकोर, गगनी
मेघांची क्रूर मिनार
रक्ताच्या थेंबात माझ्या
अंश येतो मत्सरी
सर्वनाश दिसता कसा तू
हातात घेतो बासरी
ती फुंकर मला तू दे रे
हुंकार मिळू दे त्याचा
ज्योत उरली एक
तू प्राण राख समईचा
अमरत्व नको मज आता
नको दिव्य तो मणीही
युद्धात "अश्वत्थामा"
आता न हो कुणीही
वादळं दोषी नसतात..
हेही एक मोठं सत्य आहे की दुःख प्रत्येकालाच असते मग तो अमर असो वा नसो. पण गमतीचा भाग असा की मनाला या दुःखाच एव्हढं दुःख नसतं जेव्हढं दुःख त्याला या कल्पनेने होतं की त्या दुःखाचं खापर तो कुणाच्या माथ्यावर फोडू शकत नाही. पण हेही खरं आहे की की आपण जे करतो बरेचदा आपल्याला हवं म्हणून करतो अशा वेळी दुसऱ्याला दोष कसा देता येईल बरं ?! अशा दुःखांच्या वेळी मी स्वतःलाच समजावून देतो की आपण लावलेली फुलं आपणच जपायची असतात !
तुकडे काही उचलताना
अश्रुंना मोजत होतो
जखमांना वेदनांना
तुझेच नाव देत होतो
विसरून गेलो होतो
स्वप्न माझेच होते
चित्र होते तुझे पण
हात माझेच होते
एक मात्र कळालं आज
वादळं दोषी नसतात
आपली फुलं आपणच
सांभाळायची असतात !
हेही एक मोठं सत्य आहे की दुःख प्रत्येकालाच असते मग तो अमर असो वा नसो. पण गमतीचा भाग असा की मनाला या दुःखाच एव्हढं दुःख नसतं जेव्हढं दुःख त्याला या कल्पनेने होतं की त्या दुःखाचं खापर तो कुणाच्या माथ्यावर फोडू शकत नाही. पण हेही खरं आहे की की आपण जे करतो बरेचदा आपल्याला हवं म्हणून करतो अशा वेळी दुसऱ्याला दोष कसा देता येईल बरं ?! अशा दुःखांच्या वेळी मी स्वतःलाच समजावून देतो की आपण लावलेली फुलं आपणच जपायची असतात !
तुकडे काही उचलताना
अश्रुंना मोजत होतो
जखमांना वेदनांना
तुझेच नाव देत होतो
विसरून गेलो होतो
स्वप्न माझेच होते
चित्र होते तुझे पण
हात माझेच होते
एक मात्र कळालं आज
वादळं दोषी नसतात
आपली फुलं आपणच
सांभाळायची असतात !
ऋतू
तरीही माणसाचं मन विचित्र आहे. दोष स्वतःला देता येत नाही आणि दुसऱ्याला दिला तर बरं दिसत नाही ! याचं फळ म्हणजे प्रश्न अनंत प्रश्न न सुटणारे प्रश्न, कोंडी करणारे प्रश्न, दाटून येणारे प्रश्न ... हे प्रश्न कोणा कोणाला धाडस देतात कोणी यांचा उपयोग प्रेरणा म्हणून करतो पण मला न सुटणारे प्रश्न स्तिमित करतात. स्तब्ध करतात विचार करायला लावतात. आणि मग मी या प्रश्नांचा विचार करायला लागतो. प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत हे ठाऊक असूनही मी त्यांचा विचार करतो हेही खरं ! अशा वेळी काळ जरासा थांबल्या सारखा वाटतो असं वाटतं की जग गतिमान आहे आणि मी एकाच जागी उभा आहे. मग त्याचाही मनाला प्रश्न पडतो की सगळं जग बदलतंय पण काही गोष्टी तशाच आहेत त्यांच्यात बदल होत नाहिये ...
ऋतू येतात आणि जातात
दिवस रात्र ही थांबत नाहीत
काही गोष्टी मात्र कधीच बदलत नाहीत
मी आणि माझे आठवणींचे विश्व
वाटा आहेत काहीशा नागमोडी
सावली आहे कधी धूळ थोडी
वळणांवर न सुटल्या प्रश्नांची कोडी
मनाची शाई अन मौनाची उत्तरे ..
तरीही माणसाचं मन विचित्र आहे. दोष स्वतःला देता येत नाही आणि दुसऱ्याला दिला तर बरं दिसत नाही ! याचं फळ म्हणजे प्रश्न अनंत प्रश्न न सुटणारे प्रश्न, कोंडी करणारे प्रश्न, दाटून येणारे प्रश्न ... हे प्रश्न कोणा कोणाला धाडस देतात कोणी यांचा उपयोग प्रेरणा म्हणून करतो पण मला न सुटणारे प्रश्न स्तिमित करतात. स्तब्ध करतात विचार करायला लावतात. आणि मग मी या प्रश्नांचा विचार करायला लागतो. प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत हे ठाऊक असूनही मी त्यांचा विचार करतो हेही खरं ! अशा वेळी काळ जरासा थांबल्या सारखा वाटतो असं वाटतं की जग गतिमान आहे आणि मी एकाच जागी उभा आहे. मग त्याचाही मनाला प्रश्न पडतो की सगळं जग बदलतंय पण काही गोष्टी तशाच आहेत त्यांच्यात बदल होत नाहिये ...
ऋतू येतात आणि जातात
दिवस रात्र ही थांबत नाहीत
काही गोष्टी मात्र कधीच बदलत नाहीत
मी आणि माझे आठवणींचे विश्व
वाटा आहेत काहीशा नागमोडी
सावली आहे कधी धूळ थोडी
वळणांवर न सुटल्या प्रश्नांची कोडी
मनाची शाई अन मौनाची उत्तरे ..
वर्षातून एकदा येणारा हा दिवस..
ऋतूमानाप्रमाणे परत परत येणारी गोष्ट म्हणजे वाढदिवस. जगाचं कालचक्र जरी एक जानेवारी ला सुरु आणि संपत असलं तरी प्रत्येकाचं आपापलं कालचक्र या वाढदिवसाला संपतं. हा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी खरं तर हिशोब मांडायचा दिवस असतो. भरपूर हिशोब, जुळवाजुळव, गोळाबेरीज केल्यानंतर मला असं फार वाटतं की नको ही गोळाबेरीज .. आपलं आयुष्य मुक्तपणे जगावं असं कुणाला वाटणार नाही ? मलाही तसाच वाटतं आणि काही क्षणांसाठी का होईना मी हिशोब सोडून .. त्याने दिलेल्या या आयुष्याचा आनंद मी घेतो .. अर्थात भित्र्या मनाला थोडा पटवून द्यावं लागतं !
ऋतूमानाप्रमाणे परत परत येणारी गोष्ट म्हणजे वाढदिवस. जगाचं कालचक्र जरी एक जानेवारी ला सुरु आणि संपत असलं तरी प्रत्येकाचं आपापलं कालचक्र या वाढदिवसाला संपतं. हा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी खरं तर हिशोब मांडायचा दिवस असतो. भरपूर हिशोब, जुळवाजुळव, गोळाबेरीज केल्यानंतर मला असं फार वाटतं की नको ही गोळाबेरीज .. आपलं आयुष्य मुक्तपणे जगावं असं कुणाला वाटणार नाही ? मलाही तसाच वाटतं आणि काही क्षणांसाठी का होईना मी हिशोब सोडून .. त्याने दिलेल्या या आयुष्याचा आनंद मी घेतो .. अर्थात भित्र्या मनाला थोडा पटवून द्यावं लागतं !
तीनशे पासष्ठ दिवस झाले
की एका डायरीचे पान पलटायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
टेबलावरचा कचरा
कधी कमी झाला कधी वाढला
आईने कटकट केली
अन माळावरचा गठ्ठा काढला
वेळेशी चुकलेल्या गणिताचे
वेळापत्रक तेव्हढे फाडायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
स्वप्ने लोभस काही
संकल्पही मी सोडला होता
गुलाबही दिसतो कधी
मी पुस्तकात लपवला होता
पानापानावर त्याच्या
एकच चित्र नांदायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
पण ..
तुटल्या फुटल्यांवर का
चर्चा करत बसायचे ?
रस्ता निवडला मी
त्यावरच चालत जायचे ?
प्रेम वाटंत फिरायचे
प्रेम वेचत हिंडायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
ढग आले तरीही
पल्याड सूर्य माझा
क्षितिजावर धुंद
रंगीत पंख माझा
त्याने दिलेले शब्द
त्याने दिलेले गाणे
आपण फक्त गात जायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
की एका डायरीचे पान पलटायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
टेबलावरचा कचरा
कधी कमी झाला कधी वाढला
आईने कटकट केली
अन माळावरचा गठ्ठा काढला
वेळेशी चुकलेल्या गणिताचे
वेळापत्रक तेव्हढे फाडायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
स्वप्ने लोभस काही
संकल्पही मी सोडला होता
गुलाबही दिसतो कधी
मी पुस्तकात लपवला होता
पानापानावर त्याच्या
एकच चित्र नांदायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
पण ..
तुटल्या फुटल्यांवर का
चर्चा करत बसायचे ?
रस्ता निवडला मी
त्यावरच चालत जायचे ?
प्रेम वाटंत फिरायचे
प्रेम वेचत हिंडायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
ढग आले तरीही
पल्याड सूर्य माझा
क्षितिजावर धुंद
रंगीत पंख माझा
त्याने दिलेले शब्द
त्याने दिलेले गाणे
आपण फक्त गात जायचे
वर्षातून एकदा येणारा हा दिवस
तेव्हा हिशोब कशाला मांडायचे ?
लाईफची पानं साला..
ही सगळी चक्र पाहिली की मनाला पडलेला प्रश्न म्हणजे हे नक्की कोन ठरवतं ? आमच्या या छोट्याशा आयुष्याच्या छोट्याशा पुस्तकात हे कोणी छापून ठेवलंय ? हा जो कोणी आहे त्याला खरं तर मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत. कैक गोष्टी अशा आहेत ज्यांचा माझ्या आयुष्याशी संबंध अजून तरी माझ्या लक्षात आलेला नाहीये ! विशेषतः इंजिनियरिंग वगैरे करणाऱ्या मुलांना तर भलतेच लोकं भेटतात. आयुष्यात घडणाऱ्या घटना म्हणजे क्षणोक्षणी चालू असलेली परीक्षा वाटत रहाते. तुम्हाला कुणाला जर हा कोन आहे तो भेटला तर मला सांगा प्लीज !!
ही सगळी चक्र पाहिली की मनाला पडलेला प्रश्न म्हणजे हे नक्की कोन ठरवतं ? आमच्या या छोट्याशा आयुष्याच्या छोट्याशा पुस्तकात हे कोणी छापून ठेवलंय ? हा जो कोणी आहे त्याला खरं तर मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत. कैक गोष्टी अशा आहेत ज्यांचा माझ्या आयुष्याशी संबंध अजून तरी माझ्या लक्षात आलेला नाहीये ! विशेषतः इंजिनियरिंग वगैरे करणाऱ्या मुलांना तर भलतेच लोकं भेटतात. आयुष्यात घडणाऱ्या घटना म्हणजे क्षणोक्षणी चालू असलेली परीक्षा वाटत रहाते. तुम्हाला कुणाला जर हा कोन आहे तो भेटला तर मला सांगा प्लीज !!
स्वप्नांच्या दाराला का अंधाराचे टाळे
चकव्या फसव्यांचे साले नशिबाचे चाळे
जिंकणाऱ्यांचा रस्ता सोपा करतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?
फुललेल्या झाडांवर माकडांच्या रांगा
आपलाच घोडा आणि आपलाच टांगा
फाटक्यांचा रोमियो हा करतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?
व्हाईट कॉलर म्हणून कधी बंड नाही केला
तरी लोक म्हणतात कसा पोरगा वाया गेला
दिव्याखाली बसून मोठा होतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?
नेता असतो कोणी आणि कोणी हिटलर
कोणी होतो पोलीस आणि कोणी प्रोफेसर
यांच्या जाळ्यात साला फेकतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?
चकव्या फसव्यांचे साले नशिबाचे चाळे
जिंकणाऱ्यांचा रस्ता सोपा करतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?
फुललेल्या झाडांवर माकडांच्या रांगा
आपलाच घोडा आणि आपलाच टांगा
फाटक्यांचा रोमियो हा करतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?
व्हाईट कॉलर म्हणून कधी बंड नाही केला
तरी लोक म्हणतात कसा पोरगा वाया गेला
दिव्याखाली बसून मोठा होतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?
नेता असतो कोणी आणि कोणी हिटलर
कोणी होतो पोलीस आणि कोणी प्रोफेसर
यांच्या जाळ्यात साला फेकतो तरी कोण ?
लाईफची पानं साला लिहितो तरी कोण ?