एकच खिडकी..
हे अगदीच खरंय की अज्ञानात सुख असतं. हे सगळं मोकळं-धाकळं जग .. त्याला बघण्याची कल्पना फार सुखावह आहे. पण जग तेवढं सुंदर आहे का ? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. लहानपणापासून प्रत्येक गोष्टी आणि त्यांच्याकडे बघण्याचे दृष्टीकोन यांच्यात काही गंभीर प्रश्न आहेत. मन हे एक असं मोठं घर आहे ज्याला अनेक खिडक्या आहेत, प्रत्येक खिडकीतून वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. मुक्त विचार करणे म्हणजे सगळ्या खिडक्या उघडणे.. पण कधी कधी बाहेरच्या गोष्टी बघून असं वाटतं की सगळ्या खिडक्या बंद कराव्यात .. काहीही बघू नये .. फक्त एक खिडकी उघडी ठेवावी !
हे अगदीच खरंय की अज्ञानात सुख असतं. हे सगळं मोकळं-धाकळं जग .. त्याला बघण्याची कल्पना फार सुखावह आहे. पण जग तेवढं सुंदर आहे का ? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. लहानपणापासून प्रत्येक गोष्टी आणि त्यांच्याकडे बघण्याचे दृष्टीकोन यांच्यात काही गंभीर प्रश्न आहेत. मन हे एक असं मोठं घर आहे ज्याला अनेक खिडक्या आहेत, प्रत्येक खिडकीतून वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. मुक्त विचार करणे म्हणजे सगळ्या खिडक्या उघडणे.. पण कधी कधी बाहेरच्या गोष्टी बघून असं वाटतं की सगळ्या खिडक्या बंद कराव्यात .. काहीही बघू नये .. फक्त एक खिडकी उघडी ठेवावी !
एक खिडकी ..
सळयात अडकलेली
काळोखात जखडलेली
त्यातून दिसते एक शर्यत
शितासाठी भूतांची पंगत
मुर्खांशी मुर्खांची संगत आणि
रस्त्याकडेला बघ्यांची गम्मत
ते चित्र बघवत नाही
ती खिडकी उघडत नाही
एक खिडकी ..
काटकोनात मोजलेली
पडद्यांनी झाकलेली
पडदा उघडला
की शाळेत जाणारा एक मुलगा दिसतो
पाठीवर पुस्तकांचा गठ्ठा दिसतो
युनिफॉर्म शाईने भरलेला असतो
वर्ग भरलेला असतो .. तो आंगठे धरून असतो
परीक्षेच्या भीतीने आजही झोपेतून उठतो
या पडद्यांना मी झाकूनच ठेवतो
एक खिडकी ..
काचा अंधुक थोड्या धुरकट
सारं काही काळं सारं मळकट
माणसं नाहीत फक्त मुखवटे
छोट्यांना गिळतात मासे मोठे
प्रेमाच्या गुलाबाला स्वार्थाचे काटे
आणि फसवे शब्द ... खोटे ... फक्त खोटे
बाहेरचा गोंगाट कळत नाही
या खिडकीकडे पाय वळत नाही
एक खिडकी ..
मोत्यांनी मढवलेली
शिंपल्यांनी सजवलेली
ताऱ्यांनी नटवलेली
आरशांनी बनवलेली
इंद्रधनुष्य सप्तरंगात हसत असतो
चंद्र सूर्याशी लपंडाव खेळत असतो
हातांनी डोंगर मेघांना धरत असतो
झऱ्याचे घेऊन रूप थेंब नदीला मिळत असतो
कितीही मोठा झालो तरी हे वय सरत नाही
इतकी वर्ष झाली पण बालपण विसरत नाही
कंटाळा आला की या खिडकीत बसून घेतो
थोडा रडून घेतो थोडा हसून घेतो
मनाच्या घराला खिडक्या अनेक..
ही एकच खिडकी उघडी ठेवतो
बाकी सगळं बंद !
सळयात अडकलेली
काळोखात जखडलेली
त्यातून दिसते एक शर्यत
शितासाठी भूतांची पंगत
मुर्खांशी मुर्खांची संगत आणि
रस्त्याकडेला बघ्यांची गम्मत
ते चित्र बघवत नाही
ती खिडकी उघडत नाही
एक खिडकी ..
काटकोनात मोजलेली
पडद्यांनी झाकलेली
पडदा उघडला
की शाळेत जाणारा एक मुलगा दिसतो
पाठीवर पुस्तकांचा गठ्ठा दिसतो
युनिफॉर्म शाईने भरलेला असतो
वर्ग भरलेला असतो .. तो आंगठे धरून असतो
परीक्षेच्या भीतीने आजही झोपेतून उठतो
या पडद्यांना मी झाकूनच ठेवतो
एक खिडकी ..
काचा अंधुक थोड्या धुरकट
सारं काही काळं सारं मळकट
माणसं नाहीत फक्त मुखवटे
छोट्यांना गिळतात मासे मोठे
प्रेमाच्या गुलाबाला स्वार्थाचे काटे
आणि फसवे शब्द ... खोटे ... फक्त खोटे
बाहेरचा गोंगाट कळत नाही
या खिडकीकडे पाय वळत नाही
एक खिडकी ..
मोत्यांनी मढवलेली
शिंपल्यांनी सजवलेली
ताऱ्यांनी नटवलेली
आरशांनी बनवलेली
इंद्रधनुष्य सप्तरंगात हसत असतो
चंद्र सूर्याशी लपंडाव खेळत असतो
हातांनी डोंगर मेघांना धरत असतो
झऱ्याचे घेऊन रूप थेंब नदीला मिळत असतो
कितीही मोठा झालो तरी हे वय सरत नाही
इतकी वर्ष झाली पण बालपण विसरत नाही
कंटाळा आला की या खिडकीत बसून घेतो
थोडा रडून घेतो थोडा हसून घेतो
मनाच्या घराला खिडक्या अनेक..
ही एकच खिडकी उघडी ठेवतो
बाकी सगळं बंद !
हे बरंय ..
जगातल्या बहुतांशी लोकांचा एक हेका असतो की दोष त्यांचा नाही .. त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना त्रास देतात छळतात. पण खरच सांगतो कधीकधी खरोखर आजूबाजूची लोकं त्रास देतात. याहून वाईट प्रकार म्हणजे जेव्हा लोकं तुमच्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवतात कारण त्या गोष्टी तुमच्या आहेत ! त्यांना काय करायचं ?
जगातल्या बहुतांशी लोकांचा एक हेका असतो की दोष त्यांचा नाही .. त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना त्रास देतात छळतात. पण खरच सांगतो कधीकधी खरोखर आजूबाजूची लोकं त्रास देतात. याहून वाईट प्रकार म्हणजे जेव्हा लोकं तुमच्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवतात कारण त्या गोष्टी तुमच्या आहेत ! त्यांना काय करायचं ?
खरंच सांगतो तुम्हाला
प्लीज कोणी खोटं मानू नका
थोडं मनातलं सांगतो
किमान त्याला तरी आक्रस्ताळेपणा म्हणू नका
कारण...
हे बरंय...
तुमचा तो हजरजबाबीपणा
आमचा तो आघाऊपणा !
तुमचं ते professionalism
आमची ती bureaucracy !
तुमचं ते सोनं
आमचं ते पितळ !
तुम्ही करता ते cost-cutting
आमचा तो कंजुषपणा !
तुमची होते ती गैरसोय
आम्ही करतो तो आळस !
तुम्ही करता तो नवा प्रयोग
तुम्ही करता ती नवनिर्मिती
आणि
आम्ही करतो ती नस्ती उठाठेव !
तुम्हाला होतात त्या वेदना
तुमचा असतो तो आक्रोश
आणि
आमचा असतो तो कांगावा !
तुम्ही जपता ती संस्कृती
आम्ही जपतो ती अंधश्रद्धा !
तुम्हाला यश मिळतं तेव्हा त्या मागे अपार कष्ट
आणि
आम्ही कधी जिंकलोच तर इतर स्पर्धक ताकदीचे नव्हते !
खरंच अनुभवाने सांगतो खोटं बोलणार नाही
कारण ..
हे बरंय ..
तुमचा असतो तो स्पष्टवक्तेपणा
आमची असते ती तक्रार ... ?!
प्लीज कोणी खोटं मानू नका
थोडं मनातलं सांगतो
किमान त्याला तरी आक्रस्ताळेपणा म्हणू नका
कारण...
हे बरंय...
तुमचा तो हजरजबाबीपणा
आमचा तो आघाऊपणा !
तुमचं ते professionalism
आमची ती bureaucracy !
तुमचं ते सोनं
आमचं ते पितळ !
तुम्ही करता ते cost-cutting
आमचा तो कंजुषपणा !
तुमची होते ती गैरसोय
आम्ही करतो तो आळस !
तुम्ही करता तो नवा प्रयोग
तुम्ही करता ती नवनिर्मिती
आणि
आम्ही करतो ती नस्ती उठाठेव !
तुम्हाला होतात त्या वेदना
तुमचा असतो तो आक्रोश
आणि
आमचा असतो तो कांगावा !
तुम्ही जपता ती संस्कृती
आम्ही जपतो ती अंधश्रद्धा !
तुम्हाला यश मिळतं तेव्हा त्या मागे अपार कष्ट
आणि
आम्ही कधी जिंकलोच तर इतर स्पर्धक ताकदीचे नव्हते !
खरंच अनुभवाने सांगतो खोटं बोलणार नाही
कारण ..
हे बरंय ..
तुमचा असतो तो स्पष्टवक्तेपणा
आमची असते ती तक्रार ... ?!
कायम..
कधी कधी मनाची घुसमट होते. ही घुसमट माणसाला एकटा पाडते. आणि माणूस एकदा एकटा पडला की तो विचार करू लागतो. विचार करता करता मनाला अनेक रस्ते सापडतात हरवलेल्या वाटा सापडतात. मग तो त्याला पडलेले प्रश्न परत स्वतःला विचारतो. त्यांची उत्तरं ही मिळतात. या उत्तरांमध्ये जर मनाने स्वतःलाच जबाबदार ठरवलं तर तो स्वतःला समजावतो. पण जेव्हा कळतं की त्याच्याबरोबर घडलेल्या बऱ्याच वाईट गोष्टींचे कारण तो स्वतः नाही तेव्हा मात्र परत अनेक प्रश्न पडतात ज्यांची उत्तरे त्याच लोकांकडे असतात. अशा वेळी काय करायचं ? ते जे वळ मनावर उठतात ते कायमसाठी असतात ..
कधी कधी मनाची घुसमट होते. ही घुसमट माणसाला एकटा पाडते. आणि माणूस एकदा एकटा पडला की तो विचार करू लागतो. विचार करता करता मनाला अनेक रस्ते सापडतात हरवलेल्या वाटा सापडतात. मग तो त्याला पडलेले प्रश्न परत स्वतःला विचारतो. त्यांची उत्तरं ही मिळतात. या उत्तरांमध्ये जर मनाने स्वतःलाच जबाबदार ठरवलं तर तो स्वतःला समजावतो. पण जेव्हा कळतं की त्याच्याबरोबर घडलेल्या बऱ्याच वाईट गोष्टींचे कारण तो स्वतः नाही तेव्हा मात्र परत अनेक प्रश्न पडतात ज्यांची उत्तरे त्याच लोकांकडे असतात. अशा वेळी काय करायचं ? ते जे वळ मनावर उठतात ते कायमसाठी असतात ..
हसून घ्या जेव्हढ हसायचय
तुमचे नियम पाळले की दुसरं काय व्हायचय
नकळत आयुष्याला जी चौकट बसली ... ती कायमची
तुम्ही का म्हणून प्रश्नांचा सपाटा लावला आहे
मला त्यांचा आता कंटाळा आला आहे
मला त्यांची एकदाच उत्तरे जी मिळाली ... ती कायमची
जरा मनासारखं वागलं बोललं तर वेडा म्हणाल
नाहीतर कामाचा घोडा म्हणाल
खुळेपणाची जी पाटी दारावर टांगलीत ... ती कायमची
तुम्हालाही कधीतरी दुःखाची जाणीव होईल
जेव्हा प्रत्येक चुकीवर प्रश्न उभा राहील
तेव्हा जी जखम मनाला होते ... ती कायमची
फुकटचे सल्ले देणं सोपं सरळ असतं
एकाचं पायरी जपणं दुसऱ्याच मरण असतं
पण एखादी संधी जी निसटून जाते ... ती कायमची
तुमचे नियम पाळले की दुसरं काय व्हायचय
नकळत आयुष्याला जी चौकट बसली ... ती कायमची
तुम्ही का म्हणून प्रश्नांचा सपाटा लावला आहे
मला त्यांचा आता कंटाळा आला आहे
मला त्यांची एकदाच उत्तरे जी मिळाली ... ती कायमची
जरा मनासारखं वागलं बोललं तर वेडा म्हणाल
नाहीतर कामाचा घोडा म्हणाल
खुळेपणाची जी पाटी दारावर टांगलीत ... ती कायमची
तुम्हालाही कधीतरी दुःखाची जाणीव होईल
जेव्हा प्रत्येक चुकीवर प्रश्न उभा राहील
तेव्हा जी जखम मनाला होते ... ती कायमची
फुकटचे सल्ले देणं सोपं सरळ असतं
एकाचं पायरी जपणं दुसऱ्याच मरण असतं
पण एखादी संधी जी निसटून जाते ... ती कायमची
कोण्या एका तीरावर ..
ज्याला जे हवं आहे ते त्याला मिळू नये हा तर नियतीचा सगळ्यात लाडका खेळ. हे दररोजचं चित्र आहे की मनाला नेहमी प्रश्न पडतात कारण इच्छा आणि नशीब यांचं कधीच जमत नाही. दररोज प्रश्नात अडकलेले जीव दिसतात. ज्या जीवाला प्रेम मिळतं त्याला एक तर त्याची किंमत नाते किंवा त्याच्याकडे ते प्रेम घ्यायची ताकद नसते या उलट काही जीव फक्त जगात असतात पण त्यांना प्रेम करणारच कोणी नसतं एक गाव कधी वसत नाही आणि दुसरं वसुनही ओसाड राहातं. असं काही बघितलं की मन उदास होतं थोडा खुश होतं थोडा राग ही येतो .. पण करू काहीच शकत नाही. मन फक्त ही आजूबाजूची चित्र मनात साठवत असतं !
ज्याला जे हवं आहे ते त्याला मिळू नये हा तर नियतीचा सगळ्यात लाडका खेळ. हे दररोजचं चित्र आहे की मनाला नेहमी प्रश्न पडतात कारण इच्छा आणि नशीब यांचं कधीच जमत नाही. दररोज प्रश्नात अडकलेले जीव दिसतात. ज्या जीवाला प्रेम मिळतं त्याला एक तर त्याची किंमत नाते किंवा त्याच्याकडे ते प्रेम घ्यायची ताकद नसते या उलट काही जीव फक्त जगात असतात पण त्यांना प्रेम करणारच कोणी नसतं एक गाव कधी वसत नाही आणि दुसरं वसुनही ओसाड राहातं. असं काही बघितलं की मन उदास होतं थोडा खुश होतं थोडा राग ही येतो .. पण करू काहीच शकत नाही. मन फक्त ही आजूबाजूची चित्र मनात साठवत असतं !
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
कुणाचे आसुसले डोळे
त्या चंद्रास पहाया
कुणाच्या क्षितिजावर
मेघाची काजळमाया
जळत राहिली ती फक्त रात्र
त्या अंगणावर चांदणे, दिसलेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
पावसाचा थेंबही येथे
वैरी जन्मांतरीचा होतो
अश्रू होतो कुणाचा
कुणाचे सारे वाहून नेतो
आता आठवणींचे आनंत काटे
जपण्यासाठी हाती काही उरलेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
दोघांच्या हातात कधी
होते एक फूल नाजुकसे
रोज नवे उमलून ते
हळुवार गाली लाजतसे
नियतीने ओढल्या क्रूर रेषा
एक सुकून गेले एक फुललेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
जणू हृदयाची दोन शकले व्हावी
एकाला विरह मिळावा एकास विष मिळावे
नियतीच्या तीरावर दोन गावे
...
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
कुणाचे आसुसले डोळे
त्या चंद्रास पहाया
कुणाच्या क्षितिजावर
मेघाची काजळमाया
जळत राहिली ती फक्त रात्र
त्या अंगणावर चांदणे, दिसलेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
पावसाचा थेंबही येथे
वैरी जन्मांतरीचा होतो
अश्रू होतो कुणाचा
कुणाचे सारे वाहून नेतो
आता आठवणींचे आनंत काटे
जपण्यासाठी हाती काही उरलेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
दोघांच्या हातात कधी
होते एक फूल नाजुकसे
रोज नवे उमलून ते
हळुवार गाली लाजतसे
नियतीने ओढल्या क्रूर रेषा
एक सुकून गेले एक फुललेच नाही
नियतीच्या तीरावर दोन गावे
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
जणू हृदयाची दोन शकले व्हावी
एकाला विरह मिळावा एकास विष मिळावे
नियतीच्या तीरावर दोन गावे
...
एक ओसाड झाले , एक वसलेच नाही
अस्वस्थ जरासा इथे मेघ होतो ..
मन .. मन एकट बसतं.. विचार करतं.. स्वप्न बघतं.. चित्र रंगवतं. जेव्हा जेव्हा मनाला भीती वाटते , क्षितीज दूर दिसतं तेव्हा ते जास्त कल्पना करतं, स्वप्न बघतं. हे अगदीच सहाजिक आहे की मनाला तेच बघायचं असतं जे त्याला हवं असतं. आणि जेव्हा मनापुढे अंधार येतो तेव्हा त्याला स्वतःहुन आठवण येते ती देवाची. त्याची फक्त कल्पनाच मनाला सुखावून टाकतं. तसंच काहीसं स्वप्न कधीतरी माझं मन उघड्या डोळ्यांनी बघतं .. चांगलं वाटतं .. की पाउस पडून गेलाय आणि फक्त एक निर्मळ तळं !
मन .. मन एकट बसतं.. विचार करतं.. स्वप्न बघतं.. चित्र रंगवतं. जेव्हा जेव्हा मनाला भीती वाटते , क्षितीज दूर दिसतं तेव्हा ते जास्त कल्पना करतं, स्वप्न बघतं. हे अगदीच सहाजिक आहे की मनाला तेच बघायचं असतं जे त्याला हवं असतं. आणि जेव्हा मनापुढे अंधार येतो तेव्हा त्याला स्वतःहुन आठवण येते ती देवाची. त्याची फक्त कल्पनाच मनाला सुखावून टाकतं. तसंच काहीसं स्वप्न कधीतरी माझं मन उघड्या डोळ्यांनी बघतं .. चांगलं वाटतं .. की पाउस पडून गेलाय आणि फक्त एक निर्मळ तळं !
अस्वस्थ जरासा इथे मेघ होतो
विजेचे पाश का धरणीला मिळे ?
धूळ स्थिरावी खडकांवरी अन
देह पाकळीचा तरी का जळे ?
गळक्या कौलांमधुनी घराच्या
थेंबांची झिरपे वसंत गाणी
झडून उरल्या उंबऱ्यावरती
उभा एक सन्यासी अनवाणी
संदिग्ध डोळ्यांमधून संथ
भूक युगांची अलगद झरली
वाहून गेल्या दाही दिशा अन
चूल मातीची कालच विझली
वळून पाहिले तसा उमटला
आणि पसरला अंधार लोळ
शेवटल्या एका इथे दुधाच्या
थेंबाला मिळते अमृतमोल
समोर आला क्षणभर हसला
सावळया हाती ओंजळ केली
भूक त्याची सत्यच नव्हते
भगवंत प्रतिमा समोर आली
जशी पलटली तृप्त पावले
इंद्रधनू क्षितिजावर उजळे
अंधुक झाली पायवाट अन
अंगणी उरले निर्मळ तळे
विजेचे पाश का धरणीला मिळे ?
धूळ स्थिरावी खडकांवरी अन
देह पाकळीचा तरी का जळे ?
गळक्या कौलांमधुनी घराच्या
थेंबांची झिरपे वसंत गाणी
झडून उरल्या उंबऱ्यावरती
उभा एक सन्यासी अनवाणी
संदिग्ध डोळ्यांमधून संथ
भूक युगांची अलगद झरली
वाहून गेल्या दाही दिशा अन
चूल मातीची कालच विझली
वळून पाहिले तसा उमटला
आणि पसरला अंधार लोळ
शेवटल्या एका इथे दुधाच्या
थेंबाला मिळते अमृतमोल
समोर आला क्षणभर हसला
सावळया हाती ओंजळ केली
भूक त्याची सत्यच नव्हते
भगवंत प्रतिमा समोर आली
जशी पलटली तृप्त पावले
इंद्रधनू क्षितिजावर उजळे
अंधुक झाली पायवाट अन
अंगणी उरले निर्मळ तळे
निलाजरा..
मन जेव्हा कुठेतरी अडकलेलं असतं .. रस्ता मिळत नसतो .. अंधार नसला तरीही एक अंधुक वातावरण असतं ! अधांतरी आयुष्य हे तर विनाशापेक्षा बिकट असतं .. अशा वेळी जेव्हा एखादी गोष्ट प्रश्नांमधून एखाद्या कवडशाप्रमाणे येते तेव्हा मन त्याच्याकडे धाऊन जातं. ती गोष्ट सुद्धा मनाला सावरते त्याला आधार देते. आणि जेव्हा सगळं काही शांत होतं तेव्हा मन आपापल्या वाटेवर चालू लागतं. मला प्रश्न पडतो की मन स्वार्थीपणा तर नाही करत आहे ना ? तसं असेल तर मी सुद्धा स्वार्थी ठरेन कारण माझं मनही कवितेकडे धावतं !
मन जेव्हा कुठेतरी अडकलेलं असतं .. रस्ता मिळत नसतो .. अंधार नसला तरीही एक अंधुक वातावरण असतं ! अधांतरी आयुष्य हे तर विनाशापेक्षा बिकट असतं .. अशा वेळी जेव्हा एखादी गोष्ट प्रश्नांमधून एखाद्या कवडशाप्रमाणे येते तेव्हा मन त्याच्याकडे धाऊन जातं. ती गोष्ट सुद्धा मनाला सावरते त्याला आधार देते. आणि जेव्हा सगळं काही शांत होतं तेव्हा मन आपापल्या वाटेवर चालू लागतं. मला प्रश्न पडतो की मन स्वार्थीपणा तर नाही करत आहे ना ? तसं असेल तर मी सुद्धा स्वार्थी ठरेन कारण माझं मनही कवितेकडे धावतं !
अर्थांची घालून वेसण
अक्षरांच्या राशी रचल्या
सम्भ्रमांच्या झेलून लाटा
शब्दांच्या भिंती खचल्या
किती सजवले आरसे
प्रतिबिंबाची गोड लक्तरे
प्रश्नांचे दुर्बोध चाळे
वास्तवाची संदिग्ध उत्तरे
खिडक्यांना गजांचे बंध
अंगणाला कुंपणकाटे
भिती भुताची दाराला
येईल कधी चोरवाटे
शांत निजल्या बिचाऱ्या
कवितेवर घारीचा डोळा
झाडाच्या सावलीपाशी
का स्थिरावतो पाचोळा
सावरून घेत स्वतःला
मी पुन्हा उचलतो शब्द
फाटलेल्या पदरावरती
सजवतो स्वप्न विदग्ध
स्वप्न सजवताना थोडे
अर्थांना विषारी पंख
आतून निलाजरा मी
तिला पुन्हा जगाचे डंख !
अक्षरांच्या राशी रचल्या
सम्भ्रमांच्या झेलून लाटा
शब्दांच्या भिंती खचल्या
किती सजवले आरसे
प्रतिबिंबाची गोड लक्तरे
प्रश्नांचे दुर्बोध चाळे
वास्तवाची संदिग्ध उत्तरे
खिडक्यांना गजांचे बंध
अंगणाला कुंपणकाटे
भिती भुताची दाराला
येईल कधी चोरवाटे
शांत निजल्या बिचाऱ्या
कवितेवर घारीचा डोळा
झाडाच्या सावलीपाशी
का स्थिरावतो पाचोळा
सावरून घेत स्वतःला
मी पुन्हा उचलतो शब्द
फाटलेल्या पदरावरती
सजवतो स्वप्न विदग्ध
स्वप्न सजवताना थोडे
अर्थांना विषारी पंख
आतून निलाजरा मी
तिला पुन्हा जगाचे डंख !
धुकं..
खरं पाहिलं तर फक्त विचार करत बसणं, कल्पना करणं एवढंच काम करत नाही. निसर्ग सुद्धा फार अजब गोष्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी नेहमी घडताना दिसतात. रोज येणारा दिवस रोज येणारी संध्याकाळ रात्र वारा पाउस .. यातून कधीकधी संध्याकाळी शांतपणे नकळत पृथ्वीवर उतरणारं धुकं. काही क्षण असं वाटतं की सगळं काही शांत झालं आहे .. धुक्यात आलेला संधिप्रकाश नकळत मनामध्ये एक शांत पोकळी निर्माण करतो ! तिथे असलेलं आपलं घर आणि मन दारापाशीच उभं रहात .. का ते मात्र कळत नाही आणि समोर फक्त धुकं असतं ..
खरं पाहिलं तर फक्त विचार करत बसणं, कल्पना करणं एवढंच काम करत नाही. निसर्ग सुद्धा फार अजब गोष्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी नेहमी घडताना दिसतात. रोज येणारा दिवस रोज येणारी संध्याकाळ रात्र वारा पाउस .. यातून कधीकधी संध्याकाळी शांतपणे नकळत पृथ्वीवर उतरणारं धुकं. काही क्षण असं वाटतं की सगळं काही शांत झालं आहे .. धुक्यात आलेला संधिप्रकाश नकळत मनामध्ये एक शांत पोकळी निर्माण करतो ! तिथे असलेलं आपलं घर आणि मन दारापाशीच उभं रहात .. का ते मात्र कळत नाही आणि समोर फक्त धुकं असतं ..
एक गाव
एक दोन घरे
एक दोन तारे
अर्धवट
एक दिवा
त्याचे संक्षिप्त जळणे
एका स्त्याची
अंधुक अलिप्त वळणे
एक रात्र
अंधाराचे कोंदण
एक खिडकी
दवबिंदूचे गोंदण
एक झाड
निजलेली पाने
एक भिती
अव्यक्त तराणे
दमट हवा दमट स्पर्श
दमट भूमी दमट श्वास
एक कोपरा एक एकटा
एक मन वेडे आभास
एक सावली
एक विश्व
एक बिंदू
गिळून सर्वस्व
बाकी फक्त
धुकं धुकं आणि धुकं ...
एक दोन घरे
एक दोन तारे
अर्धवट
एक दिवा
त्याचे संक्षिप्त जळणे
एका स्त्याची
अंधुक अलिप्त वळणे
एक रात्र
अंधाराचे कोंदण
एक खिडकी
दवबिंदूचे गोंदण
एक झाड
निजलेली पाने
एक भिती
अव्यक्त तराणे
दमट हवा दमट स्पर्श
दमट भूमी दमट श्वास
एक कोपरा एक एकटा
एक मन वेडे आभास
एक सावली
एक विश्व
एक बिंदू
गिळून सर्वस्व
बाकी फक्त
धुकं धुकं आणि धुकं ...
चंद्र हळवा ..
असंच बरेच दिवसांनी 'ती' आली. आता मात्र मला तिची सवय झालीये आणि तिलाही माझ्यावाचून करमत नाही हे तिला कळून चुकलंय. ही संध्याकाळ नेहमीसारखी नसते ही संध्याकाळ जरा वेगळीच असते आणि आता मला ती ओळखू येऊ लागली आहे. ही संध्याकाळ म्हणजे रात्री झोप न लागण्याचा जणू एक संदेशाच असतो. मला जाणवू लागतं आणि जरा का होईना बेचैन होतो. आता मी तिलाही दोष देणं बंद केलंय तिला समजावतही नाही. पण हे खरं की अवेळ असली तरी सुंदर दिसते आणि माझं दुःख हे की वेळ चुकीची असते. अशीच आज ती पुन्हा आली आणि ..
असंच बरेच दिवसांनी 'ती' आली. आता मात्र मला तिची सवय झालीये आणि तिलाही माझ्यावाचून करमत नाही हे तिला कळून चुकलंय. ही संध्याकाळ नेहमीसारखी नसते ही संध्याकाळ जरा वेगळीच असते आणि आता मला ती ओळखू येऊ लागली आहे. ही संध्याकाळ म्हणजे रात्री झोप न लागण्याचा जणू एक संदेशाच असतो. मला जाणवू लागतं आणि जरा का होईना बेचैन होतो. आता मी तिलाही दोष देणं बंद केलंय तिला समजावतही नाही. पण हे खरं की अवेळ असली तरी सुंदर दिसते आणि माझं दुःख हे की वेळ चुकीची असते. अशीच आज ती पुन्हा आली आणि ..
आज तू पुन्हा आलीस
क्षितिजाच्या पटावर का, ओढलीस काजळ रेषा ?
की तुला करमले नाही, दिवसाच्या दूर देशा ?
आज तू पुन्हा आलीस
श्वासांच्या पैलतीरावर, अगतिक आज अबोला
पाश अंतरी झेलणारा, संदिग्ध उसासा ओला
आज तू पुन्हा आलीस
विसरून कालच्या वाटा, विसरून दिशांचे ज्ञान
विसरून इतिहासाचे, फाटलेले गोंडस पान
आज तू पुन्हा आलीस
भूतकाळाची भिंगरी, मनाच्या तळाशी सोडून
मी बांधल्या अंगणाची, तकलादू भिंत तोडून
आज तू पुन्हा आलीस
ताऱ्यांना झाके कशाला, गोऱ्या हातांचा तळवा ?
तुझ्या पापण्या सुरेख, माझाच चंद्र हळवा !
सांग मला तू आता, मी काय करू सुखाने ?
स्वप्नात सुटका नाही, मी जागा तरी कशाने ?
आज तू पुन्हा आलीस ..
क्षितिजाच्या पटावर का, ओढलीस काजळ रेषा ?
की तुला करमले नाही, दिवसाच्या दूर देशा ?
आज तू पुन्हा आलीस
श्वासांच्या पैलतीरावर, अगतिक आज अबोला
पाश अंतरी झेलणारा, संदिग्ध उसासा ओला
आज तू पुन्हा आलीस
विसरून कालच्या वाटा, विसरून दिशांचे ज्ञान
विसरून इतिहासाचे, फाटलेले गोंडस पान
आज तू पुन्हा आलीस
भूतकाळाची भिंगरी, मनाच्या तळाशी सोडून
मी बांधल्या अंगणाची, तकलादू भिंत तोडून
आज तू पुन्हा आलीस
ताऱ्यांना झाके कशाला, गोऱ्या हातांचा तळवा ?
तुझ्या पापण्या सुरेख, माझाच चंद्र हळवा !
सांग मला तू आता, मी काय करू सुखाने ?
स्वप्नात सुटका नाही, मी जागा तरी कशाने ?
आज तू पुन्हा आलीस ..