हे राष्ट्र महान आहे !
नाकर्तेपण एक असा शाप आहे जो कोणालाच पचत नाही. आपण नाकर्ते आहोत ही कल्पना देखील मनाला मुळापासुन हादरवून सोडते. आजच्या जगामध्ये (ऐहिक जगामध्ये ) जेवढं नाकर्ते पण आहे तेवढं माणसाने कधीच पाहिलं नव्हतं ! असं गेली अनेक वर्षे अनेक जण सांगत आलेले आहेत. आजही सांगत आहेत.. म्हणजे परिस्थिती बदललेली नाही. कोणी बदलायला गेलाच तर त्याच आयुष्य विलासितेच्या दुष्टचाक्राखाली चिरडले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा कोणी आपण महान देशाचे पुत्र आहोत वगैरे सांगायला लागला की त्याला सांगावसं वाटतं की देश जरी महान असला तरीही आपण सगळे नपुंसक आहोत .. गुलाम आहोत ! .. तरीही त्याची दया येते कारण तो पोटतिडकीने सांगत असतो हा देश महान आहे ! .. हे राष्ट्र महान आहे !
नाकर्तेपण एक असा शाप आहे जो कोणालाच पचत नाही. आपण नाकर्ते आहोत ही कल्पना देखील मनाला मुळापासुन हादरवून सोडते. आजच्या जगामध्ये (ऐहिक जगामध्ये ) जेवढं नाकर्ते पण आहे तेवढं माणसाने कधीच पाहिलं नव्हतं ! असं गेली अनेक वर्षे अनेक जण सांगत आलेले आहेत. आजही सांगत आहेत.. म्हणजे परिस्थिती बदललेली नाही. कोणी बदलायला गेलाच तर त्याच आयुष्य विलासितेच्या दुष्टचाक्राखाली चिरडले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा कोणी आपण महान देशाचे पुत्र आहोत वगैरे सांगायला लागला की त्याला सांगावसं वाटतं की देश जरी महान असला तरीही आपण सगळे नपुंसक आहोत .. गुलाम आहोत ! .. तरीही त्याची दया येते कारण तो पोटतिडकीने सांगत असतो हा देश महान आहे ! .. हे राष्ट्र महान आहे !
हे राष्ट्र संस्कृतीचे आहे
हे राष्ट्र प्रेषितांचे आहे
तरीही
हे राष्ट्र नेत्यांचेही आहे
गरीबाच्या आतडीचा घोट घेणाऱ्या कोयात्यांचेही आहे
हे राष्ट्र दरोडेखोरांचे आहे , गुंडांचे आहे
कामगारांच रक्त गाळणाऱ्या बंडांचे आहे
दांडग्यांच्या खिशात जाणाऱ्या फंडांचे आहे
हे राष्ट्र भारतमातेचे आहे
सती सदाचारीणींचे आहे
तसेच
ते बेघर लाचार भिकारीणींचेही आहे
पाठ सोलणाऱ्या गोणींचे आहे
उकिरड्यावर पडलेल्या द्रोणींचे आहे
हे राष्ट्र अस्मितेचे आहे
हे राष्ट्र मोठ्या थोरांचे आहे
आणि
हे राष्ट्र जागतिक चोरांचे आहे
पैशासाठी नाचणाऱ्या मोरांचे आहे
भ्रष्ट साहेबाचे आहे, क्रूर विलासितेचे आहे
आणि विद्येला बाजारात नेणाऱ्या नाफेखोरांचे ही आहे
हे राष्ट्र प्रेमाचे आहे
हे राष्ट्र भावबंधांचे आहे
तसेच
हे राष्ट्र रावांचे आहे , बाबांचे आहे काकांचे आहे आणि दादांचे आहे
हे राष्ट्र विकलेल्या मतांचे आहे
हिंसेच्या पिकांचे आहे भुकेच्या खतांचे आहे
हे राष्ट्र वीरांचे आहे
स्वातंत्र्य सैनिकांचे आहे
तरीही
हे राष्ट्र खोट्या आंदोलकांचे आहे
धर्माच्या चिंध्या करणाऱ्या, माणसाला आग लावणाऱ्या गंधाकांचे आहे
आणि हे राष्ट्र माझ्यासारख्या नपुंसकांचे ही आहे
कुणाला गुलाम हवेत का गुलाम ?..
ठासून मान्य करत नसलो तरी सगळेच झालोय गुलाम
मोडून पडलो तरी मान वर करणार नाही
आमच्या ओठातले अन्न म्हणजे गटारातली घाण आहे
चाबकाचे फटके खाऊनही म्हणत राहू हे राष्ट्र महान आहे ... हे राष्ट्र महान आहे !
हे राष्ट्र प्रेषितांचे आहे
तरीही
हे राष्ट्र नेत्यांचेही आहे
गरीबाच्या आतडीचा घोट घेणाऱ्या कोयात्यांचेही आहे
हे राष्ट्र दरोडेखोरांचे आहे , गुंडांचे आहे
कामगारांच रक्त गाळणाऱ्या बंडांचे आहे
दांडग्यांच्या खिशात जाणाऱ्या फंडांचे आहे
हे राष्ट्र भारतमातेचे आहे
सती सदाचारीणींचे आहे
तसेच
ते बेघर लाचार भिकारीणींचेही आहे
पाठ सोलणाऱ्या गोणींचे आहे
उकिरड्यावर पडलेल्या द्रोणींचे आहे
हे राष्ट्र अस्मितेचे आहे
हे राष्ट्र मोठ्या थोरांचे आहे
आणि
हे राष्ट्र जागतिक चोरांचे आहे
पैशासाठी नाचणाऱ्या मोरांचे आहे
भ्रष्ट साहेबाचे आहे, क्रूर विलासितेचे आहे
आणि विद्येला बाजारात नेणाऱ्या नाफेखोरांचे ही आहे
हे राष्ट्र प्रेमाचे आहे
हे राष्ट्र भावबंधांचे आहे
तसेच
हे राष्ट्र रावांचे आहे , बाबांचे आहे काकांचे आहे आणि दादांचे आहे
हे राष्ट्र विकलेल्या मतांचे आहे
हिंसेच्या पिकांचे आहे भुकेच्या खतांचे आहे
हे राष्ट्र वीरांचे आहे
स्वातंत्र्य सैनिकांचे आहे
तरीही
हे राष्ट्र खोट्या आंदोलकांचे आहे
धर्माच्या चिंध्या करणाऱ्या, माणसाला आग लावणाऱ्या गंधाकांचे आहे
आणि हे राष्ट्र माझ्यासारख्या नपुंसकांचे ही आहे
कुणाला गुलाम हवेत का गुलाम ?..
ठासून मान्य करत नसलो तरी सगळेच झालोय गुलाम
मोडून पडलो तरी मान वर करणार नाही
आमच्या ओठातले अन्न म्हणजे गटारातली घाण आहे
चाबकाचे फटके खाऊनही म्हणत राहू हे राष्ट्र महान आहे ... हे राष्ट्र महान आहे !
"अबोली"
बालपणीच्या आठवणी मनावरून कुणालाच सहसा पुसून टाकता येत नाहीत. काही काही आठवणी जशा नाजूक तशा काही व्यक्तीही नाजूक असतात. अशीच एक आठवण माझ्या मनात गेली कैक वर्षे घर करून आहे. ती माझ्या घरासमोर रहायची, जेमतेम माझ्याच वयाची. पण ती खेळकर होती, गोंडस होती आणि विशेष म्हणजे फक्त माझ्याशीच खेळायची. तिचा लाडका खेळ भातुकली. माझ्या बहिणीमुळे मला या खेळाचे काही नियम कळलेले होतेच. भातुकलीत रमता रमता एके दिवशी तिने गाव सोडले. ती जाताना मला भेटली नाही. हे एका अर्थी बरंच झालं कारण तिचे अश्रू बघून मला ही रडू आलं असतं... तिचं नाव होतं "अबोली"
बालपणीच्या आठवणी मनावरून कुणालाच सहसा पुसून टाकता येत नाहीत. काही काही आठवणी जशा नाजूक तशा काही व्यक्तीही नाजूक असतात. अशीच एक आठवण माझ्या मनात गेली कैक वर्षे घर करून आहे. ती माझ्या घरासमोर रहायची, जेमतेम माझ्याच वयाची. पण ती खेळकर होती, गोंडस होती आणि विशेष म्हणजे फक्त माझ्याशीच खेळायची. तिचा लाडका खेळ भातुकली. माझ्या बहिणीमुळे मला या खेळाचे काही नियम कळलेले होतेच. भातुकलीत रमता रमता एके दिवशी तिने गाव सोडले. ती जाताना मला भेटली नाही. हे एका अर्थी बरंच झालं कारण तिचे अश्रू बघून मला ही रडू आलं असतं... तिचं नाव होतं "अबोली"
माझ्या बालपणी ती
भातुकली मांडत असे
मी राजा आणि ती राणी
खेळाच्या संसाराला
स्वप्नांच्या भिंती केल्या ..
रुसण्याचे भांडण्याचे
दोघांचे हक्कच होते
ते तसेच होते नाते
तिच्या हुंदक्यांनी केल्या
माझ्या पापण्या ओल्या ..
कोण्या सांजवेळी ती
सोडून गाव गेली
डाव ही विसरून गेली
काळाच्या गर्द थराने
रेषा मनाच्या पुसल्या ..
आता मजपाशी फक्त
नाव तिचे अबोली
तिची जुनी बाहुली
आणिक बाकीच्या खुणा
मेघांत अलगद विरल्या ..
तिने दिलेल्या शपथा
अन मी दिलेली फुले
दोघांचे मिटले अंतर
सुकून गेले दोघे
हातात पाकळ्या उरल्या ...
भातुकली मांडत असे
मी राजा आणि ती राणी
खेळाच्या संसाराला
स्वप्नांच्या भिंती केल्या ..
रुसण्याचे भांडण्याचे
दोघांचे हक्कच होते
ते तसेच होते नाते
तिच्या हुंदक्यांनी केल्या
माझ्या पापण्या ओल्या ..
कोण्या सांजवेळी ती
सोडून गाव गेली
डाव ही विसरून गेली
काळाच्या गर्द थराने
रेषा मनाच्या पुसल्या ..
आता मजपाशी फक्त
नाव तिचे अबोली
तिची जुनी बाहुली
आणिक बाकीच्या खुणा
मेघांत अलगद विरल्या ..
तिने दिलेल्या शपथा
अन मी दिलेली फुले
दोघांचे मिटले अंतर
सुकून गेले दोघे
हातात पाकळ्या उरल्या ...
बंगला ! (मुक्तछंद)
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खरं तर मन किती प्रयत्न करतं. प्रयत्न करतं म्हणजे त्याच्या परीने जेवढं करता येईल तेवढं करत असतं. मजेची गोष्ट अशी की तेवढं ही पुरं पडत नाही. ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तेव्हा मनाला प्रश्न पडतो की असं का झालं ? मी कुठे कमी पडलो ? याचं उत्तर शोधायला गेलं की जाणवतं की ते आपल्या नशिबातच नसतं ! नियतीला दोष द्या नाहीतर अजून कशाला ... काही गोष्टी जमत नाही त्या नाहीच .. हातच कापत असतील तर दारं खिडक्या बंद केल्या तरीसुद्धा पत्त्यांचा बंगला उभा करता येत नाही हेच खरं !
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खरं तर मन किती प्रयत्न करतं. प्रयत्न करतं म्हणजे त्याच्या परीने जेवढं करता येईल तेवढं करत असतं. मजेची गोष्ट अशी की तेवढं ही पुरं पडत नाही. ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तेव्हा मनाला प्रश्न पडतो की असं का झालं ? मी कुठे कमी पडलो ? याचं उत्तर शोधायला गेलं की जाणवतं की ते आपल्या नशिबातच नसतं ! नियतीला दोष द्या नाहीतर अजून कशाला ... काही गोष्टी जमत नाही त्या नाहीच .. हातच कापत असतील तर दारं खिडक्या बंद केल्या तरीसुद्धा पत्त्यांचा बंगला उभा करता येत नाही हेच खरं !
मला वाटलेलं पत्त्यांचा बंगला बांधणं
खऱ्या बंगल्यापेक्षा सोपं असतं
खोट्या भ्रमामागे बेभान धावणं
आयुष्य जगण्यापेक्षा सोपं असतं
सावरले स्वताला, दारे सारी बंद
खिडकीही बंद होती
फांदीवर त्या समोर पक्षिणी
घरटे बांधत होती
तिरप्या दोन पत्त्यांना
आधार देत होतो
जपून जपून आणिक
श्वासाला रोखत होतो
परत घसरत होते
पडत होते पत्ते, काय गडबड होती ?
माझ्या कल्पनेतल्या मजल्यांची
अशी का पडझड होती ?
वारा नव्हता कुठेही, प्रयत्न करता करता
पत्तेही वाकत होते
पक्षिणी म्हणे हसून बंगला होईल कसा ?
तुझे हातच कापत होते !
खऱ्या बंगल्यापेक्षा सोपं असतं
खोट्या भ्रमामागे बेभान धावणं
आयुष्य जगण्यापेक्षा सोपं असतं
सावरले स्वताला, दारे सारी बंद
खिडकीही बंद होती
फांदीवर त्या समोर पक्षिणी
घरटे बांधत होती
तिरप्या दोन पत्त्यांना
आधार देत होतो
जपून जपून आणिक
श्वासाला रोखत होतो
परत घसरत होते
पडत होते पत्ते, काय गडबड होती ?
माझ्या कल्पनेतल्या मजल्यांची
अशी का पडझड होती ?
वारा नव्हता कुठेही, प्रयत्न करता करता
पत्तेही वाकत होते
पक्षिणी म्हणे हसून बंगला होईल कसा ?
तुझे हातच कापत होते !
तर..
माणूस बऱ्याचदा निराश झाला , अपयशी झाला की त्याला स्वतःच्या परिस्थिती बद्दल वाईट वाटत असतं. मग तो जगाला, नशीबाला, नियतीला आणि विशेष म्हणजे लोकांच्या नाशीबांना नावं ठेवतो. पण खरं तर दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा माणसाने आपले नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे, आपण आपल्या परिस्थितीचे दास आहोत हे मान्य केलं पाहिजे .. आणि दासांना स्वतःच्या इच्छा नसतात, आकांक्षा नसतात. किड्यांचा जन्म चिरडून मरण्यासाठीच झालेला असतो हेच खरं. त्यांना फक्त अंधारच असतो. कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आयुष्यात प्रकाश येत नाही.. त्यांनी प्रकाशाची अपेक्षा न करणंच योग्य !
अंधार नको असेल तर ..
सर्वत्र प्रकाश करा
प्रकाश हवा असेल तर ..
एक दिवा हाती धरा
ज्योत हवी असेल तर ..
नशिबाची वात करा
ज्वलन हवे असेल तर..
रक्ताचे तेल करा
रक्तही हवे असेल तर..
त्याचेही मोल भरा
पैसा हवा असेल तर..
नियतीचे पाय धरा
तीही हसत असेल तर..
शिव्यांचे श्लोक करा
नीतीलज्जा असेल तर..
तोंड पहिले बंद करा
तोंड बंद असले तर..
दासत्व मान्य करा
हेही झाले असले तर..
इच्छांचा खून करा
विझवून खोट्या ज्योती
पुन्हा सर्वत्र अंधार करा ... !
माणूस बऱ्याचदा निराश झाला , अपयशी झाला की त्याला स्वतःच्या परिस्थिती बद्दल वाईट वाटत असतं. मग तो जगाला, नशीबाला, नियतीला आणि विशेष म्हणजे लोकांच्या नाशीबांना नावं ठेवतो. पण खरं तर दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा माणसाने आपले नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे, आपण आपल्या परिस्थितीचे दास आहोत हे मान्य केलं पाहिजे .. आणि दासांना स्वतःच्या इच्छा नसतात, आकांक्षा नसतात. किड्यांचा जन्म चिरडून मरण्यासाठीच झालेला असतो हेच खरं. त्यांना फक्त अंधारच असतो. कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आयुष्यात प्रकाश येत नाही.. त्यांनी प्रकाशाची अपेक्षा न करणंच योग्य !
अंधार नको असेल तर ..
सर्वत्र प्रकाश करा
प्रकाश हवा असेल तर ..
एक दिवा हाती धरा
ज्योत हवी असेल तर ..
नशिबाची वात करा
ज्वलन हवे असेल तर..
रक्ताचे तेल करा
रक्तही हवे असेल तर..
त्याचेही मोल भरा
पैसा हवा असेल तर..
नियतीचे पाय धरा
तीही हसत असेल तर..
शिव्यांचे श्लोक करा
नीतीलज्जा असेल तर..
तोंड पहिले बंद करा
तोंड बंद असले तर..
दासत्व मान्य करा
हेही झाले असले तर..
इच्छांचा खून करा
विझवून खोट्या ज्योती
पुन्हा सर्वत्र अंधार करा ... !
ही वाट अशीच जाते !
आयुष्य एक प्रवास आहे हे आपल्याला माहित असले तरी सुद्धा या प्रवासात आपण अनेक परिक्रमा पार करत असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्पा खर तर एका परिक्रमेचा शेवट आणि दुसऱ्या परिक्रमेची सुरुवात असते. या परिक्रमा करत असताना आपण वेगवेगळ्या भूमिका घेत असतो. माणसाच्या मनाला त्याची भूमिका माहित असली की प्रवास सुकर वाटतो. पण कधी कधी आपली भूमिका निश्चित नसली की मन विचलित होतं ... आणि दिशेचे अंदाज जेव्हा चुकतात मन एखाद्या वैराग्याची .. संन्यासाची भूमिका घेतं आणि ही वाट अशीच जाते असं स्वतःला पटवून देतो आणि चालत रहातो. संन्यासाची भूमिका घेणे आणि सन्यासी होणे यात मुख्य फरक असा की मन सन्यासी पण एक टप्प्याला सोडणार असतं. त्यामुळे वाटेवर अंधार पडला की त्याला कायमचे सन्यासी होण्याची भीती वाटू लागते ..
दिशांचे चुकून अंश सन्यासी चालत येतो
श्वासांची करून माळ अंधार मागत येतो
चंद्राचे प्रतिबिंब त्याच्या
कमंडलुत येते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते
घर सोडले दूर चालतो आपल्याच वाटे
भविष्य अंधार आता अन भूतकाळ काटे
धृवांचे करून डोळे
वर्तमान त्यात झुलते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते
वाटेवरच्या पाचोळ्याचा वणवा होत आहे
जळून जळून माझाही देखावा होत आहे
ज्वाळांत आठवणींच्या
मनाची राख होते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते
झोपेतून उठलो की स्वप्नांचा रंग उतरतो
आता मात्र चालताना मी रात्रीला घाबरतो
स्वप्नांच्या मोहाचे आता
निर्माल्य असेच होते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते
वळणे ही मला विचारी , ही वाट जाते कुठे
चोरून रात्र दिवसाला, अर्घ्य वाहते कुठे
हवा ओंजळीची
निष्पर्ण फांदीवर येते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते!
आयुष्य एक प्रवास आहे हे आपल्याला माहित असले तरी सुद्धा या प्रवासात आपण अनेक परिक्रमा पार करत असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्पा खर तर एका परिक्रमेचा शेवट आणि दुसऱ्या परिक्रमेची सुरुवात असते. या परिक्रमा करत असताना आपण वेगवेगळ्या भूमिका घेत असतो. माणसाच्या मनाला त्याची भूमिका माहित असली की प्रवास सुकर वाटतो. पण कधी कधी आपली भूमिका निश्चित नसली की मन विचलित होतं ... आणि दिशेचे अंदाज जेव्हा चुकतात मन एखाद्या वैराग्याची .. संन्यासाची भूमिका घेतं आणि ही वाट अशीच जाते असं स्वतःला पटवून देतो आणि चालत रहातो. संन्यासाची भूमिका घेणे आणि सन्यासी होणे यात मुख्य फरक असा की मन सन्यासी पण एक टप्प्याला सोडणार असतं. त्यामुळे वाटेवर अंधार पडला की त्याला कायमचे सन्यासी होण्याची भीती वाटू लागते ..
दिशांचे चुकून अंश सन्यासी चालत येतो
श्वासांची करून माळ अंधार मागत येतो
चंद्राचे प्रतिबिंब त्याच्या
कमंडलुत येते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते
घर सोडले दूर चालतो आपल्याच वाटे
भविष्य अंधार आता अन भूतकाळ काटे
धृवांचे करून डोळे
वर्तमान त्यात झुलते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते
वाटेवरच्या पाचोळ्याचा वणवा होत आहे
जळून जळून माझाही देखावा होत आहे
ज्वाळांत आठवणींच्या
मनाची राख होते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते
झोपेतून उठलो की स्वप्नांचा रंग उतरतो
आता मात्र चालताना मी रात्रीला घाबरतो
स्वप्नांच्या मोहाचे आता
निर्माल्य असेच होते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते
वळणे ही मला विचारी , ही वाट जाते कुठे
चोरून रात्र दिवसाला, अर्घ्य वाहते कुठे
हवा ओंजळीची
निष्पर्ण फांदीवर येते
ही वाट अशीच जाते ... ही वाट अशीच जाते!
रोज रात्री ..
माझ्या आयुष्याचे एक एक टप्पे पार करत असताना मला बरेचदा अनेक प्रश्न पडतात. दिवसा मन आपापल्या कामात व्यस्त असतं त्यामुळे हे प्रश्न पडत नाही. पण जशी जशी संध्याकाळ जाऊन रात्र येऊ लागते तसतसे हे प्रश्न उजळत जातात. आणि प्रश्न रात्र नेहमी घेऊन येते. मला नेहमी गम्मत वाटते हे प्रश्न रात्रीच का पडतात. हळू हळू ही रात्र मला एका खोडसाळ खट्याळ मुली सारखी वाटू लागलेली आहे जी झोपू देत नाही, स्वस्थ बसू देत नाही, स्वतः ही शांत बसत नाही आणि एक सारखी प्रश्न विचारत रहाते ज्यांची उत्तरं माझ्याकडे नसतात ! तरीही रोज रात्र येते रोज प्रश्न आणते .. आणि माझी झोप घालवत असते .. मला तिची खरच गम्मत वाटते !
माझ्या आयुष्याचे एक एक टप्पे पार करत असताना मला बरेचदा अनेक प्रश्न पडतात. दिवसा मन आपापल्या कामात व्यस्त असतं त्यामुळे हे प्रश्न पडत नाही. पण जशी जशी संध्याकाळ जाऊन रात्र येऊ लागते तसतसे हे प्रश्न उजळत जातात. आणि प्रश्न रात्र नेहमी घेऊन येते. मला नेहमी गम्मत वाटते हे प्रश्न रात्रीच का पडतात. हळू हळू ही रात्र मला एका खोडसाळ खट्याळ मुली सारखी वाटू लागलेली आहे जी झोपू देत नाही, स्वस्थ बसू देत नाही, स्वतः ही शांत बसत नाही आणि एक सारखी प्रश्न विचारत रहाते ज्यांची उत्तरं माझ्याकडे नसतात ! तरीही रोज रात्र येते रोज प्रश्न आणते .. आणि माझी झोप घालवत असते .. मला तिची खरच गम्मत वाटते !
मला झोप येत नसली की, रात्रीची मला थोडी गम्मतच वाटते
ती येताना रोज नवीन प्रश्न, आपल्या ओच्यात सावरत आणते
थोडी वेडी थोडी वाकडी असते, तिची वाट ठरलेली असते
पदरावर तिच्या स्वप्नांची, नवी नक्षी भरलेली असते
डोळे मिटण्याचे नाटक करतो मी, ती तशीच बसून रहाते
पानांची सळसळ करते, खिडकीवर हसून जाते
मला कंटाळा आला जरी, ती कंटाळत नाही
पण तिच्या प्रश्नांना मात्र, उत्तरं मिळत नाही
ती नुसती वाहत जाते, वेळेचं भान नसतं
ती फुंकर घालत जाते, पेटलेलं रान असतं
त्याच्या बघून ज्वाळा, ती दूर दूर पळते
बंद मुठीत सकाळी, चंद्राची राख उरते
दिवसा मी जागा असतो, रात्रीच पापणी मिटते
कुणास ठाऊक तिला सांगतो कोण ? ती बाजूला येऊन बसते
मला झोप येत नसली की रात्रीची मला थोडी गम्मतच वाटते !
ती येताना रोज नवीन प्रश्न, आपल्या ओच्यात सावरत आणते
थोडी वेडी थोडी वाकडी असते, तिची वाट ठरलेली असते
पदरावर तिच्या स्वप्नांची, नवी नक्षी भरलेली असते
डोळे मिटण्याचे नाटक करतो मी, ती तशीच बसून रहाते
पानांची सळसळ करते, खिडकीवर हसून जाते
मला कंटाळा आला जरी, ती कंटाळत नाही
पण तिच्या प्रश्नांना मात्र, उत्तरं मिळत नाही
ती नुसती वाहत जाते, वेळेचं भान नसतं
ती फुंकर घालत जाते, पेटलेलं रान असतं
त्याच्या बघून ज्वाळा, ती दूर दूर पळते
बंद मुठीत सकाळी, चंद्राची राख उरते
दिवसा मी जागा असतो, रात्रीच पापणी मिटते
कुणास ठाऊक तिला सांगतो कोण ? ती बाजूला येऊन बसते
मला झोप येत नसली की रात्रीची मला थोडी गम्मतच वाटते !
एवढंच..
आता हे तर नक्की झालंय की रात्र येतेच आणि ती आली की लवकर जात नाही. मी रात्रीला जा तर म्हणू शकत नाही. पण तिच्या येण्याने मनाच्या शांत पटलांवर काही तरंग उठतात हे मात्र नक्की. आणि हे तरंग कधी कुठल्या गोष्टी स्वतः बरोबर वाहून आणतील याचा एम नाही. या गोष्टींवर हसावं की रडावं याचा विचार सुरु होतो आणि बऱ्याच वेळाने ध्यानात येतं की आपण झोपायचंच विसरून गेलोय. एक खरं की तिच्यावर चीडण्याचा ओरडण्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे आता मी फक्त एवढंच म्हणू शकतो एवढंच मागू शकतो की तू ये पण ..
तिची चाहूल येते आणि
मृद्गंध दरवळतो सारा
पापण्यांची उघडता दारे
आसमंत उजळतो सारा
ती रात्रीच फक्त येते
खडबडून उठतो वारा
लाटांना आणि उसळत्या
आलिंगन दे किनारा
डोळ्यासमोर दिसतो
शुक्राचा गोंडस तारा
तेथेच असतो चंद्र
विरहाने मिणमिणणारा
स्वप्नावर दाटून येतो
दवबिंदुचा जणू पारा
आता मी नाही, झोपही नाही, फक्त हा नजारा !
" तू रात्रीची पैंजण घालून येऊ नकोस मला झोप येत नाही "
.. एवढंच तर मी मागितलं होतं ना ?!
आता हे तर नक्की झालंय की रात्र येतेच आणि ती आली की लवकर जात नाही. मी रात्रीला जा तर म्हणू शकत नाही. पण तिच्या येण्याने मनाच्या शांत पटलांवर काही तरंग उठतात हे मात्र नक्की. आणि हे तरंग कधी कुठल्या गोष्टी स्वतः बरोबर वाहून आणतील याचा एम नाही. या गोष्टींवर हसावं की रडावं याचा विचार सुरु होतो आणि बऱ्याच वेळाने ध्यानात येतं की आपण झोपायचंच विसरून गेलोय. एक खरं की तिच्यावर चीडण्याचा ओरडण्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे आता मी फक्त एवढंच म्हणू शकतो एवढंच मागू शकतो की तू ये पण ..
तिची चाहूल येते आणि
मृद्गंध दरवळतो सारा
पापण्यांची उघडता दारे
आसमंत उजळतो सारा
ती रात्रीच फक्त येते
खडबडून उठतो वारा
लाटांना आणि उसळत्या
आलिंगन दे किनारा
डोळ्यासमोर दिसतो
शुक्राचा गोंडस तारा
तेथेच असतो चंद्र
विरहाने मिणमिणणारा
स्वप्नावर दाटून येतो
दवबिंदुचा जणू पारा
आता मी नाही, झोपही नाही, फक्त हा नजारा !
" तू रात्रीची पैंजण घालून येऊ नकोस मला झोप येत नाही "
.. एवढंच तर मी मागितलं होतं ना ?!
मी आणि कोपऱ्यातला कंदील ...
कोणाला काही मागून कधी मिळतं थोडंच ! तिच्याच्याने हे देखील होत नाही. मग काय करणार ... रात्रीचे जागे रहाण्याचे सत्र सुरु होते आणि मग नाना तऱ्हेचे विचार मनामध्ये येऊ लागतात. मन खूप वेगवेगळ्या वाटांवरून चालून बघते, थोडं डोकावून बघते पण कोणीच दिसत नाही. तेव्हा मात्र भरपूर लोकांनी वेढलेले असूनही एकाकी असणं म्हणजे काय ? याची प्रचीती येते. विचारांच्या समुद्रात मनाच्या पटलांचं थैमान घालून झालं की शेवटी काहीच काहीच उरत नाही एका बाजूला मी असतो आणि दुसऱ्या बाजूला एक मिणमिणता कंदील ...
ती रोज येते, माझ्याकडे बघते आणि
क्षितिजाच्या कडेला रडत बसते
मी रोज एकटाच बसलेला असतो आणि
चंद्र, नक्षत्रांची कोडी सोडवत बसतो
चुकांचे हिशोब वारा उडवून लावतो आणि
कधी आठवणींच्या वाटांवर धावतो
भुतकाळाचा रागही येतो अधून मधून
फसव्या गोड क्षणांवरही थोडा हसतो
सारं सारं विसरायचं असतं मला
आणि झाडीत वाट विसरलेला पक्षी फडफड करत असतो
दीपस्तंभ व्हायचं आहे ज्यांना त्यांनी व्हावे खुशाल
मी तर अधांतरी सोडलेली एक नाव झालो आहे
मी कुणाला वाट काय दाखवणार ?
मनाच्या वाटेवर चालता चालता मीच किनाऱ्यापासून दूर आलो आहे
रडायचंही असतं ,
कोणाला दाखवायचंही नसतं
आणि मन
हसण्याच्या भिंतीमागे लपून बसतं
मी माझंच गाणं गुणगुणत असतो
भिंतीच्या बाहेर प्रश्न उभे असतात
रात्री दोनच गोष्टी जळत असतात
मी आणि कोपऱ्यातला कंदील ...
कोणाला काही मागून कधी मिळतं थोडंच ! तिच्याच्याने हे देखील होत नाही. मग काय करणार ... रात्रीचे जागे रहाण्याचे सत्र सुरु होते आणि मग नाना तऱ्हेचे विचार मनामध्ये येऊ लागतात. मन खूप वेगवेगळ्या वाटांवरून चालून बघते, थोडं डोकावून बघते पण कोणीच दिसत नाही. तेव्हा मात्र भरपूर लोकांनी वेढलेले असूनही एकाकी असणं म्हणजे काय ? याची प्रचीती येते. विचारांच्या समुद्रात मनाच्या पटलांचं थैमान घालून झालं की शेवटी काहीच काहीच उरत नाही एका बाजूला मी असतो आणि दुसऱ्या बाजूला एक मिणमिणता कंदील ...
ती रोज येते, माझ्याकडे बघते आणि
क्षितिजाच्या कडेला रडत बसते
मी रोज एकटाच बसलेला असतो आणि
चंद्र, नक्षत्रांची कोडी सोडवत बसतो
चुकांचे हिशोब वारा उडवून लावतो आणि
कधी आठवणींच्या वाटांवर धावतो
भुतकाळाचा रागही येतो अधून मधून
फसव्या गोड क्षणांवरही थोडा हसतो
सारं सारं विसरायचं असतं मला
आणि झाडीत वाट विसरलेला पक्षी फडफड करत असतो
दीपस्तंभ व्हायचं आहे ज्यांना त्यांनी व्हावे खुशाल
मी तर अधांतरी सोडलेली एक नाव झालो आहे
मी कुणाला वाट काय दाखवणार ?
मनाच्या वाटेवर चालता चालता मीच किनाऱ्यापासून दूर आलो आहे
रडायचंही असतं ,
कोणाला दाखवायचंही नसतं
आणि मन
हसण्याच्या भिंतीमागे लपून बसतं
मी माझंच गाणं गुणगुणत असतो
भिंतीच्या बाहेर प्रश्न उभे असतात
रात्री दोनच गोष्टी जळत असतात
मी आणि कोपऱ्यातला कंदील ...
दिशा..
रात्रीने चालवलेल्या या खेळामुळे मात्र आता संध्याकाळ होऊ लागली की मला थोडं दडपण येतं. संध्याकाळी वाटतं की सगळ्यापासून लांब लांब जावं, सगळे संपर्क तोडावेत काही बोलू नये फक्त चालत राहावं. वाट मिळेल तिथे जावं पण अशा वेळीही जायचं कुठे ? .. ही वाट जाणार कुठे ? असे प्रश्न पडतातच. रोजची माझी ही वाटहीन मुशाफिरी बघितली की मलाच जाणवतं की आपल्याला दिशाच नाहीये .. खरं तर ती आधीही नाव्हती आत्ताही नाही !
सांजवेळी तो विजनवासी होतो
भरकटल्या वाटांचा प्रवासी होतो
सांडत जातो .. स्वतःचे रंग काही
दिशा कालही नव्हती .. आजही नाही
अव्यक्त भावनांची गर्द वाट होते
अबोल अक्षरांची धुंद लाट येते
आणि पुसटसे .. आता शब्द काही
दिशा कालही नव्हती .. आजही नाही
बेधुंद मनांच्या संगमाकाठी
एक गाव होते स्वप्नांसाठी
आता पैलही नाही .. पैलतीरही नाही
दिशा कालही नव्हती .. आजही नाही
रात्रीने चालवलेल्या या खेळामुळे मात्र आता संध्याकाळ होऊ लागली की मला थोडं दडपण येतं. संध्याकाळी वाटतं की सगळ्यापासून लांब लांब जावं, सगळे संपर्क तोडावेत काही बोलू नये फक्त चालत राहावं. वाट मिळेल तिथे जावं पण अशा वेळीही जायचं कुठे ? .. ही वाट जाणार कुठे ? असे प्रश्न पडतातच. रोजची माझी ही वाटहीन मुशाफिरी बघितली की मलाच जाणवतं की आपल्याला दिशाच नाहीये .. खरं तर ती आधीही नाव्हती आत्ताही नाही !
सांजवेळी तो विजनवासी होतो
भरकटल्या वाटांचा प्रवासी होतो
सांडत जातो .. स्वतःचे रंग काही
दिशा कालही नव्हती .. आजही नाही
अव्यक्त भावनांची गर्द वाट होते
अबोल अक्षरांची धुंद लाट येते
आणि पुसटसे .. आता शब्द काही
दिशा कालही नव्हती .. आजही नाही
बेधुंद मनांच्या संगमाकाठी
एक गाव होते स्वप्नांसाठी
आता पैलही नाही .. पैलतीरही नाही
दिशा कालही नव्हती .. आजही नाही
तपस्वी
नशीब ... नशीब ही अशीच एक विनोदी गोष्ट .. ज्या ज्या गोष्टींना आपल्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार मिळालेला आहे त्यांच्या पैकी एक ! नशीब कुबेराला एका क्षणात भिकारी, एका भिकाऱ्याला धनी एव्हढंच काय पण एका अनोळखी माणसाला महात्मा बनवू शकतं. लोकांचे समज हा माणसाला काही अंशी उपयोगी पडणारी गोष्ट जरी असली तरी काही जणांना ते पटत नाही. पण कधी कधी त्यांचाही अगदीच नाईलाज होवून जातो. ह्यालाही नशिबच म्हणावं लागेल. अशाच एका महात्म्याची गोष्ट ... न जाणो जगात अशा किती आख्यायिका असतील !
नशीब ... नशीब ही अशीच एक विनोदी गोष्ट .. ज्या ज्या गोष्टींना आपल्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार मिळालेला आहे त्यांच्या पैकी एक ! नशीब कुबेराला एका क्षणात भिकारी, एका भिकाऱ्याला धनी एव्हढंच काय पण एका अनोळखी माणसाला महात्मा बनवू शकतं. लोकांचे समज हा माणसाला काही अंशी उपयोगी पडणारी गोष्ट जरी असली तरी काही जणांना ते पटत नाही. पण कधी कधी त्यांचाही अगदीच नाईलाज होवून जातो. ह्यालाही नशिबच म्हणावं लागेल. अशाच एका महात्म्याची गोष्ट ... न जाणो जगात अशा किती आख्यायिका असतील !
काही वर्षांपूर्वी .. म्हणतात
गावाच्या वेशीवर
कोणी फाटका माणूस आला होता
चालून चालून तो फार थकला होता
कोणी म्हणे भिकारी होता
कोणी म्हणे आजारी होता
जुन्या घोंगडीवर अंग टाकून होता
भगवे कापड पांघरून होता
क्वचित कोणी त्याला
एखादी भाकरी देत असे
बोलत नसे कुणाशी रात्रीचा
देवळापाशी जातसे
थोडा कण्हत असे
हात जोडून कधी रडत ही असे
दूर पारावर आधी म्हणे
कोणाकोणाला भुते दिसायची
लहान लहान ती मुलांना उचलून न्यायची
तो त्या पारावर रहायला गेला
लोकांना तो कोणी साधू वाटायचा
दिवस रात्र स्वतःत हरवलेला
तो भगव्या कापडात दिसायचा
असेच दिवस गेले
पंचक्रोशीत त्याचे नाव झाले
आता अधून मधून लोक फुले ही वाहू लागले
त्याला असह्य होई सारे ..
पण मूकपण पदरी पडलेले
पळून जाता ही येत नव्हते
शरीर होते पूर्ण थकलेले
... आणि दिवसेंदिवस फुलामाळांच्या
फक्त राशी वाढत गेल्या
हाच तो पार
तपस्वी सारखा वस्तीपासून दूर बसलेला होता
आणि काही दगडांवर शेंदूर फासलेला होता
एका नोकरदाराचे मनोगत ..
एव्हढं महात्म्यांपर्यंत जायची गरज नाहीये... सामान्य नोकरदाराचही आयुष्य नशिबावर काही कमी अवलंबून नसतं. पण नोकरदार माणसाला पळवाट नसते त्याला त्याच्यामधुनच जावं लागतं , त्यातून सुटका नाही. कधी कधी तो बोलू लागला की आश्चर्य वाटतं , फाईल बरबटवणाऱ्या आणि जोडे झिजवणाऱ्या माणसाला काय वाटतं आणि विशेष म्हणजे तो आजूबाजूच्या गोष्टींबद्दल बारीक सारीक निरीक्षणं करून ठेवतो ..
एव्हढं महात्म्यांपर्यंत जायची गरज नाहीये... सामान्य नोकरदाराचही आयुष्य नशिबावर काही कमी अवलंबून नसतं. पण नोकरदार माणसाला पळवाट नसते त्याला त्याच्यामधुनच जावं लागतं , त्यातून सुटका नाही. कधी कधी तो बोलू लागला की आश्चर्य वाटतं , फाईल बरबटवणाऱ्या आणि जोडे झिजवणाऱ्या माणसाला काय वाटतं आणि विशेष म्हणजे तो आजूबाजूच्या गोष्टींबद्दल बारीक सारीक निरीक्षणं करून ठेवतो ..
जगणे आणि मरणे यांचे
असो कुणाचे कोडे
आमुच्या नशिबी मात्र
फाईल आणि जोडे
बाईशी साहेब कसा तो
बोलतो हसून
तंगडी पसरून का तो
भुंकतो बसून
त्याच्याच हाती आता
कागदाचे स्वैर घोडे
आमुच्या नशिबी मात्र ..
मानेला बाक आमच्या
पाठीला अन पोक
निवांत क्षणीही आमच्या
बुडाखाली टोक
यावर नियतीचे ,
नखरे असतात थोडे
आमुच्या नशिबी मात्र ..
मांडले पट जयांनी
ते आमचे मायबाप
सापशिडीवरती का
आम्हाच सापडे साप
शेपटी झाडणारे किती
चढतात शिडी निगोडे
आमुच्या नशिबी मात्र ..
रचतो मनोरे आणिक ती
रद्दी कागदाची
हसतो वरून मीही आत
शाई आसवाची
स्वप्नांच्या पडले पायी
नोकरीचे जाड तोडे
आमुच्या नशिबी मात्र ..