स्पर्श
छंद म्हणजे जाणून बुजून केलेली आवडती गोष्ट आणि फंद म्हणजे नकळत घडणारी एक अनोळखी गोष्ट आणि तरीही मनाला भावणारी. खरं सांगायचं तर मला कविता हे दोन्ही वाटतं. आजवर अनेक लोकांनी कवितेला शब्दांच्या चौकटीत अडकवण्याचा म्हणजेच तिला व्याख्येत कैद करण्याचा प्रयत्न केला पण सारं काही फोल ! मलाही कधी कधी उगाच वाटू लागतं की ही व्याख्या शोधून काढता आली तर !? त्याच क्षणाला कविता एक प्रश्नचिन्ह बनून समोर येते आणि मग अर्धवट उत्तरांपेक्षा तिने उभे केलेले स्पर्शकुळातले प्रश्न मला सुखावून जातात आणि मी जुळवाजुळव केलेले शब्द विरून जाऊ लागतात फक्त एक स्पर्श उरतो !
छंद म्हणजे जाणून बुजून केलेली आवडती गोष्ट आणि फंद म्हणजे नकळत घडणारी एक अनोळखी गोष्ट आणि तरीही मनाला भावणारी. खरं सांगायचं तर मला कविता हे दोन्ही वाटतं. आजवर अनेक लोकांनी कवितेला शब्दांच्या चौकटीत अडकवण्याचा म्हणजेच तिला व्याख्येत कैद करण्याचा प्रयत्न केला पण सारं काही फोल ! मलाही कधी कधी उगाच वाटू लागतं की ही व्याख्या शोधून काढता आली तर !? त्याच क्षणाला कविता एक प्रश्नचिन्ह बनून समोर येते आणि मग अर्धवट उत्तरांपेक्षा तिने उभे केलेले स्पर्शकुळातले प्रश्न मला सुखावून जातात आणि मी जुळवाजुळव केलेले शब्द विरून जाऊ लागतात फक्त एक स्पर्श उरतो !
कविता ..
कविता म्हणजे एक कल्पना ..
जाणिवांना स्पर्शून जाणारी
भावनांच्या झुल्यावर स्वैर झुलणारी ..
संवेदना म्हणजे कवितेचा चेहरा
थकलेल्या मनाचा शब्दांचा आसरा ..
ती चालते
तशी तिच्या पायाखाली वाट उलगडत जाते ..
अक्षरांच्या चांदण्याखाली
ती जिवंत होते .. श्वास घेऊ लागते .. उमलत जाते
तिचा प्रवास असतो अगदी थोडासा ..
काही क्षणांचा ..
हा प्रवास संपला तरी ,
ते स्पर्श तसेच रहातात .. तिच्या पाउलखुणा जिवंत रहातात
तिने दिलेल्या जाणीवा बदलत नाहीत ..
बदलतात ते फक्त ऋतु..
कधी कधी संध्याकाळी
या पाउलखुणांना बधून येतो ..
मागे वळून बघतो ..
दूर .. गावाशेजारून नदी वहात असते
आणि मंदिरातला घंटारव दरवळत असतो ..
व्याख्या बदलल्या तरीही
तो स्पर्श अगदी तसाच असतो .. अगदी तसाच असतो !
कविता म्हणजे एक कल्पना ..
जाणिवांना स्पर्शून जाणारी
भावनांच्या झुल्यावर स्वैर झुलणारी ..
संवेदना म्हणजे कवितेचा चेहरा
थकलेल्या मनाचा शब्दांचा आसरा ..
ती चालते
तशी तिच्या पायाखाली वाट उलगडत जाते ..
अक्षरांच्या चांदण्याखाली
ती जिवंत होते .. श्वास घेऊ लागते .. उमलत जाते
तिचा प्रवास असतो अगदी थोडासा ..
काही क्षणांचा ..
हा प्रवास संपला तरी ,
ते स्पर्श तसेच रहातात .. तिच्या पाउलखुणा जिवंत रहातात
तिने दिलेल्या जाणीवा बदलत नाहीत ..
बदलतात ते फक्त ऋतु..
कधी कधी संध्याकाळी
या पाउलखुणांना बधून येतो ..
मागे वळून बघतो ..
दूर .. गावाशेजारून नदी वहात असते
आणि मंदिरातला घंटारव दरवळत असतो ..
व्याख्या बदलल्या तरीही
तो स्पर्श अगदी तसाच असतो .. अगदी तसाच असतो !