नाते
एकट्याने प्रवास तरी किती करणार ? कोणीतरी सोबतीला लागतंच.. आणि या अवघड पण हळव्या रेषांवर चालायचं म्हणजे नुसतं कोणीतरी बरोबर असून चालत नाही. मन अशा नुसत्या आकृत्यांना आपल्या बरोबर घेत नाही, इथे फक्त ऐहिक सोय नसते. हा एकटेपणा वेगळा असतो, तो फक्त जाणवतो. मन सतत त्या सोबतीची , सख्याची वाट बघत असतं. जो त्याच्या बरोबर चालेल, त्याला सावरेल .. मनाला कोणीतरी आपलं हवं असतं. तो कोणीतरी आपलं दिसलं की मन त्याच्याच मागावर लागतं. ज्या क्षणी " मी सुद्धा कुणाला तरी आपला वाटतो ! " याची मनाला जाणीव होते त्या क्षणी ती मने एकमेकांत अशी काही गुरफटून जातात की ती एक च होवून जातात आणि मग सारं जगच बदलून जातं ! अशा वेळी मनाला प्रश्न पडतो दोन वेगळ्या जिवांच असं कसं झालं ? हे कोणते नाते आहे ?
दोन जीव का जन्मले
ती बंधने ताडण्यासाठी
तारांगणी जन्मले चांदणे
पृथ्वीवर सांडण्यासाठी
पंख मनाला लागले
नियतीचे खेळ हे कुठले
गीत गायले डोळ्यांनी
अंगणाशी नाते तुटले
कुंपण झाले उभे
जगाचे क्रूर बाभळीचे
अवचित पडले पाउल
तुजसाठी या भोळीचे
मेघराणी आज विचारी
झुकुनी पर्वतावरी
सागरात जन्म माझा
पण भाळले तुजलावारी
तो म्हणाला तिजला
खेळ हे ना मनातले
अपुल्यातले बंध हे
अवतरले स्वर्गातले
हे बंध स्पंदनांचे ..हे नाते हृदयातले
एकट्याने प्रवास तरी किती करणार ? कोणीतरी सोबतीला लागतंच.. आणि या अवघड पण हळव्या रेषांवर चालायचं म्हणजे नुसतं कोणीतरी बरोबर असून चालत नाही. मन अशा नुसत्या आकृत्यांना आपल्या बरोबर घेत नाही, इथे फक्त ऐहिक सोय नसते. हा एकटेपणा वेगळा असतो, तो फक्त जाणवतो. मन सतत त्या सोबतीची , सख्याची वाट बघत असतं. जो त्याच्या बरोबर चालेल, त्याला सावरेल .. मनाला कोणीतरी आपलं हवं असतं. तो कोणीतरी आपलं दिसलं की मन त्याच्याच मागावर लागतं. ज्या क्षणी " मी सुद्धा कुणाला तरी आपला वाटतो ! " याची मनाला जाणीव होते त्या क्षणी ती मने एकमेकांत अशी काही गुरफटून जातात की ती एक च होवून जातात आणि मग सारं जगच बदलून जातं ! अशा वेळी मनाला प्रश्न पडतो दोन वेगळ्या जिवांच असं कसं झालं ? हे कोणते नाते आहे ?
दोन जीव का जन्मले
ती बंधने ताडण्यासाठी
तारांगणी जन्मले चांदणे
पृथ्वीवर सांडण्यासाठी
पंख मनाला लागले
नियतीचे खेळ हे कुठले
गीत गायले डोळ्यांनी
अंगणाशी नाते तुटले
कुंपण झाले उभे
जगाचे क्रूर बाभळीचे
अवचित पडले पाउल
तुजसाठी या भोळीचे
मेघराणी आज विचारी
झुकुनी पर्वतावरी
सागरात जन्म माझा
पण भाळले तुजलावारी
तो म्हणाला तिजला
खेळ हे ना मनातले
अपुल्यातले बंध हे
अवतरले स्वर्गातले
हे बंध स्पंदनांचे ..हे नाते हृदयातले
तू थांब जरा..
जगात बंधने नसती तर मनाला अर्थच राहिला नसता. प्रेमात पडलेली 'ती' मनस्वी होते याचं मुख्य कारण म्हणजे ही बंधने .. कधी समाजाची कधी कुटुंबाची कधी आणखीन कुठली ! तेव्हा अशा मनस्वी मनाला जर बंधने तोडायची असतील तर एकच मार्ग आहे यांतून मुक्त होणे. अशाच एका रात्री ती त्याच्याबरोबर पळून जाते , जेव्हा सगळं शांत असतं, निद्रिस्त असतं . संपूर्ण आयुष्य प्रियकराबरोबर घालवायला मिळणार असलं तरी ज्या अंगणात ती खेळली वाढली त्यातून जाताना पाय थोडे जड पडणारच ...
जगात बंधने नसती तर मनाला अर्थच राहिला नसता. प्रेमात पडलेली 'ती' मनस्वी होते याचं मुख्य कारण म्हणजे ही बंधने .. कधी समाजाची कधी कुटुंबाची कधी आणखीन कुठली ! तेव्हा अशा मनस्वी मनाला जर बंधने तोडायची असतील तर एकच मार्ग आहे यांतून मुक्त होणे. अशाच एका रात्री ती त्याच्याबरोबर पळून जाते , जेव्हा सगळं शांत असतं, निद्रिस्त असतं . संपूर्ण आयुष्य प्रियकराबरोबर घालवायला मिळणार असलं तरी ज्या अंगणात ती खेळली वाढली त्यातून जाताना पाय थोडे जड पडणारच ...
तू थांब जरा , मी आहे रे मागे
गाव ग्लानितले होईल रे जागे
विश्व माझे टाकून आले सारे
भातुकलीचे मोडून रे पसारे
अंगणी लपविला बालपणीचा
काटा आज मला रे लागे
तू थांब जरा ...
दाराचे घराचे बंधन वाटे फुके
जाईंचे आता चुंबन वाटे फुके
उमगली वाट मला ना दुसरी
मन माझे मलाच सांगे
तू थांब जरा ...
खाईन मी चंद्राची रे भाकरी
असो राहण्यास मातीची पायरी
ओवीन सारे विश्व तुझे
किरणांचे करून धागे
तू थांब जरा ...
गाव ग्लानितले होईल रे जागे
विश्व माझे टाकून आले सारे
भातुकलीचे मोडून रे पसारे
अंगणी लपविला बालपणीचा
काटा आज मला रे लागे
तू थांब जरा ...
दाराचे घराचे बंधन वाटे फुके
जाईंचे आता चुंबन वाटे फुके
उमगली वाट मला ना दुसरी
मन माझे मलाच सांगे
तू थांब जरा ...
खाईन मी चंद्राची रे भाकरी
असो राहण्यास मातीची पायरी
ओवीन सारे विश्व तुझे
किरणांचे करून धागे
तू थांब जरा ...
निरोप
मन ज्या रेषांवरून चालतं त्या रेषा कितीही लांब असल्या तरी त्यांच्यावरच्या पाउलखुणा अगदी स्पष्ट दिसतात .. अगदी दूर पर्यंत .. कधी कधी तर अगदी सुरुवातीपर्यंत ! मग सासरी आलेल्या तिच्या मनाला या खुणा पाहिल्यावर माहेरची आठवण येणं अगदीच स्वाभाविक आहे. या आठवणीचं मोल मला कळलं जरी नाही तरी तिच्या डोळ्यात मला ते दिसत असतं कारण तिला मुळी ते लपवताच येत नाही. कुतूहल, विरह , माया ,मैत्र अशा अनेक छटांचा मिळून आठवणीचा एक आपलाच रंग तयार होतो आणि क्षितिजावर पसरू लागतो. मन मागच्या वर्षी पावसाबरोबर पाठवलेल्या निरोपाची वाट पाहू लागतं ... उत्तरं येत नाहीत म्हणून मन उदास खिन्न होवून जातं. पण आज तो क्षण तिला दिसत आहे .. पहिल्या पावसाबरोबर तिच्या माहेरून निरोप आला आहे ! मग मन उदास कसं होईल बरं ?!
मन ज्या रेषांवरून चालतं त्या रेषा कितीही लांब असल्या तरी त्यांच्यावरच्या पाउलखुणा अगदी स्पष्ट दिसतात .. अगदी दूर पर्यंत .. कधी कधी तर अगदी सुरुवातीपर्यंत ! मग सासरी आलेल्या तिच्या मनाला या खुणा पाहिल्यावर माहेरची आठवण येणं अगदीच स्वाभाविक आहे. या आठवणीचं मोल मला कळलं जरी नाही तरी तिच्या डोळ्यात मला ते दिसत असतं कारण तिला मुळी ते लपवताच येत नाही. कुतूहल, विरह , माया ,मैत्र अशा अनेक छटांचा मिळून आठवणीचा एक आपलाच रंग तयार होतो आणि क्षितिजावर पसरू लागतो. मन मागच्या वर्षी पावसाबरोबर पाठवलेल्या निरोपाची वाट पाहू लागतं ... उत्तरं येत नाहीत म्हणून मन उदास खिन्न होवून जातं. पण आज तो क्षण तिला दिसत आहे .. पहिल्या पावसाबरोबर तिच्या माहेरून निरोप आला आहे ! मग मन उदास कसं होईल बरं ?!
डोंगराच्या पायवाटे , छोटेसे माझे घरटे
अंगणी झाड एकटे , प्राजक्ताचे ||
दगडाच्या आहे भिंती , कौलेही त्याच्यावरती
खिडकिंच्या काचांवरती, चंद्र कोरलेला ||
नांदावे स्वर्गी जसे , स्वप्नाहून गोड भासे
सौभाग्य लाभले तसे , घरात या ||
उंबऱ्याच्या पलीकडून , जाईच्या वेलींमधून
स्वप्न येते भरून , माहेरचे कधी ||
झाले दिवस अनेक , हाक नाही आली एक
तुझी लाडकी लेक , आहे इथे ||
मी सांगते घनाला , दे निरोप माहेराला
माझ्याही आसवाला , बरसून ये ||
आज दाटला घनार्त, पृथ्वीच्या पापणीत
इंद्रधनुही त्यात , सप्तरंगी ||
तो वाहून आला आहे, तो दाटून आला आहे
तो सांगून आला आहे , माझा निरोप ||
वाऱ्याचे भरले उर, नदीला आला पूर
कानी कोकिळेचे सूर , मोहक असे ||
तू येरे असा धाऊन, चिंब मला भिजवून
आसवांना टाक धुवून, आठवणीच्या ||
पाउस पहिला माझा, वर निरोप माहेराचा
उदासवाणी वाचा , आता कुठे ?! ||
अंगणी झाड एकटे , प्राजक्ताचे ||
दगडाच्या आहे भिंती , कौलेही त्याच्यावरती
खिडकिंच्या काचांवरती, चंद्र कोरलेला ||
नांदावे स्वर्गी जसे , स्वप्नाहून गोड भासे
सौभाग्य लाभले तसे , घरात या ||
उंबऱ्याच्या पलीकडून , जाईच्या वेलींमधून
स्वप्न येते भरून , माहेरचे कधी ||
झाले दिवस अनेक , हाक नाही आली एक
तुझी लाडकी लेक , आहे इथे ||
मी सांगते घनाला , दे निरोप माहेराला
माझ्याही आसवाला , बरसून ये ||
आज दाटला घनार्त, पृथ्वीच्या पापणीत
इंद्रधनुही त्यात , सप्तरंगी ||
तो वाहून आला आहे, तो दाटून आला आहे
तो सांगून आला आहे , माझा निरोप ||
वाऱ्याचे भरले उर, नदीला आला पूर
कानी कोकिळेचे सूर , मोहक असे ||
तू येरे असा धाऊन, चिंब मला भिजवून
आसवांना टाक धुवून, आठवणीच्या ||
पाउस पहिला माझा, वर निरोप माहेराचा
उदासवाणी वाचा , आता कुठे ?! ||
एकटी..
दिवसामागून दिवस जात असतात. सगळ्या गोष्टींप्रमाणे मनाला संसाराचीही सवय होवून जाते. मन कितीही मुक्त होवो त्याला चक्र आवडते. चक्राचा एक फायदा असा की आपला माणूस, आपला सोयरा रोज आपल्याला दिसतो. हे चक्र जेव्हा कधी बिघडतं तेव्हा मात्र मनाची चलबिचल होते. मन नवीन परिस्थितीत कोंडून जातं. असंच काहीसं तिच्या मनाचं ही होतं जेव्हा रोज सायंकाळी दिसणारा तो तिला दिसत नाही. संध्याकाळ जाऊन रात्र आली तरीही त्याची चाहूल नाही. तेव्हा मात्र मन कावरं बावरं होतं .. सगळ्या जगात अगदी एकट पडतं ..
दिवसामागून दिवस जात असतात. सगळ्या गोष्टींप्रमाणे मनाला संसाराचीही सवय होवून जाते. मन कितीही मुक्त होवो त्याला चक्र आवडते. चक्राचा एक फायदा असा की आपला माणूस, आपला सोयरा रोज आपल्याला दिसतो. हे चक्र जेव्हा कधी बिघडतं तेव्हा मात्र मनाची चलबिचल होते. मन नवीन परिस्थितीत कोंडून जातं. असंच काहीसं तिच्या मनाचं ही होतं जेव्हा रोज सायंकाळी दिसणारा तो तिला दिसत नाही. संध्याकाळ जाऊन रात्र आली तरीही त्याची चाहूल नाही. तेव्हा मात्र मन कावरं बावरं होतं .. सगळ्या जगात अगदी एकट पडतं ..
सरली संध्याकाळ आणिक
सरले सारे प्रहरही
दाराशी राहिली उभी
सवत काळी रात्र ही
एकटी घरात मी
पाउस दाटलेला
ज्योतीत पाखराचा
एक पंख फाटलेला
परतून आले पक्षी
झाडे झाली अबोल
त्या दिनकराहूनही मोठे
मज कुंकवाचे मोल
तू गेलास त्या वाटेवर
सावल्यांचे सत्र पसरले
सांजेचे देवापुढती
निरंजन आज विसरले
स्वप्नांचा शाप माझा
घरात येऊन बसला
घाबरे मी स्वताला
हा खेळ मनाचा कसला ?
या वेड्या मनावर मग
देव जरासा हसला
समोर वळणावरती
तू चालताना दिसला !
सरले सारे प्रहरही
दाराशी राहिली उभी
सवत काळी रात्र ही
एकटी घरात मी
पाउस दाटलेला
ज्योतीत पाखराचा
एक पंख फाटलेला
परतून आले पक्षी
झाडे झाली अबोल
त्या दिनकराहूनही मोठे
मज कुंकवाचे मोल
तू गेलास त्या वाटेवर
सावल्यांचे सत्र पसरले
सांजेचे देवापुढती
निरंजन आज विसरले
स्वप्नांचा शाप माझा
घरात येऊन बसला
घाबरे मी स्वताला
हा खेळ मनाचा कसला ?
या वेड्या मनावर मग
देव जरासा हसला
समोर वळणावरती
तू चालताना दिसला !
सुना झोपाळा ...
तिचं मनही आता स्वप्न पाहू लागलंय. मन असतंच असं त्याला स्वप्न बघायची एक विलक्षण सवय असते. मन आपापल्या रेषांचे अंतर पार करत असताना नवीन नवीन रेषा ही बनवत जात असतं. नद्यांप्रमाणे याही रेषांना फाटे फुटतात, नवे प्रवाह वाहू लागतात. त्याही प्रवाहांना वाहायचं असतं. पण आता मात्र फक्त तिला यांवरून चालायचं नाहीये. ती आता वाट बघते आहे, तिच्याच नव्या जन्माची. अशी ओढ लागलेलं तिचं मन आजूबाजूला सगळीकडे जीवन बघून आसुसलेलं होवून जातं. पक्षिणीचे पिलू असो वा वेलीची कळी असो मातेला त्याची चाहूल होतेच. तिचं मन आता याच चाहूलीची वाट बघतंय ... अधीर होतंय ... थोडे अश्रूही ढाळतय !
तिचं मनही आता स्वप्न पाहू लागलंय. मन असतंच असं त्याला स्वप्न बघायची एक विलक्षण सवय असते. मन आपापल्या रेषांचे अंतर पार करत असताना नवीन नवीन रेषा ही बनवत जात असतं. नद्यांप्रमाणे याही रेषांना फाटे फुटतात, नवे प्रवाह वाहू लागतात. त्याही प्रवाहांना वाहायचं असतं. पण आता मात्र फक्त तिला यांवरून चालायचं नाहीये. ती आता वाट बघते आहे, तिच्याच नव्या जन्माची. अशी ओढ लागलेलं तिचं मन आजूबाजूला सगळीकडे जीवन बघून आसुसलेलं होवून जातं. पक्षिणीचे पिलू असो वा वेलीची कळी असो मातेला त्याची चाहूल होतेच. तिचं मन आता याच चाहूलीची वाट बघतंय ... अधीर होतंय ... थोडे अश्रूही ढाळतय !
धरणीवर उमलून आल्या चैत्राच्या पाउलखुणा
पानांवर आसुसलेला झोपाळा वेलीचा सुना
रोजच येतो सूर्य रोजच गातो पक्षी
रोज जन्मतो चंद्र घेऊन तारकानक्षी
मेघाचा लागे सुगावा अंकुर जन्मतो पुन्हा
पानांवर ...
झाडांच्या फांदिंवरती होताच किलबिलाट
दरीत नव्याने सुटतो वारा असा पिसाट
इवल्या पावलांची चाहूलना आली कुणा
पानांवर ...
पक्षिणी भरवी घास मायेची वेदना होते
रोज पहाटे ती अश्रूंची ओंजळ नेते
हळुवार रांगणारा ध्यास एकला मना
पानांवर ...
पानांवर आसुसलेला झोपाळा वेलीचा सुना
रोजच येतो सूर्य रोजच गातो पक्षी
रोज जन्मतो चंद्र घेऊन तारकानक्षी
मेघाचा लागे सुगावा अंकुर जन्मतो पुन्हा
पानांवर ...
झाडांच्या फांदिंवरती होताच किलबिलाट
दरीत नव्याने सुटतो वारा असा पिसाट
इवल्या पावलांची चाहूलना आली कुणा
पानांवर ...
पक्षिणी भरवी घास मायेची वेदना होते
रोज पहाटे ती अश्रूंची ओंजळ नेते
हळुवार रांगणारा ध्यास एकला मना
पानांवर ...
अंकुर ..
एका स्त्रीच्या मनाला बहुदा बाळाच्या जन्माच्या वेळच्या वेदानांपेक्षाही त्या बाळाची जन्माची वाट बघण्याची वेदना जास्त होत असावी. कारण तिच्यामध्ये वाढणारं ते बाळ म्हणजे तिची साधना असते. साधना म्हटली की श्रम आले , वेदनाही आल्या. मातेच्या मनाला या वेदनाही सुखावून टाकत असतात. तिचे मनही असेच अधीर झाले आहे की कधी त्याला प्रत्यक्ष बघीन कारण देवाने दोन जीवांना एकमेकांशी बांधून ठेवलेलं असतं पण ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. तिला त्या बाळाचे फक्त हुंकार ऐकू येत असतात. ते बाळ जेव्हा आपले पाय झाडत असतं तेव्हा तिला वाटतं की त्याला आता बाहेर यायचंय .. पण वेळ आलेली नसते आणि म्हणून वाट बघण्याची वेदना तिला बहुदा जास्त होत असणार. अशाच एका वळणावर ती उभी असताना तिच्या मनाला त्या साधनेचं फळ मिळतं आणि तिच्या अंगणात एक अंकुर जन्माला येतो !
एका स्त्रीच्या मनाला बहुदा बाळाच्या जन्माच्या वेळच्या वेदानांपेक्षाही त्या बाळाची जन्माची वाट बघण्याची वेदना जास्त होत असावी. कारण तिच्यामध्ये वाढणारं ते बाळ म्हणजे तिची साधना असते. साधना म्हटली की श्रम आले , वेदनाही आल्या. मातेच्या मनाला या वेदनाही सुखावून टाकत असतात. तिचे मनही असेच अधीर झाले आहे की कधी त्याला प्रत्यक्ष बघीन कारण देवाने दोन जीवांना एकमेकांशी बांधून ठेवलेलं असतं पण ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. तिला त्या बाळाचे फक्त हुंकार ऐकू येत असतात. ते बाळ जेव्हा आपले पाय झाडत असतं तेव्हा तिला वाटतं की त्याला आता बाहेर यायचंय .. पण वेळ आलेली नसते आणि म्हणून वाट बघण्याची वेदना तिला बहुदा जास्त होत असणार. अशाच एका वळणावर ती उभी असताना तिच्या मनाला त्या साधनेचं फळ मिळतं आणि तिच्या अंगणात एक अंकुर जन्माला येतो !
वळणावर होती उभी , ती वाट पाहत होती
रिकाम्या पदरावरती, अश्रूंना वाहत होती
अवखळ वीजही तेव्हा, मेघात खेळत होती
हातांना पसरून आणिक थेंबांना झेलत होती
तिच्या कुळाचा दिवा, तिने उजळला होता
रक्ताच्या इंधनाचा, एक थेंब जळला होता
उचंबळून याव्या, घागरी गर्द घनाच्या
अधीर होत जाव्या, कल्पना तिच्या मनाच्या
ओटीत तिच्याही पडले, एक फुल साधनेचे
गर्भात तिला मिळाले, ओंकार प्रार्थनेचे
मरण वेदनांचेही आता, सुख वाटले तिला
तिचाच जन्म येथे, तिच्या कवेत आला
अस्तित्वाच्या खुणा, तो हुंकार सांगत होता
अमृताचा वर्षाव आता, धरणीवर सांडत होता
भिजलेल्या मातीवरती, अंकुर नांदत होता
इवल्याश्या पावलांनी, तो कृष्ण रांगत होता !
रिकाम्या पदरावरती, अश्रूंना वाहत होती
अवखळ वीजही तेव्हा, मेघात खेळत होती
हातांना पसरून आणिक थेंबांना झेलत होती
तिच्या कुळाचा दिवा, तिने उजळला होता
रक्ताच्या इंधनाचा, एक थेंब जळला होता
उचंबळून याव्या, घागरी गर्द घनाच्या
अधीर होत जाव्या, कल्पना तिच्या मनाच्या
ओटीत तिच्याही पडले, एक फुल साधनेचे
गर्भात तिला मिळाले, ओंकार प्रार्थनेचे
मरण वेदनांचेही आता, सुख वाटले तिला
तिचाच जन्म येथे, तिच्या कवेत आला
अस्तित्वाच्या खुणा, तो हुंकार सांगत होता
अमृताचा वर्षाव आता, धरणीवर सांडत होता
भिजलेल्या मातीवरती, अंकुर नांदत होता
इवल्याश्या पावलांनी, तो कृष्ण रांगत होता !
सती ..
चुकून कधीतरी थोडसं मिळालेलं सुख तर शत्रूलाही बघवत नाही मग नियती कशी माफ करेल ? देवाने तिला सर्व काही दिलं. सौंदर्य, प्रेम, घर आणि आता तिच्या अंगणात तिचा चंद्रही रांगू लागला आहे. मग नियती हे सगळं कसं बघत बसेल ? तिने आपला डाव साधलाच ...जिथे विश्वास आहे तिथे विश्वासघात आलाच ! स्त्रीला जसं मातृत्वाचं वरदान मिळालंय तसाच पुरुषाला मोहात गुंतण्याचा शाप मिळालेला आहे. पण हा शाप तिच्याच आयुष्यात घर करून रहावा ही तर नियतीची क्रूर थट्टाच. ज्या माणसावर तिने प्रेम केलं ज्याला सर्वस्व वाहिलं ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, तो जेव्हा कोणाच्या मोहात अडकतो तेव्हा तिच्या आत्म्यालाच धडक बसते आणि तिला संसाराचे तुकडे तुकडे होताना दिसतात. यात तिच्या परस्त्रीवरील एका पत्नीच्या इर्षेची झाकही दिसते.
कुंपणावर बसून तो, कावळाही चुगली करतो
गावातल्या वाटेवरती, वाराही कान भरतो
बाहुतला स्वर्ग हरवला, नसे स्पर्श साखरेचा
रात्रीच्या समयीतून येतो, वास का मदिरेचा ?
पायीच्या थकल्या धुळीचा, रंग कसा रे काळा ?
परतीचा गंध रस्त्याचा, का वेशीवरून आला ?
विसरले अपराध सारे, गोकुळी यमुनेकिनारी
लीलांचे प्रश्न तरीही , वृंदावन मला विचारी
अनंत श्वासांची गाठ रे, सती मी जन्मांतरीची
सूर्य कुंकवाचा अस्तालागे , ज्वाला ही अंतरीची
ती रडून केविलवाणी , विचारी भग्न मनाला
अविचल हक्क माझा , राधेला का मिळाला ?
चुकून कधीतरी थोडसं मिळालेलं सुख तर शत्रूलाही बघवत नाही मग नियती कशी माफ करेल ? देवाने तिला सर्व काही दिलं. सौंदर्य, प्रेम, घर आणि आता तिच्या अंगणात तिचा चंद्रही रांगू लागला आहे. मग नियती हे सगळं कसं बघत बसेल ? तिने आपला डाव साधलाच ...जिथे विश्वास आहे तिथे विश्वासघात आलाच ! स्त्रीला जसं मातृत्वाचं वरदान मिळालंय तसाच पुरुषाला मोहात गुंतण्याचा शाप मिळालेला आहे. पण हा शाप तिच्याच आयुष्यात घर करून रहावा ही तर नियतीची क्रूर थट्टाच. ज्या माणसावर तिने प्रेम केलं ज्याला सर्वस्व वाहिलं ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, तो जेव्हा कोणाच्या मोहात अडकतो तेव्हा तिच्या आत्म्यालाच धडक बसते आणि तिला संसाराचे तुकडे तुकडे होताना दिसतात. यात तिच्या परस्त्रीवरील एका पत्नीच्या इर्षेची झाकही दिसते.
कुंपणावर बसून तो, कावळाही चुगली करतो
गावातल्या वाटेवरती, वाराही कान भरतो
बाहुतला स्वर्ग हरवला, नसे स्पर्श साखरेचा
रात्रीच्या समयीतून येतो, वास का मदिरेचा ?
पायीच्या थकल्या धुळीचा, रंग कसा रे काळा ?
परतीचा गंध रस्त्याचा, का वेशीवरून आला ?
विसरले अपराध सारे, गोकुळी यमुनेकिनारी
लीलांचे प्रश्न तरीही , वृंदावन मला विचारी
अनंत श्वासांची गाठ रे, सती मी जन्मांतरीची
सूर्य कुंकवाचा अस्तालागे , ज्वाला ही अंतरीची
ती रडून केविलवाणी , विचारी भग्न मनाला
अविचल हक्क माझा , राधेला का मिळाला ?
कोणे एके काळी..
मी पाहिलेली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे माझी एक मैत्रीण .. मैत्रीण म्हणजे खरोखरीच फक्त मैत्रीण ! अमेरिका म्हणजे स्वातंत्र्य हे जरी खरं असलं तरी तिची एक सवय म्हणा, किंवा स्वभावदोष म्हणा की मुलांचा वेडेपणा म्हणा तिने आत्तापर्यंत एवढ्या बॉयफ्रेंड्स णा बदललंय की तिला सुद्धा आठवत नसेल. दरवेळेस कोणी नवा सापडला की ती आधी आम्हाला भेटवते. तेव्हा मनात विचार येतो की त्या मुलाला वाटत असेल आपणच पहिले ! मला बऱ्याचदा असं वाटतं की जेव्हा आधीचा कोणी तिला भलत्याच मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवताना बघील तर त्याला काय वाटेल .. कदाचित तो असंच म्हणेल की कोणे एके काळी एक वेडा होता ..
मी पाहिलेली अजून एक विशेष गोष्ट म्हणजे माझी एक मैत्रीण .. मैत्रीण म्हणजे खरोखरीच फक्त मैत्रीण ! अमेरिका म्हणजे स्वातंत्र्य हे जरी खरं असलं तरी तिची एक सवय म्हणा, किंवा स्वभावदोष म्हणा की मुलांचा वेडेपणा म्हणा तिने आत्तापर्यंत एवढ्या बॉयफ्रेंड्स णा बदललंय की तिला सुद्धा आठवत नसेल. दरवेळेस कोणी नवा सापडला की ती आधी आम्हाला भेटवते. तेव्हा मनात विचार येतो की त्या मुलाला वाटत असेल आपणच पहिले ! मला बऱ्याचदा असं वाटतं की जेव्हा आधीचा कोणी तिला भलत्याच मुलाच्या खांद्यावर डोकं ठेवताना बघील तर त्याला काय वाटेल .. कदाचित तो असंच म्हणेल की कोणे एके काळी एक वेडा होता ..
वळणावरती एका पहिला, वसंत फुलला होता
तुझ्या बटांवर माझा पहिला, मेघ उमटला होता
तुझ्या ओठांवर अर्थ नवेले, थरथर सांगत होती
तुझी पापणी भातुकली, हातावर मांडत होती
ती वेळच होती अशी, हवेला भानही उरले नव्हते
सप्तरंग तुझे नी माझे, इथे स्वप्नात उतरले होते
वळता वळता कधी कधी, एक वळणही असले येते
सुंदर मुखावट्यांमुळे कधी, हे जगही फसले जाते
चकव्यांवाटे तसाच क्षण, तो नकळत निसटून गेला
फसगत भलती झाली होती, मनास पटवून गेला
आता कळते तुझ्या स्मिताचा, अर्थही साधा नव्हता
प्रेमासाठी तुला मिळाला, हा पहिला खांदा नव्हता
वळण सोडले चालू लागलो, गाव उजडला होता
कोणे एके काळी तुझा गं, एक वेडा कोणी होता
तुझ्या बटांवर माझा पहिला, मेघ उमटला होता
तुझ्या ओठांवर अर्थ नवेले, थरथर सांगत होती
तुझी पापणी भातुकली, हातावर मांडत होती
ती वेळच होती अशी, हवेला भानही उरले नव्हते
सप्तरंग तुझे नी माझे, इथे स्वप्नात उतरले होते
वळता वळता कधी कधी, एक वळणही असले येते
सुंदर मुखावट्यांमुळे कधी, हे जगही फसले जाते
चकव्यांवाटे तसाच क्षण, तो नकळत निसटून गेला
फसगत भलती झाली होती, मनास पटवून गेला
आता कळते तुझ्या स्मिताचा, अर्थही साधा नव्हता
प्रेमासाठी तुला मिळाला, हा पहिला खांदा नव्हता
वळण सोडले चालू लागलो, गाव उजडला होता
कोणे एके काळी तुझा गं, एक वेडा कोणी होता
१६ जुलै २००८ , सायंकाळी पाऊणे आठ वाजता ...
काही काही घटना मात्र अशा असतात की त्या मनपटलावर अक्षरशः कोरल्या जातात ... अशीच एक घटना अगदी माझ्या समोर घडली. तो मुलगा आजही मला दिसतो. आनंदी असतो पण त्या मागे एक छोटासा काळोखा इतिहास आहे. एकदा त्याने काहीतरी लिहिलेलं. खरं तर ते तिच्यासाठी होतं पण मला वाटलं की स्वतःशीच बोलतोय .. मग म्हटलं त्याचं उरलेलं बोलणं मीच पूर्ण केलं तर ?!
काही काही घटना मात्र अशा असतात की त्या मनपटलावर अक्षरशः कोरल्या जातात ... अशीच एक घटना अगदी माझ्या समोर घडली. तो मुलगा आजही मला दिसतो. आनंदी असतो पण त्या मागे एक छोटासा काळोखा इतिहास आहे. एकदा त्याने काहीतरी लिहिलेलं. खरं तर ते तिच्यासाठी होतं पण मला वाटलं की स्वतःशीच बोलतोय .. मग म्हटलं त्याचं उरलेलं बोलणं मीच पूर्ण केलं तर ?!
दिवसरात्र विचारतो आता
मी चुकलो तरी कशाला ?
भलतेच उत्तरं मिळते की
प्रेमात पडलो तरी कशाला ?
ही खोटी कागदी फुले
कशी माझ्याच पदरी पडली
की फसव्या संध्याकाळी
ती पहिली भेट गं घडली
काट्यावर चालण्याची शर्यत
साली हवीच का कोणाला ?
मग विचार करतो माझं
नशीब लागणार कधी पणाला ?
साऱ्यातून सुटून गेलो
अन मनीचा काटा निघाला ?
मन पुन्हा मला विचारे ...
पळूनच यायचे होते
तर चुकला तरी कशाला ?
आज पुन्हा तुझी आठवण आली
थोडं मागे वळून बघता ..
१६ जुलै २००८ , सायंकाळी पाऊणे आठ वाजता ...
मी चुकलो तरी कशाला ?
भलतेच उत्तरं मिळते की
प्रेमात पडलो तरी कशाला ?
ही खोटी कागदी फुले
कशी माझ्याच पदरी पडली
की फसव्या संध्याकाळी
ती पहिली भेट गं घडली
काट्यावर चालण्याची शर्यत
साली हवीच का कोणाला ?
मग विचार करतो माझं
नशीब लागणार कधी पणाला ?
साऱ्यातून सुटून गेलो
अन मनीचा काटा निघाला ?
मन पुन्हा मला विचारे ...
पळूनच यायचे होते
तर चुकला तरी कशाला ?
आज पुन्हा तुझी आठवण आली
थोडं मागे वळून बघता ..
१६ जुलै २००८ , सायंकाळी पाऊणे आठ वाजता ...
मोहनशाम
हे सगळं आजुबाजुचं पाहिलं लोकांचे प्रेम करण्याचे खोटे प्रयत्न पाहिले, खेळ .. फक्त खेळ पाहिले किंवा स्वतःची समजूत करून घेणारे दिसले की मन या सगळ्या प्रकाराला अगदी विटून जातं. मन जगापासून दूर जाऊ लागतं. स्वप्नातल्या प्रेम कथेत. ही प्रेम कथा म्हणजे एक राजा , एक राणी अशी नसून.. फक्त एक मुलगा आणि त्याच्यावर फक्त प्रेमच करणारी एक मुलगी यांची ती गोष्ट आहे. ही मुलगी म्हणजे 'राधा' आणि तो मुलगा म्हणजे कृष्ण ! मला तर असं वाटतं की आजही राधा यमुनेच्या तटावर कृष्णाला शोधत असेल .. कृष्ण आजही तिला मोहून टाकतो ..
हे सगळं आजुबाजुचं पाहिलं लोकांचे प्रेम करण्याचे खोटे प्रयत्न पाहिले, खेळ .. फक्त खेळ पाहिले किंवा स्वतःची समजूत करून घेणारे दिसले की मन या सगळ्या प्रकाराला अगदी विटून जातं. मन जगापासून दूर जाऊ लागतं. स्वप्नातल्या प्रेम कथेत. ही प्रेम कथा म्हणजे एक राजा , एक राणी अशी नसून.. फक्त एक मुलगा आणि त्याच्यावर फक्त प्रेमच करणारी एक मुलगी यांची ती गोष्ट आहे. ही मुलगी म्हणजे 'राधा' आणि तो मुलगा म्हणजे कृष्ण ! मला तर असं वाटतं की आजही राधा यमुनेच्या तटावर कृष्णाला शोधत असेल .. कृष्ण आजही तिला मोहून टाकतो ..
थकलेल्या किरणांना क्षितिजावर मिळे विराम
सांजवेळी पैलतीरावर दिसतो मोहनशाम
स्पर्शून मनाला वारा नयनातून वाहून जातो
पृथ्वीच्या ओच्यात नभीचा प्राजक्त दाटून येतो
सूर वेणूचा मधुर अलगद येतो कसा कुठून ?
विश्वाच्या अंगणावर आणि कृष्णरंग ये दाटून
वृंदावनी शोधते राधा तिथेही नसतोस तू
सुरांमागे धावते बिचारी असा छळतोस तू
राधा थकून जाते, हरते मिश्कील हसतोस तू
ती शेवटी मिटते डोळे नी समोर असतोस तू
सांजवेळी पैलतीरावर दिसतो मोहनशाम
स्पर्शून मनाला वारा नयनातून वाहून जातो
पृथ्वीच्या ओच्यात नभीचा प्राजक्त दाटून येतो
सूर वेणूचा मधुर अलगद येतो कसा कुठून ?
विश्वाच्या अंगणावर आणि कृष्णरंग ये दाटून
वृंदावनी शोधते राधा तिथेही नसतोस तू
सुरांमागे धावते बिचारी असा छळतोस तू
राधा थकून जाते, हरते मिश्कील हसतोस तू
ती शेवटी मिटते डोळे नी समोर असतोस तू
पाप..
जगाच्या नीती अनीतीचे स्तर कितीही ढासळो. चूक कुणाचीही असो. आयुष्यात घेतल्या जाणाऱ्या चुकीच्या निर्णयांचा स्त्री आणि पुरुष असण्याशी संबंध नसतो. पण भोगावं लागतं ते तिलाच. निसर्गाचा नियम म्हणा समाजाचा नियम म्हणा किंवा आणखी काही म्हणा हेच सत्य आहे. अशा वेळी तिला भिती वाटू लागते. ती त्याला बोलवत असते ते आधार म्हणून नव्हे तर भविष्याला कलंक लागू नये म्हणून... तिला त्या पापाची भिती वाटत असते !
जगाच्या नीती अनीतीचे स्तर कितीही ढासळो. चूक कुणाचीही असो. आयुष्यात घेतल्या जाणाऱ्या चुकीच्या निर्णयांचा स्त्री आणि पुरुष असण्याशी संबंध नसतो. पण भोगावं लागतं ते तिलाच. निसर्गाचा नियम म्हणा समाजाचा नियम म्हणा किंवा आणखी काही म्हणा हेच सत्य आहे. अशा वेळी तिला भिती वाटू लागते. ती त्याला बोलवत असते ते आधार म्हणून नव्हे तर भविष्याला कलंक लागू नये म्हणून... तिला त्या पापाची भिती वाटत असते !
सांजेला खिडकीवरती
भीतीचे काजळ पसरे
कौलांमधून अवचित
चंद्राची राखही उतरे
इंद्रियांच्या संकेतांचे
उजळले अंगी दीप
या अथांग दर्यामधेही
असतेच एकटे द्वीप
जाईच्या तू दिलेल्या
वेलींवर फुलले पाप
अंगणात पाचोळ्याशी
मज दिसे विषारी साप
ओंजळीत माझ्या पडावे
जे तेज अस्ता गेले
झऱ्याचे निर्मळ पाणी
मातीत आज मिसळले
तू असता इथे सख्या रे
का मला कशाची भिती
शब्दांचे स्वैर हे काटे
मी झेलू तरी रे किती ?
भीतीचे काजळ पसरे
कौलांमधून अवचित
चंद्राची राखही उतरे
इंद्रियांच्या संकेतांचे
उजळले अंगी दीप
या अथांग दर्यामधेही
असतेच एकटे द्वीप
जाईच्या तू दिलेल्या
वेलींवर फुलले पाप
अंगणात पाचोळ्याशी
मज दिसे विषारी साप
ओंजळीत माझ्या पडावे
जे तेज अस्ता गेले
झऱ्याचे निर्मळ पाणी
मातीत आज मिसळले
तू असता इथे सख्या रे
का मला कशाची भिती
शब्दांचे स्वैर हे काटे
मी झेलू तरी रे किती ?
त्याला उठवू नकोस बाळे ..
इतिहास दोन स्त्रियांना कायम घाबरत राहील कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाहीत. कैकेयी मुळे स्वतःच्या हक्काच्या माणसापासून दूर झालेली आणि एक तप विनाकारण वनवासाहूनही भयंकर विरहाला सामोरी गेलेली उर्मिला आणि सत्य आणि असत्य यांच्या द्वंद्वात नाहक भरडली गेलेली उत्तरा ! उर्मिलेला तिचा लक्ष्मण परत भेटला पण उत्तरा मात्र अभिमन्यूची वाट पहात राहिली तेही अशा वेळी जेव्हा ती मातृत्वाच्या चौकटीमध्ये उभी होती.. तिला तिचा अभिमन्यू मिळालाच नाही .. तिचं सांत्वन करणं कृष्णालाही अवघड गेलं !
इतिहास दोन स्त्रियांना कायम घाबरत राहील कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाहीत. कैकेयी मुळे स्वतःच्या हक्काच्या माणसापासून दूर झालेली आणि एक तप विनाकारण वनवासाहूनही भयंकर विरहाला सामोरी गेलेली उर्मिला आणि सत्य आणि असत्य यांच्या द्वंद्वात नाहक भरडली गेलेली उत्तरा ! उर्मिलेला तिचा लक्ष्मण परत भेटला पण उत्तरा मात्र अभिमन्यूची वाट पहात राहिली तेही अशा वेळी जेव्हा ती मातृत्वाच्या चौकटीमध्ये उभी होती.. तिला तिचा अभिमन्यू मिळालाच नाही .. तिचं सांत्वन करणं कृष्णालाही अवघड गेलं !
त्याला उठवू नकोस बाळे,
तो आता निजला आहे,
अस्ताची बनून धूळ
खडकावर बसला आहे
तुझ्या चिमुकल्या हाका
त्याला न उत्तर उरले,
थकलेले श्वास तयाचे
पश्चिमेला कधीच सरले
झोप ही त्याची असली
गळले स्वप्नांचे पंख,
त्या कोमल बाळमुठीवर
तुटल्या चुड्याचे डंख
एकट रथाला त्याच्या
वेढून उडाल्या घारी,
घेऊन सत्य पताका
तो गेला वैकुंठ दारी
सत्याचा अलौकिक वेल
फुलला आज असाही,
सुकलेल्या अश्रुंचा आज
होवू दे मेघ तसाही
भगवंत कैवारी त्याचा
हे निजणेही दंश नाही,
तू रडू नकोस बाळे
वंश त्याचा निर्वंश नाही
तो आता निजला आहे,
अस्ताची बनून धूळ
खडकावर बसला आहे
तुझ्या चिमुकल्या हाका
त्याला न उत्तर उरले,
थकलेले श्वास तयाचे
पश्चिमेला कधीच सरले
झोप ही त्याची असली
गळले स्वप्नांचे पंख,
त्या कोमल बाळमुठीवर
तुटल्या चुड्याचे डंख
एकट रथाला त्याच्या
वेढून उडाल्या घारी,
घेऊन सत्य पताका
तो गेला वैकुंठ दारी
सत्याचा अलौकिक वेल
फुलला आज असाही,
सुकलेल्या अश्रुंचा आज
होवू दे मेघ तसाही
भगवंत कैवारी त्याचा
हे निजणेही दंश नाही,
तू रडू नकोस बाळे
वंश त्याचा निर्वंश नाही